शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

खातेप्रमुखांच्या सूचना : शिक्षकांना पाच वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By admin | Updated: June 24, 2016 23:55 IST

प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी उपलब्ध जागांवर वृक्षलागवड करणे गरजेचे असून शासनाने यासाठी विविध विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठरवून दिले आहे.

वृक्ष लागवडीसाठी स्वत: करावा लागणार खर्चअमरावती : प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी उपलब्ध जागांवर वृक्षलागवड करणे गरजेचे असून शासनाने यासाठी विविध विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठरवून दिले आहे. यासाठी कर्मचारी अधिकाऱ्यांना वृक्षलागवडीसाठी स्वत: खर्च करण्याचे लेखी आदेश शिक्षण विभागाने काढले आहे. शिक्षकांनी किमान पाच वृक्ष खरेदीच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.जिल्हा परिषद शिक्षण विभागाला १ जुलै रोजी शाळेसह परिसरात तसेच कार्यालयाच्या ठिकाणी वृक्षारोपण करावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. वृक्षारोपण करण्याबरोबरच त्यांचे संगोपन, ही काळाची गरज आहे. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून लावलेल्या प्रत्येक झाडांची शिक्षक-मुख्याध्यापकांना सर्वतोपरी काळजी घ्यावी लागणार आहे. या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांना वाटून दिली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या सुमारे १ हजार ६०० शाळांसह, नगरपरिषद, खासगी अनुदानित, खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आदी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांतील प्रत्येक शिक्षकाने स्वत: किमान ५ वृक्ष विकत घेऊन शाळेत, ई-क्लास जमिनी, गावाबाहेर, शिवारात, शेतावर, घरी, रस्त्याच्या दुतर्फा लावावीत, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात शाळांना दिल्यात. १ जुलैच्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी शिक्षण विभागाने पूर्ण तयारी केली आहे. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे. लोकसहभागातून वृक्षारोपण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)