शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

पशुधनाची भूक वाळलेल्या चाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:57 IST

दुष्काळाची दाहकता वाढलेले असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने जिल्ह्यातील ५ लाख १२ हजार ६० दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाऱ्यावर भागवली जात आहे.

ठळक मुद्देदुग्धोत्पादनाला फटका : हिरवे वैरण नसल्याने पशुपालक चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुष्काळाची दाहकता वाढलेले असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने जिल्ह्यातील ५ लाख १२ हजार ६० दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाऱ्यावर भागवली जात आहे. परिणामी दुग्धोत्पादनाला फटका बसत आहे. दुधाळ जनावरांच्या खाद्याकडे विशेष लक्ष दिल्यास दूध वाढविण्यासाठी मोठा फायदा होतो.त्यामध्ये प्रथिने युक्त खाद्य जर त्यांना मिळाले तर गाई, म्हशींचे आरोग्य चांगले राहते. परंतु सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे प्रथिनेयुक्त खाद्य किंवा हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातही वेगवेगळ्या खाद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. हे दर पशुधन पालकांना परवडणारे नाहीत. जिल्ह्यात दृष्काळी स्थिती असल्याने याचा फटका पशुधनालाही अधिक बसत आहे. दृष्काळी परिस्थितीत लहान पशुधनाला प्रतीदिवस २० लिटर साधारणपणे पिण्यास पाणी, तर ३ किलो चारा तर मोठया पशुनाला ४० लिटर पाणी अन ६ किलो चारा लागत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी विहीर, बोअरचे पाणी आटल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेणे कठीण झाले आहे. यामुळे जिल्हाभरातील ५ लाख १२ हजार ६० मोठ्या दुधाळ पशुधनाची भूक सोयाबीन, तूर, हरभरा या वाळलेल्या चाºयावरच भागवावी लागत आहे. किरकोळ ठिकाणीच हिरवा मका, बहूवार्षिक थोंब्याचा चारा पशुधनाला टाकला आहे. सध्या वाळलेल्या चाराच पशुधनासाठी वरदान ठरत आहे. १५ जूनपर्यंत पशुधनाची भूक वाळलेल्या चाºयावर भागू शकेल एवढी तरतूद असली तरी हिरवा चारा नसल्याने दूध उत्पादन १० टक्के घटल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.१६ हजार हेक्टरवर गाळपेर क्षेत्रपशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात १६,११५ हेक्टरवर गाळपेर क्षेत्र आहे. वैरणविकास योजनेतून बहुवार्षिक थोंबे, जिल्हा वार्षिक योजनेतून बाजारी बियाणे वाटप, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मका बियाणे, पशुधनाचे वैरणासाठी २४ हजार ५०० लाभार्थ्याना वाटप करण्यात आले.दृष्काळग्रस्त परिस्थितीमुळे पशुधनाला पुरेसे पाणी व चारा आवश्यक आहे. १५ जूनपर्यंत पशुधनाला पुरेल एवढा वाळलेला चारा सध्या जिल्ह्यात आहे. हिरवा चाºयाअभावी दूध उत्पादनात १० टक्के घट झाली. वैरण विकास योजनेतून उपाययोजना केल्या आहेत.- डॉ विजय राहाटे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीअमरावती ३७ हजार ५१३, अचलपूर ४५०३३, अंजनगाव सुर्जी २६०२९, भातकुली २५९९९, चिखलदरा ४९४१०, चांदूर रेल्वे २६००३, चांदूर बाजार ३५१७०, धारणी ६३९११, धामणगाव रेल्वे ३१२५९, दर्यापूर ३३३२९, मोर्शी ३८२१८, नांदगाव खंडेश्वर ३२०३२, तिवसा २६१३८ आणि वरूड ४२०१६ असे एकूण ५ लाख १२ हजार ६० पशुधनाची संख्या १९ वी पशुगणना २०१२ नुसार आहे.