शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
5
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
6
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
7
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
8
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
9
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
10
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
11
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
12
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
13
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
14
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
15
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
16
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
17
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
18
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
19
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
20
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

आणखी किती बळी हवे?

By admin | Updated: February 14, 2016 00:15 IST

अपूर्वा देऊळगावकर... ट्रकचालकाच्या बेदरकारपणाचा बळी ठरलेली तरणीताठी मुलगी.

ट्रकने घेतला तरुणीचा बळी : जनाक्रोश उफाळला, आता उपाययोजनांचा रतीबअमरावती : अपूर्वा देऊळगावकर... ट्रकचालकाच्या बेदरकारपणाचा बळी ठरलेली तरणीताठी मुलगी. स्नेहसंमेलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या या जीवावर ट्रकने घाला घातला आणि शहराची वाहतूक व्यवस्था अक्षरश: उघडी पडली. यापूर्वीही ट्रकच्या बेफाम वाहतुकीने अनेकांचे बळी घेतले. वर्षभरात आयुक्तालय हद्दीत झालेल्या अपघातात ७० बळी गेले. त्यातील अनेकांचा जीव ट्रकने घेतला. एखादा अपघात घडल्यानंतर उपाययोजनांचा रतीब घातला जातो. मात्र त्यानंतर काही दिवसांतच परिस्थिती जैसे थे होते. मग प्रश्न उपस्थित होतो की, आणखी किती बळी हवेत?२२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा ट्रक अपघातात अकाली बळी गेल्यानंतर बेदरकार आणि अनियंत्रित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या अपघाताने समाजमन पुरते हेलावले आहे. शनिवारच्या अपघातानंतरही उपाययोजना राबविल्या जातील. मात्र काही दिवसांनी या उपाययोजना केवळ कागदावरच राहतात. यापूर्वी पीएसआयचा बळीअमरावती : सहामहिन्यांपूर्वी रात्री ११.३० च्या सुमारास पीएसआय हनुमान चवळे यांना ट्रकने धडक दिली होती. त्यांच्या घटनास्थळी मृत्यू झाला होता. चार महिन्यांपूर्वी शेगावनाका परिसरात बेफाम ट्रकने एका दाम्पत्याचा बळी घेतला होता. शुक्रवारी अपूर्वा देऊ ळगावकरच्या अपघाती मृत्यूने जड वाहतुकीच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह लागले आहे.अपूर्वाचा मोठा भाऊ नागपूरवरून परतलामृत अपूर्वाचा मोठा भाऊ सिपना महाविद्यालयात एम.ई.चे शिक्षण घेत आहे. आपल्या धाकट्या बहिणीच्या अपघाताची बातमी कळताच तो नागपूरवरून अमरावतीला निघाला. पण मृतदेह कारंजाला नेत असल्याची माहिती शिक्षकांनी देताच तो कारंजाला रवाना झाला. निमूळत्या मार्गावर पार्किंगच्या रांगागांधी चौकातून राजापेठकडे जाणाऱ्या या रस्त्यावर गॅस एजन्सीसह अन्य दुकाने आहेत. या दुकानांसमोर दुचाकींची भली मोठी अवैध पार्किंग लागते. आजही अपूर्वाला ट्रक समोरून येत असताना दिसला. तिने आपली दुचाकी बाजूला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेल्या पार्किंगमुळे तिला जीवाला मुकावे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नो-एन्ट्री फलकावरचअनेकदा नो-एन्ट्रीच्या वेळेतच ट्रक, टिप्परची बेफाम वाहतूक केली जाते. कधी दंडही वसूल केल्या जातो. मात्र ट्रक चालकांच्या बेफाम आणि बेदरकारपणावर अंकुश लावला जात नाही. लक्झरी बसेससुध्दा शहरात प्रवेश बंदी असताना या बसेससुध्दा खुलेआमपणे शहरात शिरतात. यावरही वाहतूक विभागाला अंकुश लावता आलेला नाही. ट्रक चालकांवर कडक कारवाई कराट्रक चालकाचीच चुकी असल्याचे प्रथमदर्शीनी सांगितले. १० वाजता दरम्यान अपघात झाला. १५ मिनिटांतच अपघाताची माहिती कळली. पोलिसांनी मृतदेह इर्विनमध्ये नेला. बोंडे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनीची माहिती घेतली. त्या घाबरलेल्या होत्या. अपूर्वा व सोनल चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या नेहमी दुचाकी व पेट्रोल शेअर्स करायच्या. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळताच मुले निघून गेले. सोमवारी अपूर्वाला कॉलेजच्यावतीने सामूहिक श्रद्धांजली देण्यात येईल, अशी माहिती सिपनाचे प्राचार्य एस. ए. लडके यांनी दिली. मृतदेहावर शनिवारी ६ वाजता कारंजा लाड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेश उभाडे यांच्याकडे भाड्याने राहत होती अपूर्वाव्यंकटेश लॉनजवळील सुरेश उभाडे यांच्याकडे भाड्याच्या खोलीत मागील तीन वर्षांपासून मृत अपूर्वा देऊळगावकर राहत होती. अतिशय मनमिळावू स्वभावाची अपूर्वाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांना व उभाडे परिवारांनाही धक्काच बसला. जगदीश गुप्तांकडून सांत्वनासिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष सिपना तथा माजी मंत्री जगदीश गुप्ता यांना घटनेची माहिती मिळताच ते इर्विनच्या शवागारात पोहचले. सिपनाचे बहुतांश प्राध्यापक व विद्यार्थीही अपूर्वाच्या नातेवाईकांचे सांत्वन करीत होते. गुप्ता यांच्याशिवाय शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब भागवत यांनी सुध्दा शवविच्छेदन कक्षात येवून सहकार्य केले. फेट्याने केला घातसिपना इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शनिवारी क्रीडा महोत्सव व स्रेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मृतक अपूर्वा राजकुमार देऊळगांवकर ही सिपना कॉलेजला कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग या शाखेची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी होती. ती तिची मैत्रीण सोनल गुळकरी, प्रियंका हेलांडे, श्रृतिका तिडके यांच्यासोबत स्रेहसंमेलनासाठी फेटे आणण्यासाठी गेली होती. फेटे कॉलेजमध्ये नेताना घात झाला व क्षणात तिचे आयुष्य संपले. अपूर्वा ही सोनल गुलकरी हिच्या दुचाकीवर मागे बसली होती तर प्रियंका व श्रृतिका दुसऱ्या दुचाकींवर जात असल्याचे प्रथमदर्शीनींनी सांगितले. शाळांच्या वेळात ‘नो-एन्ट्री’शहरातील सर्व शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या सुटण्याच्या कालावधीची माहिती घेऊन त्या वेळेमध्ये शाळामहाविद्यालय व नजीकच्या परिसरात जड वाहनांना नो-एन्ट्री केली जाणार आहे. तूर्तास या भागात सकाळी ६.३० ते ८.३०, दुपारी १ ते २.३० व दुपारी ४.३० ते ६.३० या कालावधीत जड वाहनांना ‘नो-एन्ट्री’ आहे.