शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

महिलांसाठी जलद न्यायालये, पोलीस ठाण्यात स्वतंत्र सेल

By admin | Updated: December 21, 2014 22:50 IST

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर अंकुश लावण्यासह त्या पीडित महिलांना त्वरित न्याय मिळावा, यासाठी फास्टट्रॅक न्यायालये चालविले जातील. एवढेच नव्हे, तर महिलांना

अमरावती : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर अंकुश लावण्यासह त्या पीडित महिलांना त्वरित न्याय मिळावा, यासाठी फास्टट्रॅक न्यायालये चालविले जातील. एवढेच नव्हे, तर महिलांना पोलीस ठाण्यात तक्रार अथवा कैफियत मांडावयाची असल्यास तेथे महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र सेल राहणार, अशी माहिती राज्याचे गृह (शहर) व नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली.ना. पाटील हे येथे भाजप कार्यालयात सदस्यता नोंदणी शुभारंभाबाबतच्या माहितीसाठी आयोजित पत्रपरिषदेत उपस्थित झाले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ना. पाटील यांनी गृह आणि नगरविकास विभागाचा कारभार माझ्याकडे असला तरी शिक्षण व आरोग्यसेवेत काम करण्याची आवड असल्याचे मान्य केले. दरम्यान महानगरात दरदिवसाला होणारा गोळीबार, देशी कट्ट्याने हल्ले याविषयावर त्यांचे लक्ष वेधले असता ना. पाटील यांनी यासंदर्भात येत्या २७ डिसेंबर रोजी पोलीस आयुक्तांसोबत बैठक होत असून आढावा घेऊन वस्तुस्थिती जाणून घेऊ, असे ते म्हणाले. पोलीस प्रशासनात ब्रिटिशकालीन परंपरेनुसार सुरु असलेल्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. एखादी घटना झाल्यास त्या प्रकरणाचा तपास तज्ज्ञ अधिकारी ते न्यायालयात सरकारी वकील नेमण्यापर्यंत बदल केला जाणार आहे. ज्या व्यक्तीवर अन्याय झाला त्यांना न्यायालयात न्याय मिळालाच पाहिजे, त्याअनुषंगाने बदल करण्याचा प्रस्ताव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यानुसार कृती आराखडा तयार केला असल्याचे पाटील म्हणाले. तपास अधिकारी असो की सरकारी वकील हे गुणवत्ता आणि पात्रतेनुसारच यापुढे निवड होणार, असे त्यांनी निक्षूण सांगितले. पोलिसांवर असलेला कामाचा ताण बघता त्यांना न्याय देण्याचे पाऊल उचलले जात आहे. त्याकरिता ५०० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून पोलिसांसाठी वसाहतीत चटईक्षेत्र निर्माण करुन ही वसाहत भविष्यात त्यांच्या मालकीहक्काची कशी होईल, त्यानुसार नियमावली आकार घेत असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. ‘एमडी’ सारख्या अंमली पदार्थाने तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. त्यामुळे हे ड्रग्ज शेड्यूल एकमध्ये आणून बंदी विक्री, वाहतुकीवर कायम बंदी घातली जाईल. पोलिसांना सायबर क्राईम रोखणे हे भविष्यात मोठे आव्हान ठरणारे आहे. त्याकरिता स्मार्ट मोबाईलने होणारे गुन्हे रोखण्यासाठी तज्ज्ञ पोलिसांची नेमणूक करण्यावर भर दिला जाणार आहे. संगणक हाताळणे, ई-मेल, अत्याधुनिक प्रशिक्षित पोलीस तयार करण्यावर लक्ष केंद्रित असल्याचे ते म्हणाले. सायबरच्या माध्यमातून होणारे आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी प्रशिक्षित पोलीस नेमले जाईल, असे ना. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)