शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

मागेल त्याला कृषिपंपाचे वीज कनेक्शन’ घोषणा फसवी

By admin | Updated: June 7, 2015 00:29 IST

एका पावसाने पीक हातचे जात आहे. कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

शेतकऱ्यांचा आरोप : मार्च १५ पर्यंत पैसे भरलेले १०,६९२ कृषिपंपाचे अर्ज प्रलंबितअमरावती : एका पावसाने पीक हातचे जात आहे. कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला कृषिपंपाचे वीज कनेक्शन, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे केली होती. मात्र जिल्ह्यात मार्च २०१५ अखेरपर्यंत १० हजार ६९२ शेतकऱ्यांनी कृषिपंप वीजजोडणीचे पैसे भरुनही जोडण्या केल्या नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. कोरडवाहू शेतीवर विसंबून न राहता शेतकऱ्यांची बागायती शेती करावी व यामधून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावावा, नापिकीमुळे शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हायची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने धडक सिंचन योजनेचा कार्यक्रम घेतला आहे. याअंतर्गत हजारो विहिरींची कामे होत आहेत व याकरिता मागेल त्याला कृषिपंपाचे वीज कनेक्शन, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. प्रत्यक्षात वीज वितरण कंपनीकडे मार्च २०१४ अखेर तालुकानिहाय कृषिपंप जोडणीकरिता पैसे भरुन ९५९७ अर्ज प्रलंबित आहेत. जिल्ह्याला ४७ कोटींचे विशेष पॅकेज मिळाले आहे. यामध्ये ३१ मर्च २०१५ पर्यंतचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात येणार आहे. इन्फ्रा-२ स्किम मध्ये ट्रान्सफार्मरची कामे करण्यात येणार आहेत. मधल्या काळात कोणतीच योजना नसल्याने अर्ज प्रलंबित होते. - दिलीप मोहोड, कार्यकारी अभियंता,वीज वितरण कंपनी.जिल्ह्याला ४७ कोटींचे विशेष पॅकेजशेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा म्हणून शेतकऱ्यांना कृषिपंपाचे विद्युत कनेक्शन देण्यासाठी शासनाने ४७ कोटींचे विशेष पॅकेज दिले आहे. यामध्ये ३१ मार्च २०१५ पर्यंतचे प्रलंबित अर्ज निकाली काढणार आहे. यापूर्वी आवश्यक ट्रॉन्सफार्मर व अन्य कामे होणार आहेत. त्यामुळे मागेल त्याला वीजकनेक्शन या घोषणेची अंमलबजावणी व्हायला किमान दीड ते दोन वर्षे लागणार आहेत.इन्फ्रा-२ उपक्रमात २०० कोटीजिल्ह्याला इन्फ्रा-२ स्किम अंतर्गत २०० कोटी रुपये मंजूर आहे. या स्किममध्ये जिल्ह्यातील सर्व प्रलंबित अर्ज समाविष्ट करण्यात आले होते. या इन्फ्रा-२ ची निविदा डी-फेझमध्ये १७ जानेवारी २०१५ ला फायनल झाली. त्यानंतर सर्व्हे प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यास ४७ कोटींचे पॅकेज मिळाले असले तरी मागेल त्याला कनेक्शनसाठी शेतकऱ्यांना २०१६ ची वाट पहावी लागणार आहे.