शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

कार्ड स्वॅप केल्यास पडतोय १० रुपयांचा भुर्दंड

By admin | Updated: December 23, 2016 00:16 IST

सरोज चौकातील खादी भंडारने नवा जवाईशोध लावला आहे. एखाद्या ग्राहकाने येथे खरेदी केली असेल व ...

ग्राहकांची लूट : राष्ट्रीय खादी भंडारचा ‘जावईशोध’ संदीप मानकर अमरावती सरोज चौकातील खादी भंडारने नवा जवाईशोध लावला आहे. एखाद्या ग्राहकाने येथे खरेदी केली असेल व त्यांना कॅशलेस व्यवहाराठी एटीएम कार्डने स्वॅप पेमेंट केले असेल तर प्रत्येक ग्राहकाला स्वॅप करण्याचे १० रुपये अतिरिक्त द्यावे लागत आहे. हे शासनाच्या धोरणाला तिलांजली आहे. नोटाबंदीच्या काळात असा नवा भ्रष्टाचार होत असेल तर याला आळा कोण घालणार, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. सविस्तर असे की, दर्यापूर येथील सचिन मानकर नामक ग्राहक सरोज टॉकीजजवळील राष्ट्रीय खादी भंडारमध्ये कपडे खरेदीसाठी गेले, त्यांनी १७८० रुपयांची खरेदी केली. ७८० रुपयांचे नगदी पैेसे दिले. व हजार रुपये स्वॅपने पे केले. मात्र कॅशलेस व्यवहारासाठी त्यांनी राष्ट्रीय खादी भंडारच्या मालकाला, एटीएम दिले. तुमचे जेवेढे पेमेंट झाले आहे त्या व्यतिरक्त कार्ड स्वॅप करण्याचे १० रुपये आगाऊ द्यावे लागतील, असे ते म्हणाले. ग्राहकाने १० रुपये देण्यास नकार दिला असता ते पैसे द्यावेच लागेल, आम्ही पैसे देऊन मशीन विकत घेतली आहे. यावरच तर आमचा घरखर्च चालतो, असेही ग्राहकाला बजावण्यात आले, असे म्हणाले, मात्र १० रुपयांसाठीचा वाद असल्याने त्याच्याशी अधिक न बोलता एटीएमने पेमेंट करून त्याला १० रुपये आगाऊ संबंधित ग्राहकाने दिले. त्यामुळे शासनाने नोटाबंदी केल्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी सक्तीचे प्रयत्न केल्या जात आहे. स्वॅप मशीनच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहाराचे धोरण आहे. पण अशा प्रकारचा हा प्रकार होत असेल तर याला जिल्हाधिकाऱ्यांनी आळा घालावा, अशी मागणी होत आहे. प्रकरणाची व्हावी चौकशी शासनाचे कॅशलेस व्यवहार करण्याचे धोरण आहे. देशात होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसावा, याकरिता शासनाने हजार व पाचशे रुपयांच्या नोटाबंदीचा क्रांतिकारी निर्णय घेतला. पण आता कॅशलेस व्यवहारासाठी अनेक व्यापारी व दुकानदार स्वॅप मशीनचा वापर करीत आहे. पण काही दुकानदार कार्ड स्वॅप करायाचे असेल तर १० रुपये अतिरिक्त मोजावे लागेल, असा फंडा वापरत आहे. ही तर ग्राहकांची शुध्द लूट आहे. त्यामुळे असा प्रकार करणाऱ्याविरुद्ध कारवार्इंचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय खादी भंडार हे शासनाच्या ग्रामोद्योगाला उत्तेजन देण्याच्या उद्देशाने याला चालना देण्याच्या हेतुने शासन अशा खादींच्या दुकानांना सबसिडी देते. परंतु असे दुकानदारच असा प्रकार करीत असतील तर अनेक व्यापाऱ्यांनी याचा काय आदर्श घ्यावा, हा प्रश्नही पुढे येत आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहाराला ही अडचण ठरू पाहत आहे. मी बुधवारी राष्ट्रीय खादी भंडारमधून १७८० रुपयांची खरेदी केली. ते बिल देताना स्वॅप मशीनचा वापर केला असता स्वॅप मशीनने पेमेंट कराल तर १० रुपये शिल्लक द्यावे लागतील. दुकानदाराशी वाद घातल्यानंतरही १० रुपये द्यावेच लागले. नाहीतर कपडे परत द्या, अशी अट त्यांनी घातली. - सचिन मानकर, सामाजिक कार्यकर्ता, दर्यापूर