शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत पाच महिन्यांत ११०३ नागरिकांना सर्पदंश, दोघांचा मृत्यू

By उज्वल भालेकर | Updated: September 13, 2023 19:13 IST

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. पावसाचे पाणी बिळांमध्ये घुसल्याने साप बाहेर येतात.

अमरावती : जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये १,१०३ नागरिकांना सर्पदंश झाला असून, दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाल्याची नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे. या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात रोज सरासरी सहा तर चार तासांत एका नागरिकाला सर्पदंश होत असल्याचे दिसून येते. सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना या ग्रामीण भागात आहेत; परंतु, स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंशावरील उपचार न करताच रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. पावसाचे पाणी बिळांमध्ये घुसल्याने साप बाहेर येतात. त्यामुळे सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना या ग्रामीण भागात घडतात. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रामध्येही सर्पदंशावरील उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे पुरविण्यात येतात. परंतु, बहुतांश आरोग्य केंद्रांत उपचाराच्या सुविधा असतानाही येथील डॉक्टर उपचार न करताच संबंधित रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात रेफर करीत असल्याने उपचार मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे रुग्णांची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :snakeसाप