शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

पशुधनाची भूक वाळलेल्या चाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:57 IST

दुष्काळाची दाहकता वाढलेले असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने जिल्ह्यातील ५ लाख १२ हजार ६० दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाऱ्यावर भागवली जात आहे.

ठळक मुद्देदुग्धोत्पादनाला फटका : हिरवे वैरण नसल्याने पशुपालक चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुष्काळाची दाहकता वाढलेले असताना दुधाळ जनावरांसाठी आवश्यक असलेल्या सरकीच्या ढेपीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना ढेप खरेदी करणे परवडत नसल्याने जिल्ह्यातील ५ लाख १२ हजार ६० दुधाळ जनावरांची भूक वाळलेल्या चाऱ्यावर भागवली जात आहे. परिणामी दुग्धोत्पादनाला फटका बसत आहे. दुधाळ जनावरांच्या खाद्याकडे विशेष लक्ष दिल्यास दूध वाढविण्यासाठी मोठा फायदा होतो.त्यामध्ये प्रथिने युक्त खाद्य जर त्यांना मिळाले तर गाई, म्हशींचे आरोग्य चांगले राहते. परंतु सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे प्रथिनेयुक्त खाद्य किंवा हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातही वेगवेगळ्या खाद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. हे दर पशुधन पालकांना परवडणारे नाहीत. जिल्ह्यात दृष्काळी स्थिती असल्याने याचा फटका पशुधनालाही अधिक बसत आहे. दृष्काळी परिस्थितीत लहान पशुधनाला प्रतीदिवस २० लिटर साधारणपणे पिण्यास पाणी, तर ३ किलो चारा तर मोठया पशुनाला ४० लिटर पाणी अन ६ किलो चारा लागत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी विहीर, बोअरचे पाणी आटल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेणे कठीण झाले आहे. यामुळे जिल्हाभरातील ५ लाख १२ हजार ६० मोठ्या दुधाळ पशुधनाची भूक सोयाबीन, तूर, हरभरा या वाळलेल्या चाºयावरच भागवावी लागत आहे. किरकोळ ठिकाणीच हिरवा मका, बहूवार्षिक थोंब्याचा चारा पशुधनाला टाकला आहे. सध्या वाळलेल्या चाराच पशुधनासाठी वरदान ठरत आहे. १५ जूनपर्यंत पशुधनाची भूक वाळलेल्या चाºयावर भागू शकेल एवढी तरतूद असली तरी हिरवा चारा नसल्याने दूध उत्पादन १० टक्के घटल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.१६ हजार हेक्टरवर गाळपेर क्षेत्रपशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात १६,११५ हेक्टरवर गाळपेर क्षेत्र आहे. वैरणविकास योजनेतून बहुवार्षिक थोंबे, जिल्हा वार्षिक योजनेतून बाजारी बियाणे वाटप, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मका बियाणे, पशुधनाचे वैरणासाठी २४ हजार ५०० लाभार्थ्याना वाटप करण्यात आले.दृष्काळग्रस्त परिस्थितीमुळे पशुधनाला पुरेसे पाणी व चारा आवश्यक आहे. १५ जूनपर्यंत पशुधनाला पुरेल एवढा वाळलेला चारा सध्या जिल्ह्यात आहे. हिरवा चाºयाअभावी दूध उत्पादनात १० टक्के घट झाली. वैरण विकास योजनेतून उपाययोजना केल्या आहेत.- डॉ विजय राहाटे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीअमरावती ३७ हजार ५१३, अचलपूर ४५०३३, अंजनगाव सुर्जी २६०२९, भातकुली २५९९९, चिखलदरा ४९४१०, चांदूर रेल्वे २६००३, चांदूर बाजार ३५१७०, धारणी ६३९११, धामणगाव रेल्वे ३१२५९, दर्यापूर ३३३२९, मोर्शी ३८२१८, नांदगाव खंडेश्वर ३२०३२, तिवसा २६१३८ आणि वरूड ४२०१६ असे एकूण ५ लाख १२ हजार ६० पशुधनाची संख्या १९ वी पशुगणना २०१२ नुसार आहे.