शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

साहित्यरत्न सुदामदादा सावरकर साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 18:19 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे संकलन आणि संपादन करून ते संपूर्ण साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहित्यरत्न सुदामदादा सावरकर यांनी केले.

तिवसा (अमरावती) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे संकलन आणि संपादन करून ते संपूर्ण साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहित्यरत्न सुदामदादा सावरकर यांनी केले. राष्ट्रसंतांच्या जीवनावर जीवनपयोगी नावाचे ११ खंड लिहून राष्ट्रसंतांचे खरे चरित्र जगापर्यंत नेणारे सुदामदादा हे सर्वोत्तम साहित्यिक होते, असे प्रतिपादन साहित्यिक सतीश तराळ यांनी केले. 

श्रीक्षेत्र वरखेड येथे आयोजित दोन दिवसीय साहित्यरत्न सुदामदादा सावरकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानाहून सतीश तराळ यांनी मार्गदर्शन केले. शनिवारी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात झाली. ह.भ.प. लक्ष्मणदास काळे महाराज यांनी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी विचारपीठावर अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे, साहित्यिक सुभाष सावरकर, विघे गुरुजी, जि.प. सदस्य अभिजित बोके, रामचंद्र कांडलकर, प्रल्हाद पारिसे, सरपंच मालू बोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटक ह.भ.प. लक्ष्मणदास काळे महाराज यांनी आपल्या रसाळ वाणीतून सुदामदादा आणि राष्ट्रसंतांच्या कार्याची महती विशद केली. याप्रसंगी जनार्दन बोथे, सुभाष सावरकर यांचीही भाषणे झाली. संचालन मंदा नांदूरकर व आभार प्रदर्शन रमेश बोके यांनी केले. कार्यक्रमाला श्रीगुरुदेवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.