शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

चांदूरबाजार तालुक्यातील निमखेड ठरले आदर्श गाव

By admin | Updated: August 30, 2015 00:12 IST

ग्रामपंचायतीत सर्व सदस्यांना अविरोध निवडून देणारे व सरपंच देखील अविरोध निवडून देणारे गाव हे लोकशाहीचे खरे आदर्श ठरले आहे.

सुमित हरकुट चांदूरबाजारग्रामपंचायतीत सर्व सदस्यांना अविरोध निवडून देणारे व सरपंच देखील अविरोध निवडून देणारे गाव हे लोकशाहीचे खरे आदर्श ठरले आहे. लोकशाहीचा पाया मजबूत करणाऱ्या अशा गावांचा शासनाने पुरस्काराने सन्मान करावा. यामुळे हा आदर्श एक लोकचळवळ घेऊन लोकशाही मजबूत करणारे एक पाऊल ठरेल.शासनातर्फे विविध योजनेंतर्गत चांगले काम करणाऱ्या गावाचे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. त्यात आदर्श गाव, स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव, तंटामुक्ती पुरस्कार यासारख्या अनके पुरस्कार आहेत. योजनेंतर्गत चांगले काम करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्यात येतो. गावातील मतभेद विसरून जातीपातीचा विचार न करता संपूर्ण गाव एकमताने ग्रामपंचायत सदस्य व सरपंच निवडून देतात, असे गाव खऱ्या अर्थाने आदर्श गाव ठरतात. अशा गावांमध्ये शासनाच्या प्रत्येक योजनेला व विकासाच्या कामाला परिपूर्ण न्याय दिला जातो. असेच एक गाव चांदूरबाजार तालुक्यातील निमखेड हे आहे. या गावाची लोकसंख्या १०५० इतकी असून त्यात हिंदू, मुस्लिम, बौद्ध तसेच इतर समाजाचे नागरिक राहतात. सर्वांचा व्यवसाय हा शेती तसेच मजुरी आहे. मागील निवडणुकीत या गावात सर्व ग्रामपंचायत सदस्य अविरोध निवडून आले होते व या निवडणुकीत देखील सर्व सदस्य अविरोध निवडून आले आहे व सरपंचदेखील मुस्लिम समाजाच्या नागरिकाला सर्व सदस्यांनी एकमताने केले आहे.तालुक्यातील हे गाव धुरविरहीत चुलीचे पहले गाव ठरले आहे. या गावात वृक्षारोपण, स्वच्छालय, पथदिवे, स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव यासारख्या अनेक योजनांमध्ये अग्रेसर ठरलेले आहेत.पूर्वी आपल्या देशात नगर राज्य होते. या नगर राज्यामध्ये नगरातील सर्व नागरिक मिळून आपला प्रमुख निवडत होते व सर्व संमतीने नगराचा विकास व नगराच्या समस्या सोडविल्या जात होत्या. खऱ्या अर्थाने त्याकाळी लोकशाहीच नांदत होती. पण आता लोकशाहीच्या निवडणुकीमुळे गावात राजकारण शिरून गावातील वातावरण गढूळ होऊन जातीपातीच्या राजकारणामुळे गावांची विभागणी झाली आहे. पण सद्यस्थितीत लोकशाही मजबूत करण्यासाठी जे गाव एकत्र येऊून सर्व सदस्यांसह सरपंचसुद्धा अविरोध निवडून देतात, अशा गावांचा शासनाने पुरस्कार करावा तरच खऱ्या अर्थाने ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे आदर्श गाव निर्माण होईल.