शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

अफवा पसरवाल तर होईल कायदेशीर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:35 IST

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवेला राज्यभरात पेव फुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांच्यासह पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी स्पष्ट केले. अशा अफवा पसरविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. संशयित दिसल्यास कायदा हाती न घेता तत्काळ पोलिसांना कळवा, असेही आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.

ठळक मुद्देसीपींचा इशाराकुणावर शंका असेल, तर पोलिसांना कळवा, कायदा हाती घेऊ नका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवेला राज्यभरात पेव फुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांच्यासह पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी स्पष्ट केले. अशा अफवा पसरविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. संशयित दिसल्यास कायदा हाती न घेता तत्काळ पोलिसांना कळवा, असेही आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.जिल्ह्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याची अफवा समाजकंटकांनी पसरविली आहे. राज्यात काही ठिकाणी अशा अफवेने निरपराधांवर हल्ले होऊन जीव गेल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. शहरातील वलगावात अशाप्रकारच्या अफवेला पेव फुटला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवा समाजातील काही समाजकंटक जाणीवपूर्वक पसरवून शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आली असून, जनतेने अशा अफवांना बळी न पडता त्यातील सत्यता पडताळून पाहणे गरजेचे झाले आहे. प्रसंगी शंका आल्यास कायदा हातात न घेता त्वरित संबंधित पोलीस ठाणे, गावातील पोलीस पाटील, पोलीस मित्र, प्रतिष्ठित व सुजाण नागरिकांना सुचित करावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. अफवा पसरविणाºयांची शोधमोहीम पोलिसांनी हाती घेतली असून, त्या अनुषंगाने पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.शंका आल्यास इथे फोन करासोशल मीडियावर अशाप्रकारच्या अफवेचे संदेश व्हायरल केले जात असून, असे संदेश पाठविणे किंवा फॉरवर्ड करणे गु्न्हा ठरू शकतो. अशा अफवा पसरविणाºयांचा शोध पोलिसांनी चालविला असून, संदेश पाठविणाºयाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली. कोणत्याही व्यक्तीवर संशय आल्यास नागरिकांनी कायदा हाती न घेता पोलीस विभागाच्या १०० किंवा ०७२१-२५५१००० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अफवेची भीती बाळगू नकाभीती वाटणे मानवी स्वभावच आहे. सत्य घटना असो की अफवा असो सर्वसामान्य नागरिक घाबरून जातात. मात्र, विनाकरण घाबरणे योग्य नाही. त्याचा परिणाम होणेही साहजिक आहे. अफवेला आधार नसतो. त्यामुळे आपले दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ देऊ नका, आपल्या मनातील शंका किंवा भीती दूर करण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क करा. इर्विनमधील मानसिक उपचार विभागाशी संपर्क केल्यास समुपदेशनातून मनातील शंका किंवा भीती दूर करण्यात येईल, अशी माहिती मनोचिकित्सक अमोल गुल्हाने यांनी दिली.