शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

अमरावतीत पाच महिन्यांत ११०३ नागरिकांना सर्पदंश, दोघांचा मृत्यू

By उज्वल भालेकर | Updated: September 13, 2023 19:13 IST

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. पावसाचे पाणी बिळांमध्ये घुसल्याने साप बाहेर येतात.

अमरावती : जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये १,१०३ नागरिकांना सर्पदंश झाला असून, दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाल्याची नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे. या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात रोज सरासरी सहा तर चार तासांत एका नागरिकाला सर्पदंश होत असल्याचे दिसून येते. सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना या ग्रामीण भागात आहेत; परंतु, स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंशावरील उपचार न करताच रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. पावसाचे पाणी बिळांमध्ये घुसल्याने साप बाहेर येतात. त्यामुळे सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना या ग्रामीण भागात घडतात. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रामध्येही सर्पदंशावरील उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे पुरविण्यात येतात. परंतु, बहुतांश आरोग्य केंद्रांत उपचाराच्या सुविधा असतानाही येथील डॉक्टर उपचार न करताच संबंधित रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात रेफर करीत असल्याने उपचार मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे रुग्णांची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :snakeसाप