शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

शाळा सुरू करण्याचा निर्णय टळत असल्याने हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:17 IST

अमरावती : राज्य शासनाकडून आतापर्यंत तीन वेळा शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्येक वेळी लगेचच पुन्हा शाळा ...

अमरावती : राज्य शासनाकडून आतापर्यंत तीन वेळा शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्येक वेळी लगेचच पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द होत असल्याने विद्यार्थी शिक्षक व पालकांचा हिरमोड होत आहे. दोन वर्षांपासून ऑनलाईन अभ्यासक्रमाचा मुलांना आता कंटाळा आला आहे. शाळेत हसत खेळत व समजून घेत शिकण्यास विद्यार्थी उत्सुक असताना शाळेची घंटा वाजत नसल्याने पालकांची नाराजी दिसून येत आहे.

बॉक्स

नियमित वर्ग सुरू होणे गरजेचे आहे

ऑनलाईन प्रणालीने शाळा सुरू आहेत .मात्र ग्रामीण भागातील मुलांकडे स्मार्टफोन मोबाईल नाही. त्याशिवाय नेटवर्कची ही समस्या आहे. शासन आणि वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्याना विविध माध्यमातून शैक्षणिक कार्य करण्याचे काम केले जात आहे. असे असले तरी मुलांच्या सर्वागीण विकासासाठी शाळा वर्ग सुरू होणे गरजेचे असल्याचे मत शिक्षकामधून व्यक्त होत आहे.

बॉक्स

नियम घालून शाळा सुरू व्हाव्यात

ऑनलाइन प्रणालीची गोडी आता संपत असल्याचे दिसून येत आहे. मुले मोबाईलचा वापर अभ्यास करण्यापेक्षा अन्य मनोरंजनासाठी करीत असल्याचे दिसून येत आहे. मुलांचा अष्टपैलू दृष्टिकोनातून विकास होण्यासाठी शाळा वर्ग होणे आवश्यक आहे.

बॉक्स

गुणवत्ता ढासळत आहे

गेल्या दोन वर्षापासून सरसकट सर्वच विद्यार्थ्याना उत्तीर्ण करण्यात येत आहे. यामुळे मुलांची शिक्षणातील रुची कमी होत आहे. मोबाईलवर केवळ अर्धा तास घातला तर पास होता येते असा समज आता मुलामध्ये होत आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक दर्जा ढासळत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर शैक्षणिक दर्जा खूपच खालावला जाणार आहे. यामुळे शाळा सुरू करणे महत्वाचे असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत.