शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मेळघाटात चारचाकी दीडशे फूट दरीत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2022 22:29 IST

Amravati News अकोट येथून मेळघाटच्या धारणी तालुक्यातील आदिवासी भागातील बाजारांमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांचे चारचाकी वाहन राणीगावनजीक दीडशे फूट दरीत कोसळले.

ठळक मुद्देचार ठार, सात गंभीर, मृतांमध्ये अकोटच्या भाजीपाला विक्रेत्यांचा समावेश

 

अमरावती: अकोट येथून मेळघाटच्या धारणी तालुक्यातील आदिवासी भागातील बाजारांमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांचे चारचाकी वाहन राणीगावनजीक दीडशे फूट दरीत कोसळले. यामध्ये चार ठार, तर आठ जण गंभीर झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली. गंभीर जखमींना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांनुसार, चालक केशव शिवाजी बनसोड (रा. अडगाव), सय्यद समशेर (रा. अकोट) अशी मृतांची नावे आहेत, तर अन्य दोन मृतांची नावे पुढे आलेली नाहीत. धारणी उपजिल्हा रुग्णालयात जखमी शरीफ खान सरदार खान रेडिमेड वाले (३८), जरीफ खान शब्बीर खान चाबीवाले (३२), प्रफुल हरोडे ऊर्फ पिंटू (५०), समीर बेग अकबर बेग (३५), श्रीकृष्ण श्यामराव कोथडकर (४७), सय्यद जाफर (४०, सर्व रा. अकोट व हिवरखेड) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धारणी तालुक्यातील सुसर्दा येथे बुधवारी आठवडी बाजार होता. त्यासाठी नेहमीप्रमाणे अकोट हिवरखेड परिसरातील भाजीपाला विक्रेते मिनीडोरने आले होते. बाजार आटोपून सायंकाळी परत जात असताना राणीगावनंतर असलेल्या जंगलातील घाटवळणाच्या उतार रस्त्यावर एमएच ३० एबी १५३८ क्रमांकाच्या या वाहनाला भीषण अपघात झाला. ते उसळून एका झाडाला अडकले. त्यात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर दोघांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेत असताना मृत्यू झाला. जखमी व्यापाऱ्यांवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या गंभीर जखमींना स्थानिक नागरिकांसह वहीद नामक सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आले.

व्याघ्र प्रकल्पाच्या नाक्याने वाढला वाहनवेग

अकोट, हिवरखेड, अडगाव या परिसरातून किरकोळ भाजीविक्रेते सुसर्दा येथील आठवडी बाजारासाठी आले होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत धूळघाट रेल्वे येथील नाका सायंकाळी सहा वाजता बंद होतो. त्यानंतर कुठलेच वाहन सोडले जात नाही. यामुळे चालकाने भरधाव नेलेले वाहन अनियंत्रित होऊन राणीगावनजीकच्या उतार वळणावरील दीडशे फूट दरीत कोसळले.

अपघातात दोन मृतांची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस कर्मचारी रवाना झाले आहेत. साधारणत: ७ ते ९ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. नावे अप्राप्त आहेत.

- सुरेंद्र बेलखेडे, ठाणेदार, धारणी

टॅग्स :Accidentअपघात