शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

२४ तासांत कसे भरणार ६० हजार अर्ज ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 21:49 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही ‘डेडलाईन’ आहे.

ठळक मुद्देमुदतवाढ हवीच : जगाचा पोशिंदा अर्जासाठी रात्रंदिवस रांगेत

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही ‘डेडलाईन’ आहे. अद्याप जिल्ह्यातील ६० हजार शेतकºयांचे अर्ज भरावयाचे आहेत. येत्या २४ तासांत हे आॅनलाईन अर्ज कसे भरणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे योजनेला किमान १५ दिवस मुदतवाढ देणे अपरिहार्य आहे. जगाचा पोशिंदा रात्रंदिवस रांगेत उभा असल्याने या योजनेत सन्मान कुठे, हा तर बळीराजाचा अवमान असल्याची खंत शेतकºयांनी बोलून दाखविली.जिल्ह्यात कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेसाठी दोन लाख २५ हजार शेतकरी पात्र आहेत. यामध्ये एक लाख ६७ हजार शेतकरी थकबाकीदार, ४३ हजार शेतकरी चालू खातेदार आहेत तर २० ते २५ हजार शेतकºयांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन लाख ९२ हजार २०९ शेतकºयांनी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात एक लाख ४२ हजार ६८५ शेतकºयांनी बुधवारपर्यंत आॅनलाईन अर्ज भरले आहेत. गुरूवारी अधिकाधिक नोंदणी होऊन आॅनलाईन अर्ज भरले गेले तरी अंतिम मुदतीपर्यंत म्हणजे १५ तारखेपर्यंत म्हणजेच केवळ २४ तासांत किमान ६० हजार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज भरणे, ही अशक्यप्राय बाब आहे.सन्मान कुठे... हा तर अवमानचछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कल्याण योजनेंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बळीराजा पत्नीसह रात्रंदिवस लाईनमध्ये उभा आहे. सेतू, संग्राम, महा- ई -सेवा केंद्र यांसह सीएससी केंद्रात गेल्यानंतर सर्व्हर डाऊन, अंगठा घेणारे डिव्हाईस कनेक्ट न होणे, यांसह अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे. कर्जमाफीची माहिती बँका नीटपणे देत नाही. केंद्रचालकांचे सहकार्य नाही, शेतकºयांकडून अधिकचे पैसे उकळणे, याप्रकारामध्ये शेतकºयांचा सन्मान नव्हे तर ्अवमान असल्याची खंत शेतकºयांनी बोलून दाखविली.तीन दिवसांपासूनचे भारनियमन उठले ‘आॅनलाईन’च्या मुळावरजिल्ह्यासह राज्यात चार दिवसांपासून सक्तीचे भारनियमन सुरू झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील महा -ई-सेवा केंद्र कित्येक तास बंद राहते. याचा थेट फटका शेतकºयांना बसतो. या केंद्रावर त्यांना पत्नीसह ताटकळत बसावे लागत आहे. कर्जमाफीच्या आॅनलार्ईन प्रक्रियेत हे नवे संकट शेतकºयांसमोर उभे ठाकले आहे.अंगठा संलग्नित होत नसल्याच्या सर्वाधिक तक्रारीकर्जमाफी प्रक्रियेत शेतकºयांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे महत्त्वाचे आहे.ज्यांचे आधार लिंकिंग नाही, अशा शेतकºयांना पत्नीसह स्वत:चा अंगठा देवून बायोमेट्रिकओळख पटवावी लागते. मात्र, या प्रक्रियेत त्यांचा अंगठा संलग्नित (मॅच) होत नसल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. किमान अशा अपवादात्मक स्थितीत तरी शेतकºयांचे अर्ज शेवटच्या दिवशी तरी आॅफलाईन पद्धतीने स्वीकारल्यास शेतकºयांना आधार ओळख नसल्यास शासनाचा आधार मिळेल.