शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

दुपारचे दोन वाजले तरी लग्नात कसे पोहोचले नाही?

By admin | Updated: August 7, 2015 00:20 IST

लग्नाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बुधवारी सकाळी आजनकर परिवार कारने यवतमाळातून उत्साहात रवाना झाला.

लग्नाला जाताना आजनकर कुटुंबावर काळाचा घालाअमरावती : लग्नाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बुधवारी सकाळी आजनकर परिवार कारने यवतमाळातून उत्साहात रवाना झाला. दुपारचे २ वाजले तरी लग्नघरी कसे पोहोचले नाहीत, अशी शंका यवतमाळात असलेल्या लहान भावाच्या मनात आली. त्याने दोनही भावांच्या मोबाईलवर संपर्क केला. प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी भावाने दुचाकी काढून शोध सुरू केला. नातेवाईकही शोध मोहिमेत सहभागी झालेत. अखेर ज्याचे भय होते तेच झाले. तिवसा तालुक्यातील नाल्याच्या पुरात कारसह चौघेही वाहून गेल्याचे स्पष्ट झाले. ही वार्ता कळताच वृद्ध पित्यासह सर्वच हादरले. सकाळी आनंदात गेलेल्या चौघांचे कलेवर पाहण्याचीच वेळ यवतमाळातील रेणुकानगरावर आली. चांदूररेल्वे येथील गजाननच्या साडुच्या मुलाचे आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथे बुधवार सकाळी ११ वाजता लग्न होते. संजयच्या अल्टो कारने (क्र. एम.एच-२९-एडी-४४९६) आजनकर परिवार वर्धमनेरीकडे सकाळी ७ वाजता रवाना झाला होता.चांदूररेल्वेत शोककळाआजनकर परिवारातील नातेवाईक, चांदूररेल्वे येथील धनराज होले यांचे बुधवारी ५ आॅगस्टला वर्धमनेरी येथे लग्न होते. त्याच ठिकाणी आजनकर परिवार जात होता. दरम्यान ही दुर्दैवी घटना झाली. चौघांचेही शवविच्छेदन चांदूररेल्वे येथेच झाल्याने नातेवाईकांसह नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेमुळे चांदूररेल्वे शहरात शोककळा पसरली आहे. सान्वीचे होमवर्क राहूनच गेले! पुरात वाहून गेलेल्या कारमध्ये मृत्युमुखी पडलेली सान्वी यवतमाळच्या जांब मार्गावरील आदर्श कॉन्व्हेंटमध्ये केजी-२ ला शिकत होती. मंगळवारी तिच्या वर्ग शिक्षिका वैशाली पाटणे हिने तिला होमवर्कबाबत विचारले होते. ‘आम्ही उद्या गावी जाणार आहोत. त्यानंतर होमवर्क दाखविते’, असे सान्वी म्हणाली होती. मात्र गुरुवारी तिच्या मृत्यूचीच वार्ता शाळेत धडकली आणि आदर्श कॉन्व्हेंटमध्ये शोककळा पसरली. मुलाला वाचविण्यासाठी दिली होती प्राणांची आहुतीआजनकर परिवारावर नियतीने दुसऱ्यांदा क्रूर आघात केला. सहा महिन्यांपूर्वी पशुवैद्यक संजय आजनकर यांची पत्नी स्वाती यांनी मधमाश्यांचा हल्ला अंगावर झेलून प्राणांची आहुती दिली. कळंब तालुक्यातील निरंजन माहूर येथे दर्शनासाठी त्या परिवारासह गेल्या होत्या. त्यावेळी झाडावरील मधमाश्यांचे पोळ उठले. स्वाती यांच्या मांडीवर असलेल्या चिमुकल्या श्रीपाद नामक मुलाला मधमाशा चावू नयेत म्हणून त्याला शरीराच्या कवचाखाली सुरक्षित ठेऊन मधमाश्यांचा मारा त्या शूर आईने स्वत:वर झेलला. मधमाश्यांच्या असंख्य डंखाने गंभीर अवस्थेत रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेपाठोपाठ आता दुसरा भयंकर आघात या कुटुंबावर झाला.