शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पाटी, पुस्तके घ्यायच्या वयात हातात चायना चाकू कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2022 00:11 IST

गुन्हेगारी मार्गाकडे वळणाऱ्या अल्पवयांमध्ये झोपडपट्टी भागातील मुलांचे प्रमाण अधिक आहे. बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत गेल्या दहा महिन्यांत जवळपास ९९ गुन्हे  चायना चाकू बाळगल्याप्रकरणी दाखल झाले आहे. अवघ्या दिवसांवरच बालदिन येऊन ठेपला आहे. हा बालदिन साजरा करीत असतानाच अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारी चिंतेची बाब आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रस्त्यावर बिनधास्तपणे ट्रिपल सीट जाणारी... गाडीला चुकून धक्क लागला तर अंगावर धावून जात हाणामाऱ्यांवर उतरणारी.. हातात तलवारी घेऊन दहशत पसरविणाऱ्या सराईत गुंडांबरोबर लीलया वावरणारी... पदाचाऱ्यांच्या हातून मोबाइल हिसकावून पळून जाणारी ही अल्पवयीन मुलेच हळूहळू गुन्हेगारी विश्वाचा चेहरा बनू लागली आहेत. झटपट पैसा मिळविण्याच्या आमिषाने ते गुन्हेगारीकडे वळत आहेत.गुन्हेगारी मार्गाकडे वळणाऱ्या अल्पवयांमध्ये झोपडपट्टी भागातील मुलांचे प्रमाण अधिक आहे. बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत गेल्या दहा महिन्यांत जवळपास ९९ गुन्हे  चायना चाकू बाळगल्याप्रकरणी दाखल झाले आहे. अवघ्या दिवसांवरच बालदिन येऊन ठेपला आहे. हा बालदिन साजरा करीत असतानाच अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारी चिंतेची बाब आहे. 

ही आहेत कारणे

अल्पवयीन मुलांना फारशी गंभीर शिक्षा होत नसल्याने टोळ्यांकडून अल्पवयीन मुलांना ढाल बनविणे सहज साेपे झाले आहे. हाणामारी असो किंवा वाहनचोरी. या गुन्ह्यांंमध्ये मुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.अधिक परिस्थिती बिकट असल्याने कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण घेऊ न शकणारी अनेक मुले शिक्षणापासून कायमची दुरावली आहेत. यातच आई-वडील विभक्त राहत असल्याचा फटकाही मुलांना बसत आहे.पालक कामानिमित्त घराबाहेर जात असल्याने घरात मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशी स्थिती आहे. मुलगा नक्की कुणाच्या संगतीत आहे, तो कुणाबरोबर जातो, याचा बहुतांश पालकांना पत्ताच नाही, ही वस्तुस्थिती आहे.

पोलीस म्हणतात....

मुलगा एखाद्या गुन्ह्यात सापडतो तेव्हाच पालकांना कळते. त्यामुळे मुलांना गुन्ह्यांपासून प्रवृत्त करण्यासाठी पोलीस दलानेच कंबर कसली आहे.

होप फाॅर चिल्डन सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शहरातील सर्व पोलीस ठाण्यात कृती कार्यक्रम राबविला जात आहे.

शहर पोलीस आयुक्तालयातील १० पोलीस ठाण्यात बाल कल्याण अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. यात पालकांशी संवाद साधून गुन्हेगारीमागची कारणे जाणून घेतले जात आहे.

जी मुले शिक्षणापासून दुरावली आहेत. त्यांना शिक्षण पूर्ण करायचे असल्यास स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून संधी दिली जात आहे. चोऱ्या-माऱ्या सोडायला लावण्याच्या दृष्टीने मुलांना व्होकेशनल कोर्सेस दिले जात आहेत.

कायदा काय सांगतो?

बाल न्याय अधिनियम (काळजी व संरक्षण) २०१५नुसार सात ते अठरा वर्षांखालील ज्याने गुन्हा केल्यास त्यांच्याविषयी निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार बाल न्याय मंडळास आहेत.

पोलिसांनी बालकाला ताब्यात घेतल्यास २४ तासांच्या आत बाल न्याय मंडळासमोर हजर करणे आवश्यक आहे.

बालक पोलिसांच्या ताब्यात असताना त्याला हातकडी, मारहाण, पोलीस कोठडी अथवा कारागृहात ठेवण्यास मनाई आहे. तसेच पालकांसह परिविक्षा अधिकारी यांना कळविणे बंधनकारक आहे.

बालकांची जमानत नाकारल्यास निरीक्षणगृहात त्याची तात्पुरती व्यवस्था करणे आवश्यक आहे.

बेकायदेशीर कृत्यासाठी बालकांचा वापर करणारी व्यक्ती कठोर कारावास व शिक्षेस पात्र समजली जाईल.

संबंधित ठाणेप्रमुखांकडून अल्पवयीन आरोपी व त्यांच्या पालकांची वेळोवेळी समुपपदेशन करण्यात येते. तसेच ठाणेदार व एसीपींना त्याअनुषंगाने निर्देश दिले आहेत. आयुक्तालयात कार्यशाळा घेण्यात आल्या.- डॉ. आरती सिंह. पोलीस आयुक्त

काेरोना काळात ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांनी मुलांच्या हाती मोबाइल दिला. आता मुले मोबाइलशिवाय राहत नाहीत. त्यांना जणू वेड लागले, अशा बहुतांश पालकांच्या तक्रारी आहेत. विभक्त कुटुंब हीदेखील मोठी समस्या आहे. आई-वडिलांच्या संस्कारात उणिवा आहेत. पालक मुलांना वेळ देत नाहीत. त्यामुळे मुलांना शालेय अभ्यासक्रमात जीवन कसे जगावे याचे ज्ञान व्हावे आणि लहानपणापासून संस्कार देण्याकडे पालकांनी लक्ष देणे काळाची गरज आहे.- किरण मिश्रा, अध्यक्ष, बाल न्याय मंडळ

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी