शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी तहानलेल्या पिकांना जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 15:37 IST

४८ तासांपासून रिपरिप : जिल्ह्यात खरिपाचा पेरणीचा टक्का ८२ वर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यामध्ये तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सद्यःस्थितीत नऊ तालुक्यांत पावसाची सरासरी माघारली आहे. या पावसाने यापूर्वी पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले. तर, पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांची वाट मोकळी झालेली आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत ५.५८ लाख हेक्टरमध्ये म्हणजेच ८२ टक्के क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहे. 

मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रामध्ये गावात आहे तर शिवारात नाही, अशी अवस्था राहिली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. आता शुक्रवारपासून पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात झाली व वाहन हत्ती आहे. या काळात दमदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. रखडलेल्या पेरणीसोबतच पहिल्या टप्प्यातील पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस पोषक ठरणारा आहे.

जिल्ह्यात १२ जून रोजी मान्सूनची एंट्री झाली व त्याच दिवसापासून वाटचाल मंदावली होती. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची तूट आहे. ९ जुलैपर्यंत २२६.२ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २१०.८ मिमी पावसाची नोंद झाली. ही ९३.२ टक्केवारी आहे.

सद्यःस्थितीत सरासरीच्या सर्वात कमी ४९.६ टक्के पाऊस धारणी तालुक्यात नोंद आहे. याशिवाय अमरावती, अचलपूर, चिखलदरा, भातकुली, तिवसा, मोर्शी, वरुड व धामणगाव रेल्वे तालुक्यांत सरासरीच्या कमी पाऊस झालेला आहे. गतवर्षी याच तारखेला १३१.८ मिलिमीटर म्हणजेच ५८ टक्के पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाने आता १२ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे.

अमरावती, रामतीर्थ, रासेगाव मंडळांत 'जोर'धारजिल्ह्यात ४८ तासांत अमरावती महसूल मंडळात ६७.३ मिलिमीटर व दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ मंडळात ८३.८ व रासेगाव ६८.३ मिलिमीटर पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. याशिवाय २४ तासात चिखलदरा व अमरावती तालुक्यात दमदार पावसाची नोंद झालेली आहे. सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने शहरातील नाल्या तुंबल्याने अनेक भागात पाणी साचले होते.

खरिपाची ८२ टक्के क्षेत्रात पेरणी, सर्वाधिक सोयाबीनजिल्ह्यात सरासरी ६.८२ लाख हेक्टरच्या तुलनेत ५.५८ लाख हेक्टरमध्ये सद्यःस्थितीत पेरणी आटोपली आहे. यामध्ये सोयाबीनची सर्वाधिक २.२५ लाख हेक्टर, कपाशी २ लाख हेक्टर व तुरीची ९८ हजार हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. त्या तुलनेत गतवर्षी याच तारखेला २.८० लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. या आठवड्यात जिल्ह्यातील पेरण्या पूर्णत्वाकडे जातील, असे कृषी विभागाने सांगितले. 

टॅग्स :farmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती