शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

चांदूर रेल्वे तालुक्यात भीषण टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 01:07 IST

तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईग्रस्त बनली आहेत. ग्रामीण भागातील नागरिक दिवस-रात्र पाणी आणण्यात व्यस्त आहेत. पाणीपुरवठा करणारी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतातील संत्राबागांना पाणीपुरवठा होत नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे त्या वाळल्या आहेत.

ठळक मुद्देसंत्राबागा सलाईनवर। शासकीय यंत्रणा कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईग्रस्त बनली आहेत. ग्रामीण भागातील नागरिक दिवस-रात्र पाणी आणण्यात व्यस्त आहेत. पाणीपुरवठा करणारी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतातील संत्राबागांना पाणीपुरवठा होत नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे त्या वाळल्या आहेत.तालुक्यात ४१ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या. आमला विश्वेश्वर, जळका (जगताप), कावला, सालोरा खुर्द, निमला, सावंगी मग्रापूर या गावांत पाण्याचे टँकर पुरविण्यात आल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र एस.एस.इंगळे यांनी दिली. चांदूर रेल्वे शहरातही भीषण टंचाई असून, पालिका प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मालखेड धरणाच्या तलावातून शहरास पाणीपुरवठा होत आहे. ते धरण अगदी मृतप्राय झाले आहे. त्या ठिकाणी पालिकेने बोअर केल्यास शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो. परंतु, तांत्रिक अडचणीने पाटबंधारे विभागाने बोअरची परवानगी नाकारली. शेवटी पाणी हाऊस टाकीजवळ बोअर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी दिली. पाणीटंचाईमुळे तालुक्यात महिलांची वणवण वाढली आहे. पाण्यासाठी टँकर व विहिरींवर वाद होत आहेत.सिंचन प्रकल्प रखडलेरायगड, दिघी सोनगाव, आमला पाथरगाव उपसा जलसिंचन प्रकल्प निधीअभावी पाच वर्षांपासून रखडले आहेत. जलयुक्त शिवारचा केवळ गवगवा करण्यात आला; मात्र त्यातून ना जलसंधारण झाले, ना जलसंवर्धन. प्रत्येक वर्षी टंचाई निवारणाचा आराखडा तयार केला जात असतो. मात्र, त्यात केवळ मर्यादित कालावधीच्या तात्पुरत्या उपाययोजना असतात. पाणीच नसेल तर विहिरी किंवा बोअर अधिग्रहीत करुन काय लाभ?. नियोजन बारगळेलच ना?

टॅग्स :water shortageपाणीटंचाई