शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

- तर आपले येणे अनमोल ठरेल...

By admin | Updated: November 4, 2014 22:31 IST

राज्याचे पालक अर्थात राज्यपाल सी. विद्यासागर राव आज अमरावती जिल्ह्यात येत आहेत. ज्या अंबानगरीबाबत 'वैभवसंपन्न प्रांत' असा उल्लेख महाभारतकाळातील ग्रंथांतही आढळतो, ती विदर्भाची सांस्कृतिक

निमित्त राज्यपालांच्या आगमनाचेगणेश देशमुख - अमरावतीराज्याचे पालक अर्थात राज्यपाल सी. विद्यासागर राव आज अमरावती जिल्ह्यात येत आहेत. ज्या अंबानगरीबाबत 'वैभवसंपन्न प्रांत' असा उल्लेख महाभारतकाळातील ग्रंथांतही आढळतो, ती विदर्भाची सांस्कृतिक राजधानी महामहिमांच्या आगमनप्रतीक्षेने शहारली आहे. कुटुंबाचा पसारा राज्यभर पसरलेला असताना लोकशाहीतील आमचे हे पालक आमच्या भेटीला आमच्या गावात येताहेत, ही अनुभूती आनंदाच्या उकळ्या आणणारी आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित 'इंद्रधनुष्य २०१४' या दर्जेदार राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्ताने येणारे राज्यपाल विद्यापीठातून उसंत मिळाली की, लगेच धारणीत पोहोचणार आहेत. जंगलांमध्ये राहणाऱ्या, पोटापुरते कमविणाऱ्या, जणू वेगळ्या ग्रहावरील जीव भासावे अशा जीवनशैलीच्या आमच्याच समाजघटकांची ते आस्थेने चौकशी करणार आहेत. कुटुंबातील एक धीट मुलगा भराभर शिकून विदेशातील चमकदार दुनियेत रमावा आणि ओशाळणारा दुसरा गावातच राहून परंपारागत कार्यात मग्न व्हावा, तरीही दोघांमध्ये मायबापांचा सारखाच जीव असावा, अशीच काहीशी भूमिका राज्यपालांच्या नियोजित कार्यक्रमातून व्यक्त होत आहे. वनसंपदेने नटलेले मेळघाट जगाच्या नकाशावर आले तेच मुळी कुपोषणामुळे. कुपोषण घालविण्यासाठी शासनाने पैशांचा पूर वाहवला. त्याचा निर्णायक परिणाम मात्र आजतागायत जाणवला नाही. हा निधी नेमका खर्च होतो तरी कुठे, असा प्रश्न आजही निर्माण होतोच. राज्यातल्या अनेक शहरांत केवळ छंद म्हणून पाळल्या जाणाऱ्या श्वानांच्या उपचारांसाठी अद्ययावत इस्पितळे आहेत. श्वानांची फॅशनेबल वस्त्रे विकणारी दुकाने आहेत. मानवाची प्रगती आणि भूतदयेबाबतची त्याची तरल संवेदना व्यक्त करणारे हे चित्र ज्या राज्यात अस्तित्वात आहे, त्याच महाराष्ट्रातील मेळघाट प्रांतात आजही अन्नावाचून चिमुकल्यांचे अन् उपचाराविना मातांचे जीव जातात, रोजगाराच्या शोधात शहरात येऊन गुलामासमान राबणारी ही आदिवासी मंडळी याच महाराष्ट्राची रहिवासी आहेत ना, असा प्रश्न मनाला भेदून जातो. राज्यपाल महोदय, आपण येताहात. आपले अधिकारी ठराविक ठिकाणी आपणाला नेतील. कदाचित आपल्यासमेर आधीच 'पढविलेले' आदिवासी हजर करतील. 'बडे साहब आ रहे है' हे त्याला आधीच बजावून ठेवण्यात आलेले असेल. आता अशा 'बड्या साहेबां'च्या भेटींचा आणि त्यांच्यासमोर नेमके काय बोलावे लागते, याचा आदिवासींनाही सराव झाला आहे. प्रशासनाची ही नेहमीची पद्धती अमरावती जिल्ह््यालाही अंगवळणी पडली आहे. आमचा राग त्यांच्यावर नाहीच. आहे ती आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची तळमळ. राज्यपाल महोदय, एक विनंती आहे. 'प्रोटोकॉल'ची बंधने झुगारून करता आले तर बघा. अनपेक्षितपणे आपण आदिवासींच्या एखाद्या खेड्याला भेट द्या. आदिवासींशी थेट भेट होऊ द्या. या भेटीतून आपल्याला खरा आदिवासी कळेल. त्याच्या नेमक्या समस्या कळतील. नेमका उपाय योजण्यासाठी ही भेट नाडीपरीक्षणाचे कार्य करेल. केवळ प्रशासनच नव्हे, आदिवासींच्या जीवावर जगणारे अनेक घटक मेळघाटात कार्यरत आहेत. सामाजिक संस्थांचा सुळसुळाट आहे. आदिवासींनी 'आहे तसेच' राहिले तरच या घटकांचे दुकान चालणार आहे. प्रशासनाकडून एक भीषण वास्तव सोयीस्करपणे लपविले जात आहे. नैसर्गिक सानिध्यात राहणाऱ्या काटक अन् निकोप आदिवासींमध्ये चिंताजनक लैंगिक आजारांचे प्रमाण अचानकपणे वाढू लागले आहे. पुरेसे सजग नसलेल्या आदिवासींच्या प्रजातीसाठी भविष्यातील महाप्रलयाचेच हे संकेत आहेत. आदिवासींना मायानगरीची स्वप्ने दाखविणारी अन् त्यांच्या स्वप्नातील शहराची सैर घडवून आणणारी मंडळी आता मेळघाटात पाय रोवू लागली आहे. या विषयाच्या तळाशी जाऊन ३१० गावांतील तीन लक्ष आदिवासींचे नैसर्गिक अस्तित्त्व अबाधित राखता आले तर महामहिम महोदय, आपले येणे ही मेळघाटला मिळालेली अनमोल भेट ठरेल!