शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती बळी हवे?

By admin | Updated: February 14, 2016 00:15 IST

अपूर्वा देऊळगावकर... ट्रकचालकाच्या बेदरकारपणाचा बळी ठरलेली तरणीताठी मुलगी.

ट्रकने घेतला तरुणीचा बळी : जनाक्रोश उफाळला, आता उपाययोजनांचा रतीबअमरावती : अपूर्वा देऊळगावकर... ट्रकचालकाच्या बेदरकारपणाचा बळी ठरलेली तरणीताठी मुलगी. स्नेहसंमेलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या या जीवावर ट्रकने घाला घातला आणि शहराची वाहतूक व्यवस्था अक्षरश: उघडी पडली. यापूर्वीही ट्रकच्या बेफाम वाहतुकीने अनेकांचे बळी घेतले. वर्षभरात आयुक्तालय हद्दीत झालेल्या अपघातात ७० बळी गेले. त्यातील अनेकांचा जीव ट्रकने घेतला. एखादा अपघात घडल्यानंतर उपाययोजनांचा रतीब घातला जातो. मात्र त्यानंतर काही दिवसांतच परिस्थिती जैसे थे होते. मग प्रश्न उपस्थित होतो की, आणखी किती बळी हवेत?२२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा ट्रक अपघातात अकाली बळी गेल्यानंतर बेदरकार आणि अनियंत्रित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या अपघाताने समाजमन पुरते हेलावले आहे. शनिवारच्या अपघातानंतरही उपाययोजना राबविल्या जातील. मात्र काही दिवसांनी या उपाययोजना केवळ कागदावरच राहतात. यापूर्वी पीएसआयचा बळीअमरावती : सहामहिन्यांपूर्वी रात्री ११.३० च्या सुमारास पीएसआय हनुमान चवळे यांना ट्रकने धडक दिली होती. त्यांच्या घटनास्थळी मृत्यू झाला होता. चार महिन्यांपूर्वी शेगावनाका परिसरात बेफाम ट्रकने एका दाम्पत्याचा बळी घेतला होता. शुक्रवारी अपूर्वा देऊ ळगावकरच्या अपघाती मृत्यूने जड वाहतुकीच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह लागले आहे.अपूर्वाचा मोठा भाऊ नागपूरवरून परतलामृत अपूर्वाचा मोठा भाऊ सिपना महाविद्यालयात एम.ई.चे शिक्षण घेत आहे. आपल्या धाकट्या बहिणीच्या अपघाताची बातमी कळताच तो नागपूरवरून अमरावतीला निघाला. पण मृतदेह कारंजाला नेत असल्याची माहिती शिक्षकांनी देताच तो कारंजाला रवाना झाला. निमूळत्या मार्गावर पार्किंगच्या रांगागांधी चौकातून राजापेठकडे जाणाऱ्या या रस्त्यावर गॅस एजन्सीसह अन्य दुकाने आहेत. या दुकानांसमोर दुचाकींची भली मोठी अवैध पार्किंग लागते. आजही अपूर्वाला ट्रक समोरून येत असताना दिसला. तिने आपली दुचाकी बाजूला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेल्या पार्किंगमुळे तिला जीवाला मुकावे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नो-एन्ट्री फलकावरचअनेकदा नो-एन्ट्रीच्या वेळेतच ट्रक, टिप्परची बेफाम वाहतूक केली जाते. कधी दंडही वसूल केल्या जातो. मात्र ट्रक चालकांच्या बेफाम आणि बेदरकारपणावर अंकुश लावला जात नाही. लक्झरी बसेससुध्दा शहरात प्रवेश बंदी असताना या बसेससुध्दा खुलेआमपणे शहरात शिरतात. यावरही वाहतूक विभागाला अंकुश लावता आलेला नाही. ट्रक चालकांवर कडक कारवाई कराट्रक चालकाचीच चुकी असल्याचे प्रथमदर्शीनी सांगितले. १० वाजता दरम्यान अपघात झाला. १५ मिनिटांतच अपघाताची माहिती कळली. पोलिसांनी मृतदेह इर्विनमध्ये नेला. बोंडे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनीची माहिती घेतली. त्या घाबरलेल्या होत्या. अपूर्वा व सोनल चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या नेहमी दुचाकी व पेट्रोल शेअर्स करायच्या. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळताच मुले निघून गेले. सोमवारी अपूर्वाला कॉलेजच्यावतीने सामूहिक श्रद्धांजली देण्यात येईल, अशी माहिती सिपनाचे प्राचार्य एस. ए. लडके यांनी दिली. मृतदेहावर शनिवारी ६ वाजता कारंजा लाड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेश उभाडे यांच्याकडे भाड्याने राहत होती अपूर्वाव्यंकटेश लॉनजवळील सुरेश उभाडे यांच्याकडे भाड्याच्या खोलीत मागील तीन वर्षांपासून मृत अपूर्वा देऊळगावकर राहत होती. अतिशय मनमिळावू स्वभावाची अपूर्वाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांना व उभाडे परिवारांनाही धक्काच बसला. जगदीश गुप्तांकडून सांत्वनासिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष सिपना तथा माजी मंत्री जगदीश गुप्ता यांना घटनेची माहिती मिळताच ते इर्विनच्या शवागारात पोहचले. सिपनाचे बहुतांश प्राध्यापक व विद्यार्थीही अपूर्वाच्या नातेवाईकांचे सांत्वन करीत होते. गुप्ता यांच्याशिवाय शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब भागवत यांनी सुध्दा शवविच्छेदन कक्षात येवून सहकार्य केले. फेट्याने केला घातसिपना इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शनिवारी क्रीडा महोत्सव व स्रेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मृतक अपूर्वा राजकुमार देऊळगांवकर ही सिपना कॉलेजला कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग या शाखेची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी होती. ती तिची मैत्रीण सोनल गुळकरी, प्रियंका हेलांडे, श्रृतिका तिडके यांच्यासोबत स्रेहसंमेलनासाठी फेटे आणण्यासाठी गेली होती. फेटे कॉलेजमध्ये नेताना घात झाला व क्षणात तिचे आयुष्य संपले. अपूर्वा ही सोनल गुलकरी हिच्या दुचाकीवर मागे बसली होती तर प्रियंका व श्रृतिका दुसऱ्या दुचाकींवर जात असल्याचे प्रथमदर्शीनींनी सांगितले. शाळांच्या वेळात ‘नो-एन्ट्री’शहरातील सर्व शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या सुटण्याच्या कालावधीची माहिती घेऊन त्या वेळेमध्ये शाळामहाविद्यालय व नजीकच्या परिसरात जड वाहनांना नो-एन्ट्री केली जाणार आहे. तूर्तास या भागात सकाळी ६.३० ते ८.३०, दुपारी १ ते २.३० व दुपारी ४.३० ते ६.३० या कालावधीत जड वाहनांना ‘नो-एन्ट्री’ आहे.