शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

सुट्यांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 00:15 IST

येथील प्रादेशिक वनविभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वनरक्षक भरती प्रक्रियेदरम्यान २ ते ११ नोव्हेंबर...

आदेश : वनरक्षक भरतीचा परिणामअमरावती : येथील प्रादेशिक वनविभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वनरक्षक भरती प्रक्रियेदरम्यान २ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत वनाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्यांना ‘ब्रेक’ लावण्यात आला आहे. दिवाळीनंतर होणाऱ्या वनरक्षक भरती प्रक्रियेचा फटका वनकर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्याअनुषंगाने मुख्य वनसंरक्षकाने आदेश निर्गमित केले आहे.प्रादेशिक वनविभागाच्या अधिपत्याखाली ६९ जागांसाठी ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान वनरक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. इयत्ता १२ वी विज्ञान उत्तीर्ण असलेल्यांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. वनविभागाने वनरक्षक भरतीसाठी यापूर्वीच आॅनलाईन अर्ज मागविले आहे. ७९ वनरक्षकांच्या जागेसाठी सुमारे २६ हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. स्थानिक नांदगाव पेठ येथील पंचताराकीत औद्योगिक वसाहत परिसरात ही भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान होऊ घातलेल्या वनरक्षक भरतीसाठी कोणत्याही उणिवा भासणार नाही, याचे सूक्ष्म नियोजन मुख्य वनसंरक्षक संजीव गौड करीत आहेत. ५ नोव्हेंबर रोजी रनिंग त्यानंतर चालचाचणी, शारिरीक चाचणी आणि पुढे निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. भरती प्रक्रिया होईस्तोवर कोणत्याही कर्मचाऱ्यांना ५ ते १० नोव्हेंबर पर्यत रजा मंजुरी अथवा सुटी मिळणार नाही, असे आदेश सीसीएफने काढले आहे. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी दिवाळीनंतर कौटुंबिक सहल, मौजमजा अथवा नातेवार्इंकाकडे भेटी देण्याचे नियोजन केले असेल तर या नियोजनावर विरजन येण्याची दाट शक्यता आहे. वनकर्मचाऱ्यांना सुटी नाही, असा फतवा काढताना केवळ अपवादात्मक स्थितीत सुटी देता येईल, असे संकेत मुख्य वनसंरक्षकांचे आहेत. वनरक्षकांच्या ६९ जागांसाठी सुमारे २६ हजार अर्ज आले आहेत. शासन नियमावलीनुसार ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. वनविभागाने ५ ते १० या कालावधीत ही भरती पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.- हेमंत मीनाउपवनसंरक्षक, अमरावती.