शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अंबा नाल्यात शेकडो टन प्लास्टिक

By admin | Updated: December 9, 2015 00:15 IST

शहरातील कचऱ्यांच्या विल्हेवाटीसोबतच प्लास्टिक निर्मूलनाचा फज्जा उडाला आहे. ही जबाबदारी महापालिका प्रशासन आहे, मात्र, ते असमर्थ असल्याचे दिसून येते.

महापालिकेचे दुर्लक्ष : कचरा, प्लास्टिक निर्मूलनाचा फज्जावैभव बाबरेकर अमरावतीशहरातील कचऱ्यांच्या विल्हेवाटीसोबतच प्लास्टिक निर्मूलनाचा फज्जा उडाला आहे. ही जबाबदारी महापालिका प्रशासन आहे, मात्र, ते असमर्थ असल्याचे दिसून येते. दररोज शहरातील २५० टन कचरा कंपोस्ट डेपोत टाकण्यात येत असतानाही नाल्यामध्ये शेकडो टन प्लास्टिक गोळा झाला आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या अंबानगरीत कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता अभियान सुरु केले आहे. मात्र, अमरावती महानगर पालिकेचे स्वच्छतेकडे विशेष लक्ष नाही. शहरातील चारही झोनमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कार्य सातत्याने सुरू असते. मात्र, बहुतांश परिसरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे शहरच कचरामय झाले आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत उदासीनता निर्माण होत आहे. काही परिसरात कचराकुंडी आहेत, तर काहींमध्ये अद्यापही नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक वाटेल त्या ठिकाणी कचरा टाकतात. योग्य प्रकारे उचल्या जात नसल्यामुळे अर्धाअधिक कचरा कन्टेंनरमध्ये पडून राहत आहे काही परिसरात कचरा कुंडीतच कचऱ्यांचे ढिगारे जमले आहे. एकीकडे सुळकी येथील कम्पोस्ट डेपो ओव्हरफ्लो झाला आहे. त्यातच अमरावतीतून निघणारा कचरा कंपोेस्ट डेपोमध्ये नेण्याची प्रक्रिया सातत्याने सुरूच आहे. अनेकदा महापालिका अधिकारी व नेते मंडळींनी कमोस्ट डेपोचा आढावा घेऊन उपाययोजनासंदर्भात आश्वासने दिली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत कचरा निर्मूलनासाठी दिलेली आश्वासने अपूर्णच आहेत. आश्वासने हवेत विरलीअमरावती : अनेकदा महापालिका अधिकारी व नेते मंडळीने कमोस्ट डेपोचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासने दिले आहेत. मात्र, अद्याप कचरा निर्मूलनासाठी दिलेली आश्वासने पूर्ण झालीच नाहीत. या कचऱ्यांमध्ये सर्वाधिक प्लास्टिक असल्यामुळे ती हवेमार्फत विविध ठिकाणी पसरतानाही दिसून येत आहे. लाखो घरातून निघणारा हजारो टन कचरापैकी काही कचरा हा कम्पोस्ट डेपोत टाकण्यात येत असून काही कचरा हा शहरातील नाल्यामध्ये गोळा होताना दिसून येत आहे. त्यामुळे शहरातून गेलेल्या नाल्यामध्ये हजारो टन कचरा तसाच पडून आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई महापालिकेकडून करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर वर्षभर नाल्यात कचरा गोळा झाल्यावरही त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले आहे.