शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

जल, वायू, भूमीच्या संगोपनातून जमिनीचे आरोग्य सुधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:14 IST

कृषिउद्योग प्रामाणिकपणे व संशोधक वृत्तीने केल्यास शेती नफ्यात राहते. जल, वायू व भूमीचे संगोपन नीट केल्यास शेतीचे आरोग्य चांगले राहते आणि मिश्र पिकांतून शेती व्यवसायात प्रगती साध्य करता येते, ...

ठळक मुद्देशंकर खोत : वरूडमध्ये राष्ट्रीय कृषी परिषदेचे थाटात उद्घाटन

आॅनलाईन लोकमतवरूड : कृषिउद्योग प्रामाणिकपणे व संशोधक वृत्तीने केल्यास शेती नफ्यात राहते. जल, वायू व भूमीचे संगोपन नीट केल्यास शेतीचे आरोग्य चांगले राहते आणि मिश्र पिकांतून शेती व्यवसायात प्रगती साध्य करता येते, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्यातील कराड येथील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शेतकरी शंकरराव खोत यांनी केले.स्थानिक बाजार समितीच्या आवारात राष्ट्रीय कृषी विकास परिषदेचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू भाले यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी शंकरराव खोत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. वसुधा बोंडे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार आशिष बिजवल, नगराध्यक्ष स्वाती आंडे, मोर्शीच्या नगराध्यक्ष शीला रोडे, शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष रूपेश मांडवे, बाळू मुरूमकर, अर्चना मुरूमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ए.एस. खर्चान, उपविभागीय कृषी अधिकारी जी.टी. देशमुख याप्रसंगी उपस्थित होते.तीन दिवसीय राष्ट्रीय कृषी परिषदेचे आयोजन आ. अनिल बोंडे यांनी केले आहे. उद्घाटनानंतर मातीपरीक्षणाचे महत्त्व, शेतीपूरक व्यवसायाची श्रीमंती, वातावरणातील बदलाचा परिणाम, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यशेती, पशुपालन व दुग्धव्यवसाय, मशरूम, लागवड आदी नफ्याच्या शेतीबाबत सुवर्ण कोकण समूहाचे सतीश परब यांनी मार्गदर्शन केले. संचालन बंटी कोहळे व आभार प्रदर्शन राजकुमार राउत यांनी केले.