शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

सर्दी, खोकल्याच्या रूग्णांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:29 IST

रात्रीचा किमान पारा कमी घसरल्याने थंडी व दुपारी दमट असे दुहेरी वातावरणामुळे सर्दी, खोकला व विषाणूजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देविषाणूजन्य ताप : खासगी रूग्णालये हाऊसफुल्ल!

आॅनलाईन लोकमतअमरावती : रात्रीचा किमान पारा कमी घसरल्याने थंडी व दुपारी दमट असे दुहेरी वातावरणामुळे सर्दी, खोकला व विषाणूजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. खासगींसह शासकीय रूग्णालयांतही रूग्णांची वाढत आहे.येथील इर्विन रूग्णालय, विदर्भ संदर्भ सेवा रूग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या शासकीय रूग्णालयांसह शहरातील शेकडो दवाखाने व क्लिनिकमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे ताप दोन दिवस राहत असेल तर आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे असते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.अशा वातावरणात डासांची उत्पत्तीदेखील वेगाने होत असल्याचे कीटकतज्ज्ञांचे मत आहे. मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारातही वाढ झाली असून अमरावती येथील एका खासगी डॉक्टरांकडे डेंग्यू या आजाराचे चार रूग्ण आढळले असून ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टिमटाळा व कोठोडा येथील असल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेला सर्तक राहणे गरजेचे आहे.तापामध्ये जर दूषित पाणी पिण्यात आल्याने टायफाईड, अतिसार यासारख्या आजाराची लागण होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे योग्यवेळी शरीराची काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळा हा इतर ऋतीच्या तुलनेत सर्व जीवसृष्टीला पोषक मानला जातो. मात्र, अचानक वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, थंडीची तीव्रता वाढल्याने वृध्दांना सांधेदुखी, वात, दम्याच्या आराजाने डोके वर काढले आहे. मणक्यांचा त्रास या दिवसाचा वाढत असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञ भूषण सगणे यांनी सांगितले. ताप, खोकला व सर्दीचे रूग्ण वाढत असून जिल्हा रूग्णालयाची रोज १०० ते १५० बाह्यरुग्ण तपासणी होत आहे. खोकला, ताप, सर्दी या आजारांचे रूग्ण उपचारासाठी येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. मात्र, कुठलीही साथ नसल्याचे यावेळी ते म्हणाले.काय आहे व्हायरल इनफेक्शन ?व्हायरल इन्फेक्शन हा सर्वांमध्ये कॉमन आढळणारा आजार आहे. अनेक प्रकारच्या विषाणूंपासून होणारे आजार म्हणजे व्हायरल इन्फेक्शन तो मानवाच्या शरीराच्या कुठल्याही भागाला होऊ शकते. विषाणूजन्य आजारामध्ये ताप येते. व तो कमी जास्त प्रमाणात चढउतार राहु शकतो. लहान मुलांमध्ये या आजाराची लागण लवकर होत असल्याचेही तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केली आहे.विषाणूजन्य आजाराची तशी साथ नाही. पण वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती