शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

हिरूळपूर्णाच्या मायलेकाची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:01 IST

मुंबईहून माहेरी १७ मे रोजी परतलेली २५ वर्षीय महिला व तिच्या तीन वर्षीय मुलाला हिरूळपूर्णा गावातच क्वारंटाईन सेंटरवर ठेवण्यात आले. त्या महिलेच्या पतीचा अहवाल मुंबई येथे कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तालुका प्रशासनाने माय-लेकाला २२ मे रोजी अमरावती येथे हलविले. २४ मे रोजी रात्री ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच दहशत पसरली होती.

ठळक मुद्देघरी परतले : गाव दहशतमुक्त, जगण्याच्या जिद्दीला सलाम

सुमीत हरकूट ।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : कल्याण (मुंबई) येथून माहेरी परतलेल्या माय-लेकांमुळे तालुक्यात कोरोनाचा सर्वप्रथम शिरकाव झाला. मात्र, सकारात्मक दृष्टिकोन व जिद्दीमुळे तालुक्यातील ते पहिले कोरोनाग्रस्त आता कोरोनामुक्त झाले आहेत. ते हिरूळपूर्णा येथील स्वगृही परतले आहेत. यामुळे गावच नव्हे, अख्ख्या चांदूरबाजार तालुक्यास दिलासा मिळाला आहे.मुंबईहून माहेरी १७ मे रोजी परतलेली २५ वर्षीय महिला व तिच्या तीन वर्षीय मुलाला हिरूळपूर्णा गावातच क्वारंटाईन सेंटरवर ठेवण्यात आले. त्या महिलेच्या पतीचा अहवाल मुंबई येथे कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तालुका प्रशासनाने माय-लेकाला २२ मे रोजी अमरावती येथे हलविले. २४ मे रोजी रात्री ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच दहशत पसरली होती. त्या माय-लेकाला उपचारासाठी अमरावतीच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तसेच त्यांच्या संपर्कात आलेले नऊ नातेवाईक व १८ इतर व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. याशिवाय गावातील ५८ व्यक्तींना चांदूर बाजार येथील क्वारंटाईन सेंटरला दाखल करण्यात आले होते. सलग १३ दिवस वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये त्या माय-लेकाने कोरोनाशी झुंज दिली. त्या तीन वर्षीय चिमुकल्यास तर १३ दिवस ना आई दिसली, ना कुणी आप्त. कोविड रुग्णालयातील वार्डात त्याने डॉक्टर व परिचारिकांच्या स्नेहाने लढाई जिंकली. १३ दिवसानंतर पुन्हा दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये दोन्ही रुगणांचा अहवाल निगेटिव्ह आला तसेच या मायलेकाच्या संपर्कात आलेल्या सर्व २७ व्यक्तींचे अहवालसुद्धा निगेटिव्ह प्राप्त झाले. कोरोनामुळे दहशतीत सापडलेल्या हिरूळपूर्णा रहिवाशांनी यामुळे सुटकेचा श्वास सोडला. कोविड रुग्णालयातील उपचारानंतर ३ जून रोजी ते माय-लेक घरी परतले आहेत.तूर्तास माहेरीकोरोनावर यशस्वी मात करणारी महिला तिच्या मुलासह माहेरी हिरूळपूर्णा येथेच वास्तव्यास आहे. खबरदारी म्हणून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तालुका महसूल व आरोग्य प्रशासनाने खबरदारी घेत तातडीने सूत्रे हलविले. हायरिस्क, लोरिस्कच्या व्यक्तींची यादी बनवून त्यांना होम व इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले. अख्खे गाव सॅनिटाइज करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी ही संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्याने संपर्कातील व्यक्तींना तातडीने क्वारंटाईन करण्यात आले. परिणामी संसर्ग रोखला गेला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या