शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आरोपींना तत्काळ अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:05 IST

स्थानिक पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री काहींना ताब्यात घेतल्याने शुक्रवारचा नियोजित बंद व्यापाऱ्यांनी मागे घेतला आहे. बुधवारी तीन व्यापाऱ्यांवर चाकू व दगडाने हल्ला व प्रतिष्ठानांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक न केल्यास शुक्रवारपासून शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय सर्व व्यापारी संघटनांनी घेतला होता.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : काहींना ताब्यात घेतल्याने बंद मागे

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : स्थानिक पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री काहींना ताब्यात घेतल्याने शुक्रवारचा नियोजित बंद व्यापाऱ्यांनी मागे घेतला आहे. बुधवारी तीन व्यापाऱ्यांवर चाकू व दगडाने हल्ला व प्रतिष्ठानांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक न केल्यास शुक्रवारपासून शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय सर्व व्यापारी संघटनांनी घेतला होता. तसे निवेदन त्यांनी गुरुवारी पालकमंत्री व जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. वृत्त लिहिस्तोवर शहरातील अनेक व्यापारी पोलिस ठाण्यात बसलेले होते.मंगळवारी परतवाडा शहरातील पेन्शनपुरा भागात सल्लू ऊर्फ सलमानची धारदार शस्त्राने दीपक ऊर्फ झाशी कुंबलेले याने त्याच्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने हत्या केली होती त्यानंतर बुधवारी दुपारी १० वाजता ५० ते ६० च्या जमावाने येथील काही दुकानांवर दगडफेक करून चाकूने व्यापाऱ्यांना गंभीर जखमी केले. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. शहरातील मुख्य मार्गावरील स्नेहा बुक डेपोनजीक ठिय्या आंदोलन केले होते. हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची मागणी व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन केली. हल्लेखोरांचा शोध आहे. संबंधित हत्या प्रकरणात व्यापाऱ्यांचा कुठलाच संबंध नसताना विशिष्ट समाजाच्या जमावाने तेथे दगडफेक केल्याने जुळ्या शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला. उजिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके स्वत: जनता दरबाराच्या निमित्ताने शहरात उपस्थित होते. त्यामुळे प्रत्येक वेळी ते घटनेचा आढावा घेत अधिकाऱ्यांना निर्देश देत होते. बुधवारी दिवसभर ठिय्या आंदोलनानंतर व्यापारी संघटना व व्यापाऱ्यांनी सायंकाळी पुन्हा पोलिस ठाण्यात धाव घेतली.गुरुवारचा आठवडी बाजार दहशतीखालीदोन दिवस बाजारपेठ बंद असताना गुरुवारीसुद्धा परिस्थिती पूर्णत: निवळली नसल्याने नेहमीप्रमाणे गर्दी दिसून आली नाही. अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावला होता. सर्व प्रतिष्ठाने उघडी असताना खरेदीसाठी नागरिक फिरकलेच नाहीत.तीन टीम गठितबुधवारी शहरात दहशत पसरविणाºया हल्लेखोरांचा शोध प्रतिष्ठानाबाहेर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी घेतला. त्यातून अनेकांची ओळख पटल्याची माहिती आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे तीन पथक गठीत केले आहत बुधवारी प्रतिष्ठानांवर दगडफेक व चाकू हल्ला केल्यानंतर हे हल्लेखोर शहरातून पसार झाल्याची माहिती आहे पोलिसांनी गुरुवारी रात्रीसुद्धा त्यांची झडती घेतली. मात्र, हल्लेखोर दिसले नाही. फिर्यादी लखन श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ६० ते ७० आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत.गुरुवारी व्यापाऱ्यांचे निवेदन प्राप्त झाले. त्यांच्यासोबत चर्चा केली. आरोपींना तत्काळ अटक करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यादृष्टीने व्यापारी व नागरिकांना सहकार्याचे आव्हान केले आहे.- प्रवीण पोटे,पालकमंत्री अमरावती

टॅग्स :Pravin Poteप्रवीण पोटे