शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

सुट्यांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 00:15 IST

येथील प्रादेशिक वनविभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वनरक्षक भरती प्रक्रियेदरम्यान २ ते ११ नोव्हेंबर...

आदेश : वनरक्षक भरतीचा परिणामअमरावती : येथील प्रादेशिक वनविभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वनरक्षक भरती प्रक्रियेदरम्यान २ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत वनाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्यांना ‘ब्रेक’ लावण्यात आला आहे. दिवाळीनंतर होणाऱ्या वनरक्षक भरती प्रक्रियेचा फटका वनकर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्याअनुषंगाने मुख्य वनसंरक्षकाने आदेश निर्गमित केले आहे.प्रादेशिक वनविभागाच्या अधिपत्याखाली ६९ जागांसाठी ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान वनरक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. इयत्ता १२ वी विज्ञान उत्तीर्ण असलेल्यांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. वनविभागाने वनरक्षक भरतीसाठी यापूर्वीच आॅनलाईन अर्ज मागविले आहे. ७९ वनरक्षकांच्या जागेसाठी सुमारे २६ हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. स्थानिक नांदगाव पेठ येथील पंचताराकीत औद्योगिक वसाहत परिसरात ही भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान होऊ घातलेल्या वनरक्षक भरतीसाठी कोणत्याही उणिवा भासणार नाही, याचे सूक्ष्म नियोजन मुख्य वनसंरक्षक संजीव गौड करीत आहेत. ५ नोव्हेंबर रोजी रनिंग त्यानंतर चालचाचणी, शारिरीक चाचणी आणि पुढे निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. भरती प्रक्रिया होईस्तोवर कोणत्याही कर्मचाऱ्यांना ५ ते १० नोव्हेंबर पर्यत रजा मंजुरी अथवा सुटी मिळणार नाही, असे आदेश सीसीएफने काढले आहे. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी दिवाळीनंतर कौटुंबिक सहल, मौजमजा अथवा नातेवार्इंकाकडे भेटी देण्याचे नियोजन केले असेल तर या नियोजनावर विरजन येण्याची दाट शक्यता आहे. वनकर्मचाऱ्यांना सुटी नाही, असा फतवा काढताना केवळ अपवादात्मक स्थितीत सुटी देता येईल, असे संकेत मुख्य वनसंरक्षकांचे आहेत. वनरक्षकांच्या ६९ जागांसाठी सुमारे २६ हजार अर्ज आले आहेत. शासन नियमावलीनुसार ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. वनविभागाने ५ ते १० या कालावधीत ही भरती पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.- हेमंत मीनाउपवनसंरक्षक, अमरावती.