शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

अफवा पसरवाल तर होईल कायदेशीर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:35 IST

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवेला राज्यभरात पेव फुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांच्यासह पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी स्पष्ट केले. अशा अफवा पसरविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. संशयित दिसल्यास कायदा हाती न घेता तत्काळ पोलिसांना कळवा, असेही आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.

ठळक मुद्देसीपींचा इशाराकुणावर शंका असेल, तर पोलिसांना कळवा, कायदा हाती घेऊ नका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवेला राज्यभरात पेव फुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांच्यासह पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी स्पष्ट केले. अशा अफवा पसरविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. संशयित दिसल्यास कायदा हाती न घेता तत्काळ पोलिसांना कळवा, असेही आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.जिल्ह्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याची अफवा समाजकंटकांनी पसरविली आहे. राज्यात काही ठिकाणी अशा अफवेने निरपराधांवर हल्ले होऊन जीव गेल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. शहरातील वलगावात अशाप्रकारच्या अफवेला पेव फुटला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवा समाजातील काही समाजकंटक जाणीवपूर्वक पसरवून शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आली असून, जनतेने अशा अफवांना बळी न पडता त्यातील सत्यता पडताळून पाहणे गरजेचे झाले आहे. प्रसंगी शंका आल्यास कायदा हातात न घेता त्वरित संबंधित पोलीस ठाणे, गावातील पोलीस पाटील, पोलीस मित्र, प्रतिष्ठित व सुजाण नागरिकांना सुचित करावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. अफवा पसरविणाºयांची शोधमोहीम पोलिसांनी हाती घेतली असून, त्या अनुषंगाने पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.शंका आल्यास इथे फोन करासोशल मीडियावर अशाप्रकारच्या अफवेचे संदेश व्हायरल केले जात असून, असे संदेश पाठविणे किंवा फॉरवर्ड करणे गु्न्हा ठरू शकतो. अशा अफवा पसरविणाºयांचा शोध पोलिसांनी चालविला असून, संदेश पाठविणाºयाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली. कोणत्याही व्यक्तीवर संशय आल्यास नागरिकांनी कायदा हाती न घेता पोलीस विभागाच्या १०० किंवा ०७२१-२५५१००० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अफवेची भीती बाळगू नकाभीती वाटणे मानवी स्वभावच आहे. सत्य घटना असो की अफवा असो सर्वसामान्य नागरिक घाबरून जातात. मात्र, विनाकरण घाबरणे योग्य नाही. त्याचा परिणाम होणेही साहजिक आहे. अफवेला आधार नसतो. त्यामुळे आपले दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ देऊ नका, आपल्या मनातील शंका किंवा भीती दूर करण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क करा. इर्विनमधील मानसिक उपचार विभागाशी संपर्क केल्यास समुपदेशनातून मनातील शंका किंवा भीती दूर करण्यात येईल, अशी माहिती मनोचिकित्सक अमोल गुल्हाने यांनी दिली.