शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बारा दिवसांच्या नागपूर अधिवेशनाने विदर्भातील प्रश्न कसे सुटणार- जयंत पाटील

By उज्वल भालेकर | Updated: December 5, 2023 19:49 IST

शासन आपल्या दारी उपक्रमावर कोट्यवधींचा खर्च

अमरावती: नागपूर येथे होत असलेले हिवाळी अधिवेशन हे फक्त १२ दिवसांचे आहे. त्यातही सात दिवसांच्या सुट्या आहेत. त्यामुळे ५ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये विदर्भातील प्रश्न कसे सुटणार? असा प्रश्न राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी आक्रोश मोर्चात उपस्थित केला. सरकारने दिलेली सर्व आश्वासने ही फसवी निघाली. विदर्भातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी किमान एक महिनाभर अधिवेशन होणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने अमरावती येथील नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार शरद तसरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष हेमंत देशमुख उपस्थित होते. या वेळी या मोर्चाला संबोधित करताना जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना कृषिमंत्री तसेच सरकारने दिलेली सर्वच आश्वासने ही फसवी निघाली. राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपासाठी अडीच ते तीन कोटींचा खर्च सरकार करत आहे.

परंतु त्यातूनही जनतेचे प्रश्न मात्र सुटत नाहीत. सध्या विदर्भातील सोयाबीन, कापूस, तूर आणि संत्रा उत्पादक शेतकरी संकटात आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असे असतानाही सोयाबीन आणि कापसाचे भाव सरकारने पाडले. यापूर्वी विदर्भाच्या प्रश्नावर दीड-दोन महिने नागपूरचे हिवाळी अधिवेशन व्हायचे. यामध्ये कापसावरच दोन ते तीन दिवस चर्चा चालायची. परंतु आता फक्त १२ दिवसांचे अधिवेशन असून त्यातही पाच दिवसच कामकाज चालणार आहे. अशा परिस्थितीमध्ये विदर्भातील प्रश्न कसे सुटणार असा प्रश्नही जयंत पाटील यांनी उपस्थित करत किमान एक महिन्याचे नागपूर अधिवेशन आवश्यक असल्याची भावना मोर्चातून व्यक्त केली. तसेच संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पीकविम्याचा लाभ तसेच कापसाला १४ हजार तर सोयाबीनला ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी मोर्चातून करण्यात आली.

टॅग्स :AmravatiअमरावतीJayant Patilजयंत पाटील