शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासांत कसे भरणार ६० हजार अर्ज ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 21:49 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही ‘डेडलाईन’ आहे.

ठळक मुद्देमुदतवाढ हवीच : जगाचा पोशिंदा अर्जासाठी रात्रंदिवस रांगेत

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही ‘डेडलाईन’ आहे. अद्याप जिल्ह्यातील ६० हजार शेतकºयांचे अर्ज भरावयाचे आहेत. येत्या २४ तासांत हे आॅनलाईन अर्ज कसे भरणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे योजनेला किमान १५ दिवस मुदतवाढ देणे अपरिहार्य आहे. जगाचा पोशिंदा रात्रंदिवस रांगेत उभा असल्याने या योजनेत सन्मान कुठे, हा तर बळीराजाचा अवमान असल्याची खंत शेतकºयांनी बोलून दाखविली.जिल्ह्यात कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेसाठी दोन लाख २५ हजार शेतकरी पात्र आहेत. यामध्ये एक लाख ६७ हजार शेतकरी थकबाकीदार, ४३ हजार शेतकरी चालू खातेदार आहेत तर २० ते २५ हजार शेतकºयांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन लाख ९२ हजार २०९ शेतकºयांनी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात एक लाख ४२ हजार ६८५ शेतकºयांनी बुधवारपर्यंत आॅनलाईन अर्ज भरले आहेत. गुरूवारी अधिकाधिक नोंदणी होऊन आॅनलाईन अर्ज भरले गेले तरी अंतिम मुदतीपर्यंत म्हणजे १५ तारखेपर्यंत म्हणजेच केवळ २४ तासांत किमान ६० हजार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज भरणे, ही अशक्यप्राय बाब आहे.सन्मान कुठे... हा तर अवमानचछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कल्याण योजनेंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बळीराजा पत्नीसह रात्रंदिवस लाईनमध्ये उभा आहे. सेतू, संग्राम, महा- ई -सेवा केंद्र यांसह सीएससी केंद्रात गेल्यानंतर सर्व्हर डाऊन, अंगठा घेणारे डिव्हाईस कनेक्ट न होणे, यांसह अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे. कर्जमाफीची माहिती बँका नीटपणे देत नाही. केंद्रचालकांचे सहकार्य नाही, शेतकºयांकडून अधिकचे पैसे उकळणे, याप्रकारामध्ये शेतकºयांचा सन्मान नव्हे तर ्अवमान असल्याची खंत शेतकºयांनी बोलून दाखविली.तीन दिवसांपासूनचे भारनियमन उठले ‘आॅनलाईन’च्या मुळावरजिल्ह्यासह राज्यात चार दिवसांपासून सक्तीचे भारनियमन सुरू झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील महा -ई-सेवा केंद्र कित्येक तास बंद राहते. याचा थेट फटका शेतकºयांना बसतो. या केंद्रावर त्यांना पत्नीसह ताटकळत बसावे लागत आहे. कर्जमाफीच्या आॅनलार्ईन प्रक्रियेत हे नवे संकट शेतकºयांसमोर उभे ठाकले आहे.अंगठा संलग्नित होत नसल्याच्या सर्वाधिक तक्रारीकर्जमाफी प्रक्रियेत शेतकºयांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे महत्त्वाचे आहे.ज्यांचे आधार लिंकिंग नाही, अशा शेतकºयांना पत्नीसह स्वत:चा अंगठा देवून बायोमेट्रिकओळख पटवावी लागते. मात्र, या प्रक्रियेत त्यांचा अंगठा संलग्नित (मॅच) होत नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. किमान अशा अपवादात्मक स्थितीत तरी शेतकºयांचे अर्ज शेवटच्या दिवशी तरी आॅफलाईन पद्धतीने स्वीकारल्यास शेतकºयांना आधार ओळख नसल्यास शासनाचा आधार मिळेल.