शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

संत्राउत्पादक शेतकऱ्यांची होळी बेरंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:12 IST

बॉटम पान २ ची मोर्शी तालुका : २२ हजार हेक्टरवर उत्पादन, शेतकरी चिंतेत मोर्शी : तालुक्यातील प्रमुख फळपीक असलेल्या ...

बॉटम पान २ ची

मोर्शी तालुका : २२ हजार हेक्टरवर उत्पादन, शेतकरी चिंतेत

मोर्शी : तालुक्यातील प्रमुख फळपीक असलेल्या संत्र्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तालुक्यात २२ हजार हेक्टरवर संत्राउत्पादन घेतले जाते. परंतु, एकूण उत्पादनाच्या ४० टक्के संत्री आकाराने लहान असल्याने तसेच या भागामध्ये नागपुरी संत्र्यावर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प नसल्यामुळे त्याला योग्य भाव मिळत नाही. परिणामी तो एक तर मातीमोल भावाने विकावा लागतो किंवा फेकून देण्याशिवाय पर्याय राहत नाही. प्रत्यक्षात अशी संत्री प्रक्रियेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची होळी बेरंग गेली आहे.

विदर्भात एकही प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्राउत्पादक दरवर्षी त्याच समस्यांना तोंड देत आहेत. डिंक्या, कोळशीचा प्रादुर्भाव, तंत्रज्ञानाचा नैसर्गिक आपत्तीचा विळखा, सिंचनाचे नगण्य प्रमाण, एकही प्रक्रिया उद्योग नसणे, निर्यातशून्य धोरण, सदोष फळपीक विमा अशी असंख्य कारणे यासाठी जबाबदार आहेत. काही वर्षांपासून कमी होणाऱ्या पावसाळ्यामुळे उद्भवणारी पाणीटंचाई, नापिकी, दुष्काळ वादळी पाऊस, गारपीट, शेती पिकांवर येणारे रोग, शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, यामुळे नापिकी, पाणीटंचाई या सर्व प्रकाराला कंटाळून वाढलेल्या शेतकरी आत्महत्यांनी या रंगाचा बेरंग झाला आहे. खेड्यापाड्यांतील भीषण वातावरणाचा रंग चढल्याने शेतकरी, शेतमजुरांच्या आयुष्यातील खरे रंगच नाहीसे झाले आहेत. किंबहुना गरिबी, कुपोषण, दारिद्रय़, महागाई या भेसूर रंगात रंगलेल्या शेतकरी-शेतमजुरांच्या वास्तवाचा भयाण रंग अन्य कुठल्याही रंगाने झाकला जाणार नाही, अशी परिस्थिती आहे.

लागोपाठ पाच वर्षांपासून अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यावर्षी चांगला पाऊस झाला. शिवारात पिकेही जोमदार आली. पण, दराअभावी शेतमाल मातीमोल झाला. मोर्शी तालुका विक्रमी संत्राउत्पादनासाठी प्रसिद्ध असूनही संत्राउत्पादक शेतकऱ्यांना ३५ ते ४० हजार रुपये टन विकली जाणारी संत्री ६ ते १० हजार रुपये टन दराने विकावी लागली. विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करणारे प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे व कोरोनामुळे शेतकरी संकटात आहेत. संत्री, मोसंबी तूर, हरभरा, गहू, मका, कापूस अशा पिकांसाठी उत्पादित माल साठवण करण्याची व्यवस्था व जागा उपलब्ध नसल्याने सर्व बाजूंनी शेतकरी विवंचनेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल नाईलाजाने व्यापाऱ्यांना कमी भावामध्ये विकून गरजा पूर्ण कराव्या लागत आहेत.

-----