शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वलगावातील अवैध दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:21 IST

वलगावातील चांदूरबाजार रोडवर अवैध दारूगुत्त्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लहान मुले व्यसनांच्या विळख्यात अडकले असून, आत्महत्येची पाळी आपल्याच्या तीव्र प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देमहिलांवर आत्महत्येची पाळी : पोलिसांचे सहकार्य असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : वलगावातील चांदूरबाजार रोडवर अवैध दारूगुत्त्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लहान मुले व्यसनांच्या विळख्यात अडकले असून, आत्महत्येची पाळी आपल्याच्या तीव्र प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत. पोलिसांच्या ‘आशीर्वादा’नेच अवैध दारूगुत्त्यांना ऊत आल्याचा आरोप महिलांसह नागरिकांनी केला आहे.समतानगर, बाजारपुरा, सतीनगर, देवीपुरा व भीमनगर परिसरात सर्वाधिक अवैध दारूची विक्री सुरू असून, त्यावर कोणाचे अंकुश नाही. या अवैध दारूविक्रीमुळे, त्या परिसरातून ये-जा करणाऱ्या लहान मुलांसह महिलांवर वाईट परिमाण होऊ लागले आहे. त्याच परिसरात अंगणवाड्या, शाळा-महाविद्यालये असून, ये-जा करणाºया मुला-मुली त्रस्त झाले आहेत. मद्यपी रोडवरच लघुशंका करीत असल्यामुळे मुलींसाठी ही बाब लाजीरवाणी ठरत आहे. याबाबत शेकडो महिलांनी पोलीस निरीक्षकांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यावर दखल घेतल्या गेली नाही. महिलांनी पोलीस आयुक्तांचेही दार ठोठावले आहे. मात्र, आजपर्यंत ठोस कारवाई झाली नसल्याची ओरड नागरिक करीत आहे. या अवैध दारूच्या विळख्यात अडकलेल्या काही तरुणांचे मृत्यूदेखील झाले असून, अनेकांची संसारे उघड्यावर आले आहे. तरीसुद्धा प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहे.अवैध धंद्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी माया पिसाळकर, वच्छला खांडेकर, तारा रामटेके, वर्षा गजभिये, कांता शेंडे, शोभा सावरकर, सूरज खांडेकर, सतीश गेडाम, आशिष शेंडे आीदंनी केली आहे.पोलीस मित्राचाही आरोपवलगाव हद्दीत अवैध दारूगुत्ते पोलिसांच्या ‘आशीर्वादा’नेच चालतात. मात्र, पोलीस निरीक्षक काही म्हणत नाही. सीपींना तक्रार केली; मात्र काही झाली नाही. असा आरोप पोलीस मित्र सूरज खांडेकर यांनी केला आहे. पोलीस मित्र असल्यामुळे पोलीस प्रशासनातील बारकावे सूरजला खडान् खडा माहिती आहेत. त्यामुळे हे अवैध धंदे पोलिसांच्या संगनमताने सुरू असल्याचा सूरजचा आरोप आहे.परवानाधारक दारूविक्री थांबवता येत नाही. अवैध दारुविक्री सुरू असेल, तर तक्रार करावी; आम्ही कारवाई करू. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारक्षेत्रातील ते काम आहे.- दुर्गेश तिवारी, पोलीस निरीक्षक, वलगाव ठाणे.

टॅग्स :liquor banदारूबंदी