शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी तहानलेल्या पिकांना जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 15:37 IST

४८ तासांपासून रिपरिप : जिल्ह्यात खरिपाचा पेरणीचा टक्का ८२ वर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यामध्ये तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सद्यःस्थितीत नऊ तालुक्यांत पावसाची सरासरी माघारली आहे. या पावसाने यापूर्वी पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले. तर, पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांची वाट मोकळी झालेली आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत ५.५८ लाख हेक्टरमध्ये म्हणजेच ८२ टक्के क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहे. 

मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रामध्ये गावात आहे तर शिवारात नाही, अशी अवस्था राहिली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. आता शुक्रवारपासून पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात झाली व वाहन हत्ती आहे. या काळात दमदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. रखडलेल्या पेरणीसोबतच पहिल्या टप्प्यातील पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस पोषक ठरणारा आहे.

जिल्ह्यात १२ जून रोजी मान्सूनची एंट्री झाली व त्याच दिवसापासून वाटचाल मंदावली होती. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची तूट आहे. ९ जुलैपर्यंत २२६.२ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २१०.८ मिमी पावसाची नोंद झाली. ही ९३.२ टक्केवारी आहे.

सद्यःस्थितीत सरासरीच्या सर्वात कमी ४९.६ टक्के पाऊस धारणी तालुक्यात नोंद आहे. याशिवाय अमरावती, अचलपूर, चिखलदरा, भातकुली, तिवसा, मोर्शी, वरुड व धामणगाव रेल्वे तालुक्यांत सरासरीच्या कमी पाऊस झालेला आहे. गतवर्षी याच तारखेला १३१.८ मिलिमीटर म्हणजेच ५८ टक्के पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाने आता १२ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे.

अमरावती, रामतीर्थ, रासेगाव मंडळांत 'जोर'धारजिल्ह्यात ४८ तासांत अमरावती महसूल मंडळात ६७.३ मिलिमीटर व दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ मंडळात ८३.८ व रासेगाव ६८.३ मिलिमीटर पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. याशिवाय २४ तासात चिखलदरा व अमरावती तालुक्यात दमदार पावसाची नोंद झालेली आहे. सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने शहरातील नाल्या तुंबल्याने अनेक भागात पाणी साचले होते.

खरिपाची ८२ टक्के क्षेत्रात पेरणी, सर्वाधिक सोयाबीनजिल्ह्यात सरासरी ६.८२ लाख हेक्टरच्या तुलनेत ५.५८ लाख हेक्टरमध्ये सद्यःस्थितीत पेरणी आटोपली आहे. यामध्ये सोयाबीनची सर्वाधिक २.२५ लाख हेक्टर, कपाशी २ लाख हेक्टर व तुरीची ९८ हजार हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. त्या तुलनेत गतवर्षी याच तारखेला २.८० लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. या आठवड्यात जिल्ह्यातील पेरण्या पूर्णत्वाकडे जातील, असे कृषी विभागाने सांगितले. 

टॅग्स :farmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती