शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

अमरावतीत पाच महिन्यांत ११०३ नागरिकांना सर्पदंश, दोघांचा मृत्यू

By उज्वल भालेकर | Updated: September 13, 2023 19:13 IST

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. पावसाचे पाणी बिळांमध्ये घुसल्याने साप बाहेर येतात.

अमरावती : जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये १,१०३ नागरिकांना सर्पदंश झाला असून, दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाल्याची नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे. या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात रोज सरासरी सहा तर चार तासांत एका नागरिकाला सर्पदंश होत असल्याचे दिसून येते. सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना या ग्रामीण भागात आहेत; परंतु, स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंशावरील उपचार न करताच रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. पावसाचे पाणी बिळांमध्ये घुसल्याने साप बाहेर येतात. त्यामुळे सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना या ग्रामीण भागात घडतात. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रामध्येही सर्पदंशावरील उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे पुरविण्यात येतात. परंतु, बहुतांश आरोग्य केंद्रांत उपचाराच्या सुविधा असतानाही येथील डॉक्टर उपचार न करताच संबंधित रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात रेफर करीत असल्याने उपचार मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे रुग्णांची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :snakeसाप