शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बारा दिवसांच्या नागपूर अधिवेशनाने विदर्भातील प्रश्न कसे सुटणार- जयंत पाटील

By उज्वल भालेकर | Updated: December 5, 2023 19:49 IST

शासन आपल्या दारी उपक्रमावर कोट्यवधींचा खर्च

अमरावती: नागपूर येथे होत असलेले हिवाळी अधिवेशन हे फक्त १२ दिवसांचे आहे. त्यातही सात दिवसांच्या सुट्या आहेत. त्यामुळे ५ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये विदर्भातील प्रश्न कसे सुटणार? असा प्रश्न राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी आक्रोश मोर्चात उपस्थित केला. सरकारने दिलेली सर्व आश्वासने ही फसवी निघाली. विदर्भातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी किमान एक महिनाभर अधिवेशन होणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने अमरावती येथील नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार शरद तसरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष हेमंत देशमुख उपस्थित होते. या वेळी या मोर्चाला संबोधित करताना जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना कृषिमंत्री तसेच सरकारने दिलेली सर्वच आश्वासने ही फसवी निघाली. राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपासाठी अडीच ते तीन कोटींचा खर्च सरकार करत आहे.

परंतु त्यातूनही जनतेचे प्रश्न मात्र सुटत नाहीत. सध्या विदर्भातील सोयाबीन, कापूस, तूर आणि संत्रा उत्पादक शेतकरी संकटात आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असे असतानाही सोयाबीन आणि कापसाचे भाव सरकारने पाडले. यापूर्वी विदर्भाच्या प्रश्नावर दीड-दोन महिने नागपूरचे हिवाळी अधिवेशन व्हायचे. यामध्ये कापसावरच दोन ते तीन दिवस चर्चा चालायची. परंतु आता फक्त १२ दिवसांचे अधिवेशन असून त्यातही पाच दिवसच कामकाज चालणार आहे. अशा परिस्थितीमध्ये विदर्भातील प्रश्न कसे सुटणार असा प्रश्नही जयंत पाटील यांनी उपस्थित करत किमान एक महिन्याचे नागपूर अधिवेशन आवश्यक असल्याची भावना मोर्चातून व्यक्त केली. तसेच संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पीकविम्याचा लाभ तसेच कापसाला १४ हजार तर सोयाबीनला ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी मोर्चातून करण्यात आली.

टॅग्स :AmravatiअमरावतीJayant Patilजयंत पाटील