शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

९.६० लाख डोक्यांवर लागणार हेल्मेट

By admin | Updated: February 7, 2016 01:00 IST

औरंगाबाद-पुण्यापाठोपाठ संपूर्ण राज्यातच हेल्मेटची सक्तीचा निर्णय परिवहनमंत्र्यांनी घेतला आहे.

निर्णय हेल्मेट अंमलबजावणीचा : जनजागृतीची मोहीम राबविणारप्रदीप भाकरे अमरावतीऔरंगाबाद-पुण्यापाठोपाठ संपूर्ण राज्यातच हेल्मेटची सक्तीचा निर्णय परिवहनमंत्र्यांनी घेतला आहे. या अनुषंगाने राज्यासह जिल्ह्यातही हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीचे वादळ घोंगावत आहे. हेल्मेट सक्ती झाल्यास जिल्ह्यात तब्बल ९.६० लाख डोक्यांवर हेल्मेट लागणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागामध्ये जिल्ह्यातील ४,८०,२५३ दुचाकींची नोंद आहे. वाहन चालविणाऱ्यांसोबतच मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट असणे बंधनकारक आहे. त्या पार्श्वभूमिवर एकट्या अमरावती जिल्ह्यात दुचाकींची संख्या पाहता ९ लाख ६० हजारांहून अधिक हेल्मेट लागणार आहेत. पुणे आणि औरंगाबाद येथे हेल्मेट सक्तीचा निर्णय लागू झाल्याने राज्यात सर्वत्र हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीबाबत पोलीस प्रशासन सर्व दृष्टीने अभ्यास करीत आहे. हेल्मेटमुळे डोक्याला दुखापतीची शक्यता कमी होत असल्याने हेल्मेटसाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यामुळे सक्ती करण्यापूर्वी पोलिसांकडून जनजागृतीची मोहीम हाती घेतली जाईल व त्यानंतरच हेल्मेट सक्तीची तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस विभागाने दिले आहेत.कसे असावे हेल्मेट ?हेल्मेट आयएसआय मार्कचे असावे. हेल्मेट लाईट रंगाचे, अंधारात दिसेल असे असावे, काळ्या रंगाचे हेल्मेट नकोच. हेल्मेटला हनुवटीची पटरी असावी, हेल्मेटला लाल रंगाचे रिफ्लेक्टर असावे, मानेच्या मागच्या रुंदीइतका रिफ्लेक्टर असावा. लाल-पिवळ्या रंगाचे हेल्मेट असावे.हेल्मेटची किंमत १५०० रुपयांपर्यंतअमरावती शहरामध्ये ३८० ते पुढे १५०० रुपयांपर्यंत आयएसआय मानांकनाचे हेल्मेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हेल्मेट सक्ती नसतानाही दर महिन्याला ३०० ते ४०० हेल्मेट विकले जातात. यात बनावट आयएसआय मार्कचे हेल्मेटही चढ्या भावाने विकले जातात. त्यामुळे हेल्मेट खरेदी केल्यानंतर बिल अवश्य घ्यावे.मागे बसणाऱ्यांनाही सक्तीअपघाताची तीव्रता टाळण्यासाठी दुचाकीवरील दोन्ही व्यक्तींना हेल्मेट घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. परिवहन आयुक्तांनी यासंदर्भात प्रसिध्दी पत्रक काढले. न्यायालयाने यासंदर्भात सन २००३ मध्येच आदेश दिले होते. हेल्मेटचा नियम भल्यासाठीहेल्मेट वापरण्याचे गांभीर्य आपल्याला नाही. सांभाळण्याचा कंटाळा येतो म्हणून आपण हेल्मेट घालण्याचे टाळतो. तरूण मंडळी तर केस विस्कटतील म्हणून हेल्मेट घालत नाहीत. परंतु हेल्मेट न घातल्यामुळे झालेला अपघात जीवावर बेतणारा असू शकतो. हेल्मेटचा नियम आपल्या सर्वांसाठी आहे, अशी प्रतिक्रिया वाहतूकचे एसीपी बळीराम डाखोरे यांनी व्यक्त केली.