शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

ग्रामीण भागात घरोघरी होणार नाळजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST

अमरावती : जल जीवन मिशन या राष्ट्रीय कार्यक्रमात ग्रामीण भागांतील सर्वांना नळजोडणीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून ‘हर ...

अमरावती : जल जीवन मिशन या राष्ट्रीय कार्यक्रमात ग्रामीण भागांतील सर्वांना नळजोडणीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून ‘हर घर नल से जल’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. २३ जुलैपासून सुरू झालेला हा उपक्रम ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांचे गाव कृती आराखडा कालबद्ध व अचूक पद्धतीने बनवून घेणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. याखेरीज गाव कृती आराखडा निर्मितीकरिता कोबो कलेक्ट आधारित साधनांचा वापर करण्यासाठी जिल्हास्तरावरील मनुष्यबळाची क्षमता बांधणी, जिल्हा व तालुकास्तरावरील तज्ञ प्रशिक्षकांची क्षमता बांधणी, गावपातळीवर संकलित झालेली माहिती व आकडेवारी डिजिटल माध्यमातून भरून गाव कृती आराखडा व पर्यायी जिल्हा कृती आराखडा तयार केला जाईल. यावेळी राज्य पाणी व स्वच्छता विभाग तसेच युनिसेफच्यावतीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हास्तरावरील सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार यांना आभासी पद्धतीने गाव कृती आराखडा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याप्रमाणे राज्य शासनातर्फे जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांसाठीसुद्धा आभासी पद्धतीने प्रशिक्षण दिले आहे. पुढे हेच प्रशिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर अंगणवाडी सेविका, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या दोन सदस्यांना जिल्हास्तरावर प्रशिक्षण देतील. यानंतर १ ते ३ ऑगस्ट दरम्यान गाव कृती आराखडे करता लागणारी आवश्यक माहिती गोळा करून त्या माहितीच्या आधारे आराखडे पूर्ण केले जातील. या आराखड्याची तालुकास्तरावर ५ ते ७ ऑगस्टला पडताळणी करून आवश्यक सुधारणेस १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत आराखडा वाचन करून मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.