शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

तो म्हणाला ‘चुकले असेल तर माफ करा’

By admin | Updated: August 21, 2015 00:50 IST

तालुक्यातील आडनदी फाटा येथे मंगळवारी एका दरीत आई व मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या की आत्महत्या याचा खुलासा अजूनही झाला नसल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे.

आजाराच्या नैराश्येतून मृत्यूचा कयास : मायलेकाच्या मृत्यूचे गुढ कायमनरेंद्र जावरे चिखलदरातालुक्यातील आडनदी फाटा येथे मंगळवारी एका दरीत आई व मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या की आत्महत्या याचा खुलासा अजूनही झाला नसल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे. दुसरीकडे मृत ऋषिराज नागले यांनी शेजाऱ्यांना ‘काही चुकले असेल तर माफ करा’ अशी माफी मागत घरुन गेल्यावर त्याचा मृतदेह आढळून आल्याचे तपासात उघड झाले आहे. मंगळवारी आडनदी फाटा येथे एका ५०९ फूट दरीत दोन मृतदेह कुजलेल्या व नग्न अवस्थेत आढळले. याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी पोलिसात दिली. दोन्ही मृतदेहाबाबत तर्क वितर्क काढले. रात्री ८ वाजताच्या मृताच्या मुलीसह परिजनांनी अज्ञात मृतदेह ऋषीराज लालू नागले (५१) व त्याची आई सुमित्रा लालू नागले (७५) रा.कविठा ता.अचलपूर अशी त्यांची ओळख पटविली. अज्ञात मृतदेह असल्याने पर्यटक की स्थानीय रहिवाशी, अशी माहिती पुढे येत होती. मृतदेह कुजल्याने घटनास्थळी दोन्ही मृतदेह नग्न व साडी नसलेल्या अवस्थेत सापडल्याने हत्या की आत्महत्या या बाबत संभ्रम अजूनही कायम आहे. दोन्ही मृतदेहाचा व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यावर पोलिसांना हत्या की आत्महत्या हे स्पष्ट करण्यास मदत होणार आहे. दोघांना आजाराने ग्रासलेमृत ऋषिराज लालू नागले हा 'अ‍ॅपेंडीक्स' च्या आजारामुळे त्रस्त होता. त्यांची आई म्हातारी झाल्याने तिला प्रात:विधीचा सततचा त्रास होता. १४ आॅगस्ट रोजी दोघेही घरुन जाताना दवाखाण्यात उपचारासाठी जात असल्याचे पत्नी मुन्नी व मुलांना सांगितले. मात्र, त्यानंतर दोघेही परतलेच नाही. आजाराने दोघेही ग्रस्त असल्याची माहिती पोलिसांना दिली. या आजाराने ग्रस्त झाल्यामुळे जीवन यात्रा संपविली का, याचा तपास पोलीस करीत आहे.चुकले असेल तर माफ कराऋषिराज नागले यांच्या शेजारी राहणाऱ्या काळे नामक इसमाची भेट घेतली व ‘आपले काही चुकले असेल तर माफ करा’ असे शब्द उच्चारले, दोघांचे काही संभाषण झाले. शेजाऱ्यांना अचानक माफी मागत ऋषिराज नागले आई सुमित्राला घेऊन निघून गेले. त्यानंतर ते परतलेच नसल्याची पोलीस तपासात पुढे आले आहे. ‘माफी मागताना ऋषिराज नागले यांचे डोळे पानावले व अश्रुसुध्दा बाहेर पडले.आॅटोने गेले आडनदीपर्यंतदवाखान्यात जाण्यास निघालेल्या नागले मायलेकांनी परतवाडा येथून एक आॅटो केला व आडनदीपर्यंत गेले. सुधीर नामक रिक्षाचालकाने स्वत: पुढे येऊन ही माहिती पोलिसांना दिली आहे.दोघांचा मृत्यू नेमका कशाने झाला यासाठी व्हिसेरा पाठविण्यात आला आहे. सर्व पध्दतीने बारीक-सारीक माहिती गोळा करण्यात येत असून मृत्यूचे कारण शोधले जात आहे.- नितीन गवारे, ठाणेदार चिखलदरा.