शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

शहरातील वाढती गुन्हेगारी विधिमंडळात गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:32 IST

वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, अमानुष हत्या प्रकरण आदींमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे ......

ठळक मुद्देसुनील देशमुखांची लक्षवेधी : मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले

अमरावती : वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, अमानुष हत्या प्रकरण आदींमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे आ. सुनील देशमुख यांनी राज्य विधिमंडळ अधिवेशनात गुरुवारी लक्षवेधी सूचना मांडून मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.आ. सुनील देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये दिलेली लक्षवेधी सूचना सभापतींनी मान्य केली. शहरातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची बाब उपस्थित करण्यात आली. सेवानिवृत्त कारागृह अधीक्षक मित्रा आणि शरीरसौष्टव पटू नावेद इकबाल यांची हत्या करण्यात आली. तसेच शहरात काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांकडे देशी कट्टे आढळून आले. शहराच्या कानाकोपºयात अवैध धंदे फोफावले असून नियमबाह्य दारु विक्रीत वाढ झाली आहे. अवैध वाळू वाहतूक, शहरात गुटखा विक्री, गुंडाचा हैदोस आदी प्रकरणांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे आ. सुनील देशमुख म्हणाले. विलासनगरात दिवसाढवळ्या माथेफिरुंकडून धुडगूस घातला जातो. मग पोलीस यंत्रणा काय करते, असा सवाल आ. देशमुखांनी उपस्थित केला. गुन्हेगारी वाढली असताना पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात नाही, हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री रणणित पाटील यांनी लक्षवेधी सूचनेवर निवेदन करताना शहरातील कायदा, सुव्यवस्थेला बाधा पोहचणार नाही, त्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले जातील, अशी ग्वाही दिली. मात्र, पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांचे जीवन असुरक्षित असल्याचे आ. सुनील देशमुख म्हणाले.पोलीस प्रशासनावर ठपकाकायदा व सुव्यवस्थेला पोलीस जबाबदार असल्याचा ठपका आ. सुनील देशमुख यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे मांडला. अवैध धंदे वाढीस लागल्याने गुंडगर्दी फोफावली आहे. वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात पोलीस अपयशी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चोरी, घरफोडी, खून आदींमुळे संघटीत गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाब आ. देशमुखांनी सभागृहात मांडली. अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने चालतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.