शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव तालुक्यात मूळव्याधीच्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST

कोरोनावर उपचार घेतलेला काळा ठरला आरोग्यास अपायकारक : गरम औषधीने केला घात मोहन राऊत धामणगाव रेल्वे : गरम ...

कोरोनावर उपचार घेतलेला काळा ठरला आरोग्यास अपायकारक : गरम औषधीने केला घात

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : गरम पाण्याचा वापर आणि उष्ण औषध घेतले, तर कोरोना होत नाही, या समजातून अनेकांनी गावठी औषध-काढ्यांचा वापर केला. गत एका वर्षात उन्हाळ्याच्या काळात चहा, गरम पाणी आणि उष्ण असलेला काढा वापरला. यामुळे कोरोना बरा झाला नाही, उलट मूळव्याधीचा त्रास अधिक वाढला आहे. तालुक्यात एका वर्षात तब्बल साडेतीन हजार महिला व पुरुषांना मूळव्याध झाला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

केंद्र व राज्य शासनाने गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन घोषित केला. प्रत्येकाला आपल्या जिवाची व कुटुंबाची काळजी असल्याने अनेकांनी उपाय शोधणे सुरू केले. कुणी सकाळी व सायंकाळी उन्हाळ्यात गरम पाणी पिणे, सोबतच सकाळपासून दिवसभर चार ते पाच वेळा चहा पिणे, उष्ण काढा घेणे, उष्ण असलेले पदार्थ दिवसभर सेवन करणे असे प्रकार शहरासह ग्रामीण भागात एक वर्षात विशेषत: उन्हाळ्यात वाढत गेले.

साडेतीन हजार वाढले मूळव्याधीचे रुग्ण गतवर्षी उन्हाळ्यात वाढलेले उच्चांकी तापमान, त्यातच आपल्याला कोरोना होऊ नये म्हणून अनेकांनी उष्ण औषध घेतले. त्यात उष्ण काढ्याचा वापर अधिक केला गेला. गरम औषधीमुळे मूळव्याधीचे प्रमाण अधिक वाढले आहे. धामणगाव तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रे, आठ उपकेंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालयातही मूळव्याधीच्या रुग्णाची नोंद झाली आहे. या रुग्णांना मागील दोन महिन्यांत धड बसता येत नाही व उठता येत नाही. तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांप्रमाणे मूळव्याधीचे रुग्णांचे प्रमाण अधिक वाढले आहे.

कोट

सतत बदलत जाणाऱ्या जीवनशैलीसोबतच कोरोनाची वाढत्या प्रमाणात घेतलेली औषधे शरीरासाठी घातक ठरू शकतात. डॉक्टर सल्ल्याशिवाय मूळव्याधीचे कोणतेही औषध घेऊ नये हीच विनंती.

- डॉ. हर्षल क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी, धामणगाव रेल्वे