शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

अतिवृष्टीसाठी मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 00:08 IST

पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. अतिवृष्टी झाली. यामुळे बाधित पिकांना शासनाद्वारे मदत देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

महसूल विभागाचे आदेश : १३ हजार हेक्टर क्षेत्राला होणार लाभतिवसा : पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. अतिवृष्टी झाली. यामुळे बाधित पिकांना शासनाद्वारे मदत देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. याबाबत ९ जानेवारीला महसूल विभागाचे आदेश धडकले आहे. राज्यात गतवर्षी जून ते आॅक्टोबर दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे पिके बाधित होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यातदेखील पावसाच्या १२० दिवसांत सरासरीपेक्षा अधिक ८६७.८ मिली. व ११५.२ टक्के पाऊस पडला. यामुळे सोयाबीन, तूर, मूग व उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या आपत्तीमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या पिकांना शासनाच्या निर्णयामुळे मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेला आहे. अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर या पीक विमा योजनेच्या निकषानुसार विमा यंत्रणेद्वारे मदत देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा काढलेला आहे. अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेंतर्गत मंडळनिहाय भरपाईची जी मदत देय असेल त्या रकमेच्या ५० टक्के प्रमाणात विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात ५२ दिवस विविध गावांमध्ये अतिवृष्टी झाली, यामुळे सोयाबीनचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर ६० दिवसांच्या कालावधीत असणारे मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले तसेच सततच्या पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे हजारो हेक्टरमधील तुरीच्या पिकावर ‘मर’ रोगाचे आक्रमण झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात कमी आली. मात्र आता शासनाने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे बाधित पिकांना मदत मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (तालुका प्रतिनिधी)१९ हजार ५९० शेतकऱ्यांचे १२६६९ हेक्टर क्षेत्र बाधितगतवर्षी जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत १९ हजार ५९० शेतकऱ्यांचे १२ हजार ६६९ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यावर नुकसान झाले. यामध्ये सोयाबीन १५५१ हेक्टर, कापूस ६६५ हेक्टर, तूर १३४२ हेक्टर, मूग व उडीद ९०४७, फळपिके १४.९२ हेक्टर, ज्वारी ७.८५ हेक्टर व भाजीपाला पिकांचे ४०.४४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहेत.दोन हेक्टर मर्यादेत राहणार मदतप्रचलित नियमानुसार शेती व बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीसाठी ३३ टक्के व त्याहून अधिक नुकसान झालेल्या नुकसानीसाठी ही मदत मिळणार आहे. ही मदत दोन हेक्टर मर्यादेत मिळणार आहे. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्याबाबत शासनाला सादर अहवालानुसार ही मदत मिळणार आहे. पंचनाम्यासोबत छायाचित्र अनिवार्यअतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्यासोबत जीपीएस छायाचित्र आवश्यक आहे. उभे पीक, त्याचे नुकसान या सर्व बाबींसोबत संबंधित शेतकरी शेतात उभे असल्याचे या चित्रात दिसावयास हवे. मदतीची शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रकम जमा करण्यात येईल व या मदतीमधून बँकेला कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही.