शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

एकाच रुग्णाच्या 'ब्लड सॅम्पल'चे दोन वेगवेगळे अहवाल कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:23 IST

डेंग्यूने शहराला घातलेला विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असतानाच वैद्यकीय तांत्रिक त्रुटींमुळेदेखील रुग्ण संभ्रमित होऊ लागले आहेत. एकाच रुग्णाच्या रक्तनमुन्यांचे दोन परस्परविरोधी अहवाल येऊ लागल्यामुळे शहरातील डॉक्टरांवर नाहक संशय व्यक्त होत आहे.

गणेश देशमुख

डेंग्यूने शहराला घातलेला विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असतानाच वैद्यकीय तांत्रिक त्रुटींमुळेदेखील रुग्ण संभ्रमित होऊ लागले आहेत. एकाच रुग्णाच्या रक्तनमुन्यांचे दोन परस्परविरोधी अहवाल येऊ लागल्यामुळे शहरातील डॉक्टरांवर नाहक संशय व्यक्त होत आहे.डेंग्यूबाधित रुग्णाला खासगी डॉक्टरांकडे उपचार घेण्याशिवाय कुठलाही पर्याय शहरात उपलब्ध नाही. शासकीय रुग्णालयांमधील व्यवस्था अत्यंत तोकडी आहे.इंडियन मेडिकल असोसिएशनचे अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शंभर दवाखाने आणि दीडशे रुग्णालये आहेत. हे सर्वच दवाखाने आणि रुग्णालये डेंग्यूरुग्णांनी ओसंडून वाहत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, शहरातील डेंग्यूबाधित प्रौढांचा आकडा दीड हजार आणि दहा वर्षे वयोगटापर्यंत मुलांचा आकडा ३०० इतका आहे.डॉक्टर दहशतीतखासगी डॉक्टरांनी डेंग्यूचे रुग्ण दाखल असल्याची माहिती माध्यमांना दिल्याच्या कारणावरून महापालिकेने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. खरे तर शहरात दाखल झालेला डेंग्यू पसरू नये, या पाक उद्देशाने खासगी डॉक्टरांनी सदर माहिती जाहीर केली. तथापि, महापालिकेने त्यांच्याभोवतीच कारवाईचा फास आवळल्यामुळे पूर्वी १०-१२ डेंग्यूचे रुग्ण असतानाही माहिती देणारे खासगी डॉक्टर आता शहरभर हजारो रुग्ण होऊनही खरी माहिती देण्यास धजावत नाहीत. याच कारणाने डेंग्यू रुग्णांच्या उपचारादरम्यान निर्माण होऊ लागलेल्या काही गंभीर त्रुटींबाबतही डॉक्टर खुलून बोलायला तयार नाहीत.काय आहे त्रुटी?खासगी डॉक्टरांकडे दाखल झालेल्या रुग्णाची खासगी पॅथॉलॉजी लेबॉरेटरीत करण्यात येणारी 'रीअ‍ॅक्टिव्ह' स्वरूपाची रक्तजल चाचणी पॉझिटिव्ह येते. तथापि, महापालिकेने त्याच रुग्णाच्या रक्ताचे यवतमाळ येथील सेंटिनल सेंटरमध्ये पाठविलेले नमुने निगेटिव्ह येतात. या विचित्र प्रकारामुळे रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होतो. शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल डेंग्यू नसल्याचा आहे आणि खासगी डॉक्टरांनी मात्र डेंग्यू असल्याचे सांगून नाहकच हजारो रुपयांनी गंडविले, अशी भावना सामान्यजनांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. डेंग्यूच्या राक्षसी विळख्यातून बाहेर काढण्यास ज्या डॉक्टरांची अहोरात्र मदत होत आहे, त्याच डॉक्टरांविरुद्ध या प्रकारामुळे वातावरणनिर्मिती होत आहे.का घडते असे?डेंग्यूचा संशय येताच खासगी डॉक्टर रुग्णाचे रक्तनमुने खासगी पॅथॉलॉजी लेबॉरेटरीत पाठवितात. महापालिकेला सदर रुग्णाबाबत माहिती दिलेली असते. तथापि, महापालिका त्या रुग्णांचे रक्तनमुने पाच ते सात दिवसांनंतर यवतमाळच्या शासकीय प्रयोगशाळेत पाठविते. वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रथम पाच दिवसांत एनएस-वन ही चाचणी करावी. त्यानंतर आजीएम ही चाचणी करावी. सात दिवसांनंतर एनएस-वन ही चाचणी केल्यास डेंग्यू असूनही अहवाल 'निगेटिव्ह' येतो. नेमके घडते आहे हेच.