शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अमरावती जिल्ह्यात वर्षात १०१९ बालकांचा मृत्यू, ३५ माता दगावल्या

By उज्वल भालेकर | Updated: June 8, 2024 21:35 IST

वर्षभरात ३२ हजार ३९४ बालकांचा झाला जन्म, ४८१ उपजत मृत्यू 

अमरावती : जिल्ह्यातील बालमृत्यू आणि कुपोषण अजूनही तितकेच गंभीर असल्याचे आरोग्य विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात १०१९ बालकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ४८१ मृत्यू हे उपजत असून, आरोग्य विभागाकडून उपजत मृत्यू रोखण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वर्षभरात ३२ हजार ३९४ बालकांचा जन्म झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. विविध सामाजिक संस्थांनाही कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पुरविला जातो. तरीही जिल्ह्यातील बालमृत्यूचे चक्र थांबलेले नाही. जिल्ह्यात रोज सरासरी दोन बालकांचा मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आजही मेळघाटातील नागरिकांना आरोग्याच्या अपुऱ्या सोयी-सुविधा असल्याने अनेक गंभीर बालकांना अमरावती येथे जिल्हा स्त्री रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे.

मेळघाटातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे प्रत्येक वेळी आश्वासन मिळते. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना राबविण्यात येत नसल्याचे सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक बालमृत्यू, उपजत मृत्यू तसेच मातामृत्यूचे प्रमाण हे मेळघाटातील आदिवासी क्षेत्रातील आहे.

३५ माताही दगावल्याआरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात वर्षभरात ३५ मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये मेळघाटातील मातांची संख्या अधिक आहे. वेळीच उपचाराच्या सुविधा न मिळणे तसेच प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्राव होणे, शरीरात हिमोग्लोबीन कमतरता, गर्भधारण काळात योग्य आहार न मिळणे अशी अनेक कारणे माता मृत्यूला जबाबदार आहेत.

वर्षभरात ३२१६४ महिलांची प्रसूतीजिल्ह्यात २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये १७ हजार ७६४ नैसर्गिक, तर १४ हजार ४०० प्रसूती ही सिझेरियन असे एकूण ३२ हजार १६४ महिलांची प्रसूती झाली. यामध्ये ३२ हजार ३९४ बालकांचा जन्म झाला असून, १६ हजार ८२६ मुले, तर १५ हजार ५६८ मुलींचा जन्म झाला आहे.

ठोस उपाययोजनांची आवश्यकतामेळघाटातील बालमृत्यू व माता मृत्यू रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. शासनाने येथील अतिदुर्गम भागातील गावांमध्ये आरोग्याच्या सोयी-सुविधा पोहोेचविण्यासाठी विशेष भर देण्याची गरज आहे. येथील काही दुर्गम भागात आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत असल्याचेच चित्र पाहायला मिळते. तसेच येथील आदिवासींमध्ये प्रसूतीसाठी रुग्णालयात येण्यासाठी समुपदेशन आवश्यक असून, मेळघाटात आरोग्य सुविधा वाढवून येथील रेफरचे प्रमाणही थांबविणे गरजेचे आहे.

वर्षभरातील बाल मृत्यू व माता मृत्यूची आकडेवारीउजपत मृत्यू : ४८१० ते १ वर्ष अर्भक मृत्यू : ४७६१ ते ५ वर्षे बालमृत्यू : ६२मातामृत्यू : ३५एकूण मृत्यू : १ हजार ५४