शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

चांदूर रेल्वे तालुक्यात भीषण टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 01:07 IST

तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईग्रस्त बनली आहेत. ग्रामीण भागातील नागरिक दिवस-रात्र पाणी आणण्यात व्यस्त आहेत. पाणीपुरवठा करणारी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतातील संत्राबागांना पाणीपुरवठा होत नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे त्या वाळल्या आहेत.

ठळक मुद्देसंत्राबागा सलाईनवर। शासकीय यंत्रणा कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईग्रस्त बनली आहेत. ग्रामीण भागातील नागरिक दिवस-रात्र पाणी आणण्यात व्यस्त आहेत. पाणीपुरवठा करणारी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतातील संत्राबागांना पाणीपुरवठा होत नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे त्या वाळल्या आहेत.तालुक्यात ४१ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या. आमला विश्वेश्वर, जळका (जगताप), कावला, सालोरा खुर्द, निमला, सावंगी मग्रापूर या गावांत पाण्याचे टँकर पुरविण्यात आल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र एस.एस.इंगळे यांनी दिली. चांदूर रेल्वे शहरातही भीषण टंचाई असून, पालिका प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मालखेड धरणाच्या तलावातून शहरास पाणीपुरवठा होत आहे. ते धरण अगदी मृतप्राय झाले आहे. त्या ठिकाणी पालिकेने बोअर केल्यास शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो. परंतु, तांत्रिक अडचणीने पाटबंधारे विभागाने बोअरची परवानगी नाकारली. शेवटी पाणी हाऊस टाकीजवळ बोअर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी दिली. पाणीटंचाईमुळे तालुक्यात महिलांची वणवण वाढली आहे. पाण्यासाठी टँकर व विहिरींवर वाद होत आहेत.सिंचन प्रकल्प रखडलेरायगड, दिघी सोनगाव, आमला पाथरगाव उपसा जलसिंचन प्रकल्प निधीअभावी पाच वर्षांपासून रखडले आहेत. जलयुक्त शिवारचा केवळ गवगवा करण्यात आला; मात्र त्यातून ना जलसंधारण झाले, ना जलसंवर्धन. प्रत्येक वर्षी टंचाई निवारणाचा आराखडा तयार केला जात असतो. मात्र, त्यात केवळ मर्यादित कालावधीच्या तात्पुरत्या उपाययोजना असतात. पाणीच नसेल तर विहिरी किंवा बोअर अधिग्रहीत करुन काय लाभ?. नियोजन बारगळेलच ना?

टॅग्स :water shortageपाणीटंचाई