शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

नझूलच्या जागेवर दारु दुकानाला परवानगी कशी?

By admin | Updated: December 18, 2014 00:11 IST

वडाळी येथील देशी दारू विक्रीचे दुकान हद्दपार करण्यासाठी महिलाशक्ती एकवटली आहे. शासनाच्या दारु विक्रीबाबतच्या धोरणाची चिरफाड करण्यासाठी ...

अमरावती : वडाळी येथील देशी दारू विक्रीचे दुकान हद्दपार करण्यासाठी महिलाशक्ती एकवटली आहे. शासनाच्या दारु विक्रीबाबतच्या धोरणाची चिरफाड करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्याची या रणरागिणींची तयारी आहे. मात्र, ज्या दारु विक्रीच्या दुकानाबाबत वाद उफाळला आहे, ते दुकान नझुलच्या जागेवर असून चालविण्याचा परवाना मिळाला कसा? हा खरा सवाल आहे.मागील १० महिन्यांपासून वडाळीतील देशी दारु विक्रीचे दुकान प्रशासनाच्या आदेशाने बंद आहे. हे दुकान वडाळीत नकोच, ही भूमिका या परिसरातील महिलांची आहे. मात्र नियमानुसार हे दुकान दुसरीकडे स्थलांतरित करायचे असल्यास मतदान प्रक्रिया राबवूनच प्रशासनाला निर्णय घ्यावा लागतो. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. मतदार यादीत घोळ असल्यामुळे ही प्रक्रिया थांबवून महिलांनी महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत मतदान नकोच ही भूमिका घेतली. अखेर जिल्हा प्रशासनाला यात मध्यस्ती करावी लागली. पुढील आदेशापर्यंत दारु विक्रीचे दुकान बंद करण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा लागला. परंतु कालांतराने दारु विक्रेत्यांनी दुकानाविषयी उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेनुसार न्याय मागितला. त्यामुळे उच्च न्यायालयाने प्रशासनाला योग्य कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन २८ डिसेंबर रोजी देशी दारु विक्रीच्या दुकानासंदर्भात मतदान घेण्याचे सांगितले. मात्र पुन्हा मतदान होणार असल्याने वडाळीतील महिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर एक्साईज, जिल्हाकचेरीवर धाव घेत या दुकानासंदर्भात मतदान घेतल्यास कायदा हातात घेऊ, असा इशारा दिला. देशी दारुच्या दुकानावरुन प्रक्षोभ उफाळून येत असताना हे दुकान खरेच वडाळीतील चालविणे योग्य आहे का? याविषयी जिल्हाप्रशासनाने गुप्त अहवाल मागविणे आवश्यक आहे. ज्या तीव्रतेने महिलांनी या दारु दुकानाविषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात गाऱ्हाणी मांडल्यात ते दुकान कोणाच्या मालकीचे? ती जागा कोणाच्या मालकीची? या खोलात शिरल्यास हे दुकान हटविण्यासाठी मतदान घेण्याची गरज पडणार नाही, हे वास्तव आहे. वडाळी व देवीनगर हा संपूर्ण भाग हा नझुलमध्ये आहे. या जागेवर दारु विक्रीचा परवाना देता येतो काय? याचा शोध जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तर न्यायालयाच्या आदेशापूर्वीच जिल्हाधिकारी किरण गित्ते हे नझुलच्या जागेवरील हे दारुविक्रीचे दुकान सहजतेने अतिक्रमणाच्या नावाखाली भुईसपाट करु शकतात, हे कोणालाही विचारण्याची गरज नाही, हे खरे आहे. वडाळी, देवीनगरचा भाग हा स्लम म्हणून महापालिकेने घोषित केला आहे. २७ वर्षांपूर्वी ज्या मालमत्ताधारकाच्या नावाने हे दारु विक्रीचे दुकान सुरु करण्यात आले. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. मात्र दरवर्षी राज्य उत्पादन शुल्क विभाग ज्या नियमांना अनुसरुन दारु विक्री परवान्याचे नूतनीकरण करतात, त्यानुसार वडाळीतील हे देशी दारु विक्रीचे दुकान अस्तित्वात आहे काय? याचे चिंतनही जिल्हाधिकाऱ्यांनी करावे; तथापि उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा मतदान झाले तर महिलांचे दारुबंदीसाठीचे आंदोलन कोणते वळण घेईल, ही वेळच सांगेल, या निर्णयाप्रत आंदोलक पोहचले आहेत.