शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आयएएस अधिकारी-मंत्र्यांच्या सलोख्याला बे्रक!

By admin | Updated: October 25, 2014 01:58 IST

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात आयएएस अधिकाऱ्यांच्या मंत्र्यांसोबत असलेल्या सलोख्याला भाजप नेत्यांनी ‘ब्रेक’ देण्याची तयारी चालविली आहे.

गणेश वासनिक अमरावतीराज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात आयएएस अधिकाऱ्यांच्या मंत्र्यांसोबत असलेल्या सलोख्याला भाजप नेत्यांनी ‘ब्रेक’ देण्याची तयारी चालविली आहे. मंत्रालयात एकाच ठिकाणी ठिय्या मांडून बसलेल्या बड्या आयएएस अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. आघाडीच्या काळात भाजप नेत्यांसाठी अडचणीच्या ठरलेल्या आयएएस अधिकाऱ्यांची सरकार स्थापन होताच उचलबांगडी करण्याची तयारी देखील करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.एकनाथ खडसे, देंवेद्र फडणवीस, सुधीर मुंनगंटीवार, विनोद तावडे, भाऊसाहेब पुंडकर, शोभा फडणवीस हे नेते मागील १० ते १५ वर्षापासून विधीमंडळात भाजपचे नेतृत्व करीत आहेत. आघाडी शासनाच्या कार्यकाळात भाजपच्या नेत्यांना ज्या आयएएस अधिकाऱ्यांकडून त्रास झाला, अशांची यादी तयार केली जात आहे. लवकरच राज्यात भाजपचे शासन आरुढ होणार आहे. भाजपचे नेते ठरवतील त्याच आयएएस अधिकाऱ्यांना मंत्रालयात सचिव, अतिरिक्त सचिवपदी कायम राहता येईल, अन्यथा आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंत्र्याशी सलोख्याचे संबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नसल्याची चर्चा हल्ली सुरू आहे.