शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांच्या संचमान्यतेत गृहराज्यमंत्र्यांचा ‘शिरकाव’

By admin | Updated: May 25, 2016 00:31 IST

संचमान्यता समायोजनामुळे मुख्याध्यापकांवर गंडांतर येत असल्याच्या पार्श्वभूमिवर शिक्षण विभागाने मंगळवारी आढावा बैठक बोलाविली होती.

आश्वासनांची खैरात : बैठकीत पोहोचले ‘बिन बुलाए मेहेमान’अमरावती : संचमान्यता समायोजनामुळे मुख्याध्यापकांवर गंडांतर येत असल्याच्या पार्श्वभूमिवर शिक्षण विभागाने मंगळवारी आढावा बैठक बोलाविली होती. मात्र, निमंत्रण नसताना गृहराज्यमंत्री रणजित पाटील बैठकीत पोहोचले. यावेळी ना. पाटील यांनी मुख्याध्यापकांशी ‘राजकीय’ संवाद साधून आश्वासनांची खैरात वाटली. गृहराज्यमंत्र्यांच्या या अनोख्या शैलीमुळे शिक्षण विभागही हतबल झाला होता, हे विशेष.राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण विभागाचे शुद्धिकरण करण्याचा चंग बांधला असला तरी त्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना ‘टार्गेट’ करीत शासन निर्णय निर्गमित केल्याची चर्चा आहे. दररोज नवनवीन शासन निर्णयाने शिक्षकवर्ग हतबल झाला आहे. काही महिन्यांपासून संच मान्यता लागू होण्याची भीती मुख्याध्यापकांना होती. मात्र, तुर्तास यातून मुख्याध्यापकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे संचमान्यता देताना किती मुख्याध्यापक अतिरिक्त आणि रिक्त ठरतात, ही वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांची आढावा बैठक बोलावली होती. पाटलांचे भाषणही राजकीयअमरावती : ही बैठक पूर्णपणे प्रशासकीय असताना यात गृहराज्यमंत्र्यांनी शिरकाव केल्याने ही बाब अनेक मुख्याध्यापकांना खटकली. या आढावा बैठकीत ना. रणजित पाटील यांच्यासोबत अमरावती विभागाचे शिक्षक आ.श्रीकांत देशपांडे यांनी देखील हजेरी लावल्याने मुख्याध्यापकांच्या आढावा बैठकीला राजकीय स्वरूप आले होते. शिक्षण विभागाकडून आढावा बैठकीचे ना. रणजित पाटील, आ. श्रीकांत देशपांडे यांना निमंत्रण नसताना ते पोहचले कसे?, हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे. संचमान्यता समायोजनाच्या बैठकीत ना.ेपाटील यांचे भाषण दिलासा देण्याऐवजी पूर्णत: राजकीय ठरल्याने मुख्याध्यापकांमध्ये प्रचंड संताप पसरला होता. आढावा बैठकीला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सी.आर.राठोड, उपशिक्षणाधिकारी कांबे, बोलके आदी उपस्थित होते.शिक्षक संघर्ष समितीकडून प्रश्नांची सरबत्तीराज्यात शिक्षकांचे प्रश्न, समस्या कायम असताना ते सोडविण्यात ना. रणजित पाटील अथवा आ. श्रीकांत देशपांडे यांना अपयश आल्याचा आरोप करुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. शिक्षक संघर्ष समितीचे शरद तिरमारे, प्रवीण गुल्हाने, विकास दुबे आदींनी ना. पाटील यांना निरुत्तर केले. संचमान्यतेसाठी सांस्कृ तिक भवनाची गरज होती काय? हा कार्यक्रम राजकीय कसा? असे प्रश्न शिक्षक संघर्ष समितीने मांडले. विना अनुदानीत शाळांचे प्रश्न सोडविण्याऐवजी राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. वेतनाचा प्रश्न रखडल्याचे यावेळी मांडण्यात आले. सांस्कृतिक भवनाचे बुकिंग केले कुणी?संचमान्यतेविषयी मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असला तरी या बैठकीसाठी संत ज्ञानेश्वर संकूल कोणी बुक केले, हा विषय चर्चेचा ठरला आहे. संत ज्ञानेश्वर भवनात बैठक घेण्याची परवानगी शिक्षण विभागाने घेतली काय? आणि भाडे कोण अदा करणार ? असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.गृहराज्यमंत्र्यांचा पदवीधर निवडणुकीवर डोळामुख्याध्यापक पदवीधर मतदार संघाचे मतदार असल्याने ना. रणजित पाटील ही संधी ‘कॅश’ करण्यासाठी थेट बैठकीला उपस्थित झाले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मुख्याध्यापकांचे सहकार्य मिळेल, अशी त्यांना आशा होती. मात्र, बैठकीनंतर मुख्याध्यापकांच्या प्रतिक्रिया ना. रणजित पाटील यांच्याविरोधात उमटल्यात.