शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पशुधनाची भूक वाळलेल्या चाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:57 IST

दुष्काळाची दाहकता वाढलेले असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने जिल्ह्यातील ५ लाख १२ हजार ६० दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाऱ्यावर भागवली जात आहे.

ठळक मुद्देदुग्धोत्पादनाला फटका : हिरवे वैरण नसल्याने पशुपालक चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुष्काळाची दाहकता वाढलेले असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने जिल्ह्यातील ५ लाख १२ हजार ६० दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाऱ्यावर भागवली जात आहे. परिणामी दुग्धोत्पादनाला फटका बसत आहे. दुधाळ जनावरांच्या खाद्याकडे विशेष लक्ष दिल्यास दूध वाढविण्यासाठी मोठा फायदा होतो.त्यामध्ये प्रथिने युक्त खाद्य जर त्यांना मिळाले तर गाई, म्हशींचे आरोग्य चांगले राहते. परंतु सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे प्रथिनेयुक्त खाद्य किंवा हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातही वेगवेगळ्या खाद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. हे दर पशुधन पालकांना परवडणारे नाहीत. जिल्ह्यात दृष्काळी स्थिती असल्याने याचा फटका पशुधनालाही अधिक बसत आहे. दृष्काळी परिस्थितीत लहान पशुधनाला प्रतीदिवस २० लिटर साधारणपणे पिण्यास पाणी, तर ३ किलो चारा तर मोठया पशुनाला ४० लिटर पाणी अन ६ किलो चारा लागत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी विहीर, बोअरचे पाणी आटल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेणे कठीण झाले आहे. यामुळे जिल्हाभरातील ५ लाख १२ हजार ६० मोठ्या दुधाळ पशुधनाची भूक सोयाबीन, तूर, हरभरा या वाळलेल्या चाºयावरच भागवावी लागत आहे. किरकोळ ठिकाणीच हिरवा मका, बहूवार्षिक थोंब्याचा चारा पशुधनाला टाकला आहे. सध्या वाळलेल्या चाराच पशुधनासाठी वरदान ठरत आहे. १५ जूनपर्यंत पशुधनाची भूक वाळलेल्या चाºयावर भागू शकेल एवढी तरतूद असली तरी हिरवा चारा नसल्याने दूध उत्पादन १० टक्के घटल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.१६ हजार हेक्टरवर गाळपेर क्षेत्रपशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात १६,११५ हेक्टरवर गाळपेर क्षेत्र आहे. वैरणविकास योजनेतून बहुवार्षिक थोंबे, जिल्हा वार्षिक योजनेतून बाजारी बियाणे वाटप, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मका बियाणे, पशुधनाचे वैरणासाठी २४ हजार ५०० लाभार्थ्याना वाटप करण्यात आले.दृष्काळग्रस्त परिस्थितीमुळे पशुधनाला पुरेसे पाणी व चारा आवश्यक आहे. १५ जूनपर्यंत पशुधनाला पुरेल एवढा वाळलेला चारा सध्या जिल्ह्यात आहे. हिरवा चाºयाअभावी दूध उत्पादनात १० टक्के घट झाली. वैरण विकास योजनेतून उपाययोजना केल्या आहेत.- डॉ विजय राहाटे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीअमरावती ३७ हजार ५१३, अचलपूर ४५०३३, अंजनगाव सुर्जी २६०२९, भातकुली २५९९९, चिखलदरा ४९४१०, चांदूर रेल्वे २६००३, चांदूर बाजार ३५१७०, धारणी ६३९११, धामणगाव रेल्वे ३१२५९, दर्यापूर ३३३२९, मोर्शी ३८२१८, नांदगाव खंडेश्वर ३२०३२, तिवसा २६१३८ आणि वरूड ४२०१६ असे एकूण ५ लाख १२ हजार ६० पशुधनाची संख्या १९ वी पशुगणना २०१२ नुसार आहे.