शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बारा दिवसांच्या नागपूर अधिवेशनाने विदर्भातील प्रश्न कसे सुटणार- जयंत पाटील

By उज्वल भालेकर | Updated: December 5, 2023 19:49 IST

शासन आपल्या दारी उपक्रमावर कोट्यवधींचा खर्च

अमरावती: नागपूर येथे होत असलेले हिवाळी अधिवेशन हे फक्त १२ दिवसांचे आहे. त्यातही सात दिवसांच्या सुट्या आहेत. त्यामुळे ५ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये विदर्भातील प्रश्न कसे सुटणार? असा प्रश्न राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी आक्रोश मोर्चात उपस्थित केला. सरकारने दिलेली सर्व आश्वासने ही फसवी निघाली. विदर्भातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी किमान एक महिनाभर अधिवेशन होणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने अमरावती येथील नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार शरद तसरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष हेमंत देशमुख उपस्थित होते. या वेळी या मोर्चाला संबोधित करताना जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना कृषिमंत्री तसेच सरकारने दिलेली सर्वच आश्वासने ही फसवी निघाली. राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपासाठी अडीच ते तीन कोटींचा खर्च सरकार करत आहे.

परंतु त्यातूनही जनतेचे प्रश्न मात्र सुटत नाहीत. सध्या विदर्भातील सोयाबीन, कापूस, तूर आणि संत्रा उत्पादक शेतकरी संकटात आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असे असतानाही सोयाबीन आणि कापसाचे भाव सरकारने पाडले. यापूर्वी विदर्भाच्या प्रश्नावर दीड-दोन महिने नागपूरचे हिवाळी अधिवेशन व्हायचे. यामध्ये कापसावरच दोन ते तीन दिवस चर्चा चालायची. परंतु आता फक्त १२ दिवसांचे अधिवेशन असून त्यातही पाच दिवसच कामकाज चालणार आहे. अशा परिस्थितीमध्ये विदर्भातील प्रश्न कसे सुटणार असा प्रश्नही जयंत पाटील यांनी उपस्थित करत किमान एक महिन्याचे नागपूर अधिवेशन आवश्यक असल्याची भावना मोर्चातून व्यक्त केली. तसेच संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पीकविम्याचा लाभ तसेच कापसाला १४ हजार तर सोयाबीनला ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी मोर्चातून करण्यात आली.

टॅग्स :AmravatiअमरावतीJayant Patilजयंत पाटील