शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

अफवा पसरवाल तर होईल कायदेशीर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:35 IST

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवेला राज्यभरात पेव फुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांच्यासह पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी स्पष्ट केले. अशा अफवा पसरविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. संशयित दिसल्यास कायदा हाती न घेता तत्काळ पोलिसांना कळवा, असेही आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.

ठळक मुद्देसीपींचा इशाराकुणावर शंका असेल, तर पोलिसांना कळवा, कायदा हाती घेऊ नका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवेला राज्यभरात पेव फुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांच्यासह पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी स्पष्ट केले. अशा अफवा पसरविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. संशयित दिसल्यास कायदा हाती न घेता तत्काळ पोलिसांना कळवा, असेही आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.जिल्ह्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याची अफवा समाजकंटकांनी पसरविली आहे. राज्यात काही ठिकाणी अशा अफवेने निरपराधांवर हल्ले होऊन जीव गेल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. शहरातील वलगावात अशाप्रकारच्या अफवेला पेव फुटला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवा समाजातील काही समाजकंटक जाणीवपूर्वक पसरवून शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आली असून, जनतेने अशा अफवांना बळी न पडता त्यातील सत्यता पडताळून पाहणे गरजेचे झाले आहे. प्रसंगी शंका आल्यास कायदा हातात न घेता त्वरित संबंधित पोलीस ठाणे, गावातील पोलीस पाटील, पोलीस मित्र, प्रतिष्ठित व सुजाण नागरिकांना सुचित करावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. अफवा पसरविणाºयांची शोधमोहीम पोलिसांनी हाती घेतली असून, त्या अनुषंगाने पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.शंका आल्यास इथे फोन करासोशल मीडियावर अशाप्रकारच्या अफवेचे संदेश व्हायरल केले जात असून, असे संदेश पाठविणे किंवा फॉरवर्ड करणे गु्न्हा ठरू शकतो. अशा अफवा पसरविणाºयांचा शोध पोलिसांनी चालविला असून, संदेश पाठविणाºयाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली. कोणत्याही व्यक्तीवर संशय आल्यास नागरिकांनी कायदा हाती न घेता पोलीस विभागाच्या १०० किंवा ०७२१-२५५१००० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अफवेची भीती बाळगू नकाभीती वाटणे मानवी स्वभावच आहे. सत्य घटना असो की अफवा असो सर्वसामान्य नागरिक घाबरून जातात. मात्र, विनाकरण घाबरणे योग्य नाही. त्याचा परिणाम होणेही साहजिक आहे. अफवेला आधार नसतो. त्यामुळे आपले दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ देऊ नका, आपल्या मनातील शंका किंवा भीती दूर करण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क करा. इर्विनमधील मानसिक उपचार विभागाशी संपर्क केल्यास समुपदेशनातून मनातील शंका किंवा भीती दूर करण्यात येईल, अशी माहिती मनोचिकित्सक अमोल गुल्हाने यांनी दिली.