शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
3
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
4
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
5
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
6
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
7
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
8
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
9
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
10
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
11
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
12
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!
13
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
14
Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?
16
"ते मला मराठीत म्हणाले...", उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा
17
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
18
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
19
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
20
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."

चांदूरबाजार तालुक्यातील निमखेड ठरले आदर्श गाव

By admin | Updated: August 30, 2015 00:12 IST

ग्रामपंचायतीत सर्व सदस्यांना अविरोध निवडून देणारे व सरपंच देखील अविरोध निवडून देणारे गाव हे लोकशाहीचे खरे आदर्श ठरले आहे.

सुमित हरकुट चांदूरबाजारग्रामपंचायतीत सर्व सदस्यांना अविरोध निवडून देणारे व सरपंच देखील अविरोध निवडून देणारे गाव हे लोकशाहीचे खरे आदर्श ठरले आहे. लोकशाहीचा पाया मजबूत करणाऱ्या अशा गावांचा शासनाने पुरस्काराने सन्मान करावा. यामुळे हा आदर्श एक लोकचळवळ घेऊन लोकशाही मजबूत करणारे एक पाऊल ठरेल.शासनातर्फे विविध योजनेंतर्गत चांगले काम करणाऱ्या गावाचे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. त्यात आदर्श गाव, स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव, तंटामुक्ती पुरस्कार यासारख्या अनके पुरस्कार आहेत. योजनेंतर्गत चांगले काम करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्यात येतो. गावातील मतभेद विसरून जातीपातीचा विचार न करता संपूर्ण गाव एकमताने ग्रामपंचायत सदस्य व सरपंच निवडून देतात, असे गाव खऱ्या अर्थाने आदर्श गाव ठरतात. अशा गावांमध्ये शासनाच्या प्रत्येक योजनेला व विकासाच्या कामाला परिपूर्ण न्याय दिला जातो. असेच एक गाव चांदूरबाजार तालुक्यातील निमखेड हे आहे. या गावाची लोकसंख्या १०५० इतकी असून त्यात हिंदू, मुस्लिम, बौद्ध तसेच इतर समाजाचे नागरिक राहतात. सर्वांचा व्यवसाय हा शेती तसेच मजुरी आहे. मागील निवडणुकीत या गावात सर्व ग्रामपंचायत सदस्य अविरोध निवडून आले होते व या निवडणुकीत देखील सर्व सदस्य अविरोध निवडून आले आहे व सरपंचदेखील मुस्लिम समाजाच्या नागरिकाला सर्व सदस्यांनी एकमताने केले आहे.तालुक्यातील हे गाव धुरविरहीत चुलीचे पहले गाव ठरले आहे. या गावात वृक्षारोपण, स्वच्छालय, पथदिवे, स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव यासारख्या अनेक योजनांमध्ये अग्रेसर ठरलेले आहेत.पूर्वी आपल्या देशात नगर राज्य होते. या नगर राज्यामध्ये नगरातील सर्व नागरिक मिळून आपला प्रमुख निवडत होते व सर्व संमतीने नगराचा विकास व नगराच्या समस्या सोडविल्या जात होत्या. खऱ्या अर्थाने त्याकाळी लोकशाहीच नांदत होती. पण आता लोकशाहीच्या निवडणुकीमुळे गावात राजकारण शिरून गावातील वातावरण गढूळ होऊन जातीपातीच्या राजकारणामुळे गावांची विभागणी झाली आहे. पण सद्यस्थितीत लोकशाही मजबूत करण्यासाठी जे गाव एकत्र येऊून सर्व सदस्यांसह सरपंचसुद्धा अविरोध निवडून देतात, अशा गावांचा शासनाने पुरस्कार करावा तरच खऱ्या अर्थाने ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे आदर्श गाव निर्माण होईल.