शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात वनसंरक्षण कार्याचे सुधारित मापदंड दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:08 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार वनसंरक्षणार्थ मापदंड निर्धारित आहेत. मेळघाटात हे मापदंड दुर्लक्षित करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देवनांचे अस्तित्व धोक्यात : चराईकरिता हिरव्या बांबूचीही कटाई, जंगलात पाळीव जनावरांच्या हेटी

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार वनसंरक्षणार्थ मापदंड निर्धारित आहेत. मेळघाटात हे मापदंड दुर्लक्षित करण्यात आले आहेत.वनसंरक्षणार्थ वनअधिकाऱ्यांनी करावयाचे दौरे व रात्रीच्या मुक्कामाच्या अनुषंगाने निर्धारित मापदंड अंतर्गत वर्षभरात वनपरिक्षेत्र अधिकाºयांना २१० दिवस, सहायक वनसंरक्षकांना १८० दिवस, उपवनसंरक्षकांना १५० दिवस, विभागीय वनअधिकारी (दक्षता) यांना १२० दिवस आणि वनसंरक्षकांकरिता १२० दिवस निर्धारित आहेत. हा मापदंड कमीत कमी असून, यापेक्षा अधिक दौरे व रात्रीचे मुक्काम ते करू शकतात.अवैध वृक्षतोड अंतर्गत सागवान वृक्षांची संख्या २५ ते ५० पर्यंत असल्यास संवेदनशील, ५० च्या वर असल्यास अतिसंवेदनशील नियतक्षेत्रात मोडते. याप्रकारे नियतक्षेत्राची वर्गवारी निर्धारित करण्याची जबाबदारी वनसंरक्षकांची असून, कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीस ही वर्गवारी निश्चित करणे आवश्यक ठरते. यात वनगुन्ह्यांची संख्या, वनवणवा, अवैध वनचराई, अवैध शिकार आणि नियत क्षेत्रातील अतिक्रमणाच्या घटना विचारात घ्याव्या लागतात.निर्धारित मापदंडानुसार सहायक वनसंरक्षकांनीही या नियतक्षेत्रांना नियमित भेटी देऊन अवैध वृक्षतोडीवर लक्ष केंद्रित करून वनसंरक्षणार्थ उपाययोजना करणे आवश्यक ठरते. आरागिरणी तपासणीच्या मापदंडानुसार वनपरिक्षेत्र अधिकाºयाला दरमहा १२ आरागिरण्यांची तपासणी करणे बंधनकारक आहे. दरमहा सहा आरागिरण्यांची तपासणी सहायक वनसंरक्षकांना, चार आरागिरण्यांची तपासणी उपवनसंरक्षकांना, तर दोन आरा गिरण्यांची तपासणी वनसंरक्षकांना करावयाची आहे. तपासणीचे सर्व निकष पाळून प्रत्यक्ष तपासणी करावयाची असून, यावर मुख्य वनसंरक्षकांना नियंत्रण ठेवायचे आहे. जनहित याचिका क्र. १२७७/२२००, शोभाताई फडणवीस विरूद्ध महाराष्टÑ शासन प्रकरणी नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार वनसंरक्षणार्थ हे सुधारित मापदंड निर्गमित केल्या गेलेत. त्यांचे पालन करण्याचे निर्देशही दिले गेले. परंतु, हे मापदंड वनविभागात दुर्लक्षित झाले आहेत. यात वनअधिकाºयांचे जंगलावरील नियंत्रण संपुष्टात आल्यागत स्थिती निर्माण झाल्याने वनांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.तूप आणि दूधहेटी आणि हेटीवरील जनावरांचा जंगलात मुक्त संचार व्हावा म्हणून वनपरिक्षेत्रातील वनअधिकाºयाला दहा किलो तुप आणि वर्षभर दही-दूध फुकट देण्याचा अलिखित करार प्रचलित आहे. वनअधिकाºयाच्या सोबतीला असलेल्या डिप्टीला पाच किलो तूप, बीट गार्डला दोन किलो तूप आणि दही-दूध वर्षभर फुकट पुरविले जाते.हेटीपूर्व मेळघाट वनपरिक्षेत्रासह व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात, क्षेत्रालगतच्या जंगलात आत पाळीव जनावरांच्या हेटींची संख्या वाढली आहे. यातील एका हेटीवर जवळपास शंभर ते दीडशे जनावर बघायला मिळत आहेत. यात गाई, म्हशी, बकºया, मेंढ्यांचा समावेश आहे. यात मध्य प्रदेशातील जनावरांचाही भरणा अधिक आहे. मोजक्याच जनावरांकरिता चराई पास काढून, त्यावर शेकडो जनावरे जंगलात चारली जात आहेत. या चराईकरिताही हिरव्या बांबूची अवैध कटाई मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हशीला हिरवा बांबू अधिक आवडत असल्यामुळे हेटीवरील जनावरांकरिता एका दिवसाला दोनशे ते तीनशे बांबू कापले जात आहेत. यासोबतच केकडच्या झाडाचीही कत्तल होत आहे. दुसरीकडे या अवैध चराईने जंगलात निसर्गत: निघालेली रोपे जनावरांच्या पायाखाली तुडवली जात आहेत.हिरवा बांबूपूर्व मेळघाट वनविभागांतर्गत असलेल्या जारिदा, चिखलदरा, घटांग वनपरिक्षेत्रात हिरव्या बांबूची अवैध कत्तल केली जात आहे. जारिदा वनपरिक्षेत्रासह मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत जारिदा वनपरिक्षेत्राला लागून आणि मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या भागातून ही बांबूतोड मोठ्या प्रमाणात आहे. या हिरव्या बांबूची तस्करी मध्य प्रदेशात केली जात आहे.