शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

बांगलादेश हिंसाचाराच्या विरोधात अमरावतीमध्ये सकल हिंदू समाजाचा महामोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:24 IST

Amravati : हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने पुढाकार घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : बांगलादेश हिंसाचारामध्ये जाणीवपूर्वक तेथील अल्पसंख्याक हिंदूंना टार्गेट करत त्यांच्या घरावर हल्ला करणे, त्यांची दुकाने लुटणे, मंदिरांची तोडफोड करणे अशा घटना घडत आहेत. त्या हिंसाचाराविरोधात रविवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात महामोर्चा काढण्यात आला. त्यात शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले होते. या मोर्चातून बांगलादेशातील हिंदूच्या रक्षणासाठी भारत सरकारने उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली.

बांगलादेशातील आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने होत आहेत. त्याच अनुषंगाने रविवारी सकल हिंदू संघटनांच्या वतीने शहरात महामोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटना तसेच राजकीय पक्षांनी या महामोर्चात सहभाग घेतला होता. नेहरू मैदानातून निघालेला हा मोर्चा इर्विन चौकामध्ये पोहोचल्यानंतर येथे जाहीर सभा घेण्यात आली. या सभेतून हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सर्व हिंदूंनी एक होण्याचे आवाहन करण्यात आले. या मोर्चामध्ये हिंदू महासभा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान, हिंदू जनजागरण समिती, दुर्गादेवी मंदिर समिती, श्रीमद्भागवत कथा समिती, राष्ट्रीय स्वयंसेवा संघ, साई झुलेला फाउंडेशन, भाजप, शिवसेना, मनसे आणि विविध हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया, नानकराम नेभनानी, शक्ती महाराज, रामानुज वैष्णवाचार्य अच्छुतानंद, रणछोड क्रिष्णदास, सुंदरनाथदास, अमोल अधम, योगी शालीकराम अवघड, बंटी पारवानी यांच्यासह शेकडो हिंदू महिला व पुरुष सहभागी झाले होते.

मोर्चातून या केल्या मागण्या

  • बांगलादेशातील हिंदूवरील हल्ले, घरांची लूट, मंदिरांवरील हल्ले, मूर्तीची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवावा. 
  • सैन्यदलाला कठोर सूचना द्याव्यात, बांगलादेशातील हिंदूवरील वाढते हल्ले लक्षात घेता तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी. 
  • हिंदूंच्या जीवित वा मालमत्ता यांची जी हानी झाली त्याची तातडीने भरपाई करावी
  • हिंसाचारामुळे तेथील जे हिंदू विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील, त्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे आश्रय द्यावा. 
  • मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपयायोजना कराव्यात.
टॅग्स :Amravatiअमरावती