शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

सर्दी, खोकल्याच्या रूग्णांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:29 IST

रात्रीचा किमान पारा कमी घसरल्याने थंडी व दुपारी दमट असे दुहेरी वातावरणामुळे सर्दी, खोकला व विषाणूजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देविषाणूजन्य ताप : खासगी रूग्णालये हाऊसफुल्ल!

आॅनलाईन लोकमतअमरावती : रात्रीचा किमान पारा कमी घसरल्याने थंडी व दुपारी दमट असे दुहेरी वातावरणामुळे सर्दी, खोकला व विषाणूजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. खासगींसह शासकीय रूग्णालयांतही रूग्णांची वाढत आहे.येथील इर्विन रूग्णालय, विदर्भ संदर्भ सेवा रूग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या शासकीय रूग्णालयांसह शहरातील शेकडो दवाखाने व क्लिनिकमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे ताप दोन दिवस राहत असेल तर आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे असते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.अशा वातावरणात डासांची उत्पत्तीदेखील वेगाने होत असल्याचे कीटकतज्ज्ञांचे मत आहे. मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारातही वाढ झाली असून अमरावती येथील एका खासगी डॉक्टरांकडे डेंग्यू या आजाराचे चार रूग्ण आढळले असून ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टिमटाळा व कोठोडा येथील असल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेला सर्तक राहणे गरजेचे आहे.तापामध्ये जर दूषित पाणी पिण्यात आल्याने टायफाईड, अतिसार यासारख्या आजाराची लागण होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे योग्यवेळी शरीराची काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळा हा इतर ऋतीच्या तुलनेत सर्व जीवसृष्टीला पोषक मानला जातो. मात्र, अचानक वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, थंडीची तीव्रता वाढल्याने वृध्दांना सांधेदुखी, वात, दम्याच्या आराजाने डोके वर काढले आहे. मणक्यांचा त्रास या दिवसाचा वाढत असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञ भूषण सगणे यांनी सांगितले. ताप, खोकला व सर्दीचे रूग्ण वाढत असून जिल्हा रूग्णालयाची रोज १०० ते १५० बाह्यरुग्ण तपासणी होत आहे. खोकला, ताप, सर्दी या आजारांचे रूग्ण उपचारासाठी येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. मात्र, कुठलीही साथ नसल्याचे यावेळी ते म्हणाले.काय आहे व्हायरल इनफेक्शन ?व्हायरल इन्फेक्शन हा सर्वांमध्ये कॉमन आढळणारा आजार आहे. अनेक प्रकारच्या विषाणूंपासून होणारे आजार म्हणजे व्हायरल इन्फेक्शन तो मानवाच्या शरीराच्या कुठल्याही भागाला होऊ शकते. विषाणूजन्य आजारामध्ये ताप येते. व तो कमी जास्त प्रमाणात चढउतार राहु शकतो. लहान मुलांमध्ये या आजाराची लागण लवकर होत असल्याचेही तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केली आहे.विषाणूजन्य आजाराची तशी साथ नाही. पण वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती