शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

अमरावती जिल्ह्यातील मुसळधार पावसाने नऊ कोटींच्या रस्ते व पुलांवर फिरवले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 08:00 IST

Amravati News अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल नऊ कोटींच्या रस्ते व पुलांच्या बांधकामावर पाणी फेरले गेले आहे.

अमरावती : दीड महिन्यात तीन वेळा अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती जिल्ह्यावर ओढवली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील रस्ते व पुलाचे मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. याचे तात्पुरत्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटी १४ लाख २५ हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे. कायमस्वरूपी दुरुस्तीकरिता सुमारे ९ कोटी ५६ लाख ६ हजार ५० रुपयांचे नुकसान झाले आहे. या कामांसाठी शासनाकडे विभागीय आयुक्तांमार्फत निधी मागणीचा प्रस्ताव सीईओ अविश्यांत पंडा यांच्या स्वाक्षरीने बांधकाम विभागाने १४ जुलैला सादर केला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. यामुळे नदी नाल्यांना आलेल्या पूरपरिस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील येणाऱ्या जिल्हा (ओडीआर) आणि ग्रामीण मार्गावरील (व्हीआर) रस्त्याचे, तसेच अनेक पूल क्षतिग्रस्त झालेत. यात इतर जिल्हा मार्गाचे ४०.३५ किलोमीटरचे, तर ग्रामीण मार्गाचे २१४.९४ किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत. याशिवाय इतर जिल्हा मार्गावरील ८ पूल, तर ग्रामीण मार्गावरील सहा पूल क्षतिग्रस्त झाले आहेत. इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गावरील रस्ते व पुलाचे अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झेडपीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी सुमारे ३ कोटी १४ लाख २५ हजार रुपयांचा निधी आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे, तर कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी शासनाकडे ९ कोटी ५६ लाख ६ हजार ५० रुपयांच्या निधी मागणीसाठीचा प्रस्ताव झेडपी बांधकाम विभागाने सीईओंच्या स्वाक्षरीने सादर केला आहे.

१४ तालुक्यांत नुकसान

जून ते जुलै या महिन्यात जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे १४ तालुक्यांतील जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गावरील अनेक रस्ते खराब झालेत. याशिवाय काही ठिकाणी पूल क्षतिग्रस्त झाले आहेत. हे सर्व मार्ग रहदारीचे आहेत. नुकसानीबाबतचा विस्तृत माहितीचा अहवाल बांधकाम विभागाने तयार करून हा अहवाल कार्यकारी अभियंता विजय वाठ व अतिरिक्त सीईओ संतोष जोशी यांच्या स्वाक्षरीने सीईओंकडे सादर केला होता.

पाच वर्षांत छदामही मिळाला नाही

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात जिल्हा आणि ग्रामीण मार्गावरील रस्ते व पूल क्षतिग्रस्त झाले आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून शासनाकडे निधी मागणीचे प्रस्ताव सादर केले. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडून २०१३ नंतर या कामासाठी झेडपीला छदामही मिळालेला नाही.

टॅग्स :floodपूर