शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

दुसऱ्या दिवशीही पावसाची जिल्ह्यात जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:01 IST

नांदगाव परिसरात शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची कापणी केली. मात्र, कालपासून होत असलेल्या पावसाने शेतात पाणी साचले. कापलेले सोयाबीनचे गंज पावसात भिजले. त्यास अंकुर फुटण्याची भीती आहे. आधीच  मजूर मिळत नसल्याने मजुरी वाढली. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी सभापती फिरोज खान यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर/धारणी : मान्सूनच्या अखेरीस आता होत असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील काही भाग झोडपून काढले. अमरावती शहरासह जिल्हाभरात शनिवारी रात्रभर कोसळलेल्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे सोयाबीनचे मातेरे झाले. त्यासोबतच कापूसही भिजला आहे. संत्राउत्पादकांनाही शेतात फळांचा सडा पहावा लागत आहे. नांदगाव परिसरात शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची कापणी केली. मात्र, कालपासून होत असलेल्या पावसाने शेतात पाणी साचले. कापलेले सोयाबीनचे गंज पावसात भिजले. त्यास अंकुर फुटण्याची भीती आहे. आधीच  मजूर मिळत नसल्याने मजुरी वाढली. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी सभापती फिरोज खान यांनी केली आहे.धारणी परिसरातही पावसाने सोयाबीन, कपाशी आणि तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वेसह जिल्हाभरातील बागायती संत्रा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशीची शेते पांढरी शुभ्र झाली आहेत. परंतु, वेचण्याकरिता मजूर मिळत नसल्यामुळे तो ओला होऊन मातीमोल झाल्याचे दिसून येत आहे. संत्र्याची आंबिया बहराची फळे गळाली आहेत. त्यांचा सडा झाडाखाली दिसून येत आहे. शेंदोळा येथील एका शेतकऱ्याचे चार एकरातील कापलेले सोयाबीन पाण्यावर तरंगले. शिरजगावात संत्र्याचा सडा पडला. दरम्यान, अमरावती, अचलपूर, धारणी, वरूड, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार या तालुक्यांमध्ये रविवारी दिवसभर पाऊस झाला, तर सायंकाळी अर्धा ते दीड तासांपर्यंत टपोऱ्या थेंबांनी झोडपून काढले. या पावसामुळे खरीप हंगाम हातचा जाणार का, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये दाटली आहे.  

बाजार समितीत गहू, सोयाबीन भिजलेअमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल दुपारी ३ वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी खरेदी केला. व्यापाऱ्यांनी तो गोदामात नेण्यास उशीर केल्याने रात्रीच्या पावसाने सोयाबीन आणि गहू काही प्रमाणात भिजला. बाजार समिती रविवारी बंद राहत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी शनिवारी शेतमाल विक्रीला आणला नाही.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती