शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुलींची परीक्षा घेणारा ‘तो’ एक पूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:16 IST

फोटो पी २४ रोहनखेड पुलावरील पाण्याने अन्यत्र मुक्काम : पेढी बॅरेज रखडल्याने नादुरुस्त पूल झाला जीवघेणा अमरावती : अमरावती ...

फोटो पी २४ रोहनखेड

पुलावरील पाण्याने अन्यत्र मुक्काम : पेढी बॅरेज रखडल्याने नादुरुस्त पूल झाला जीवघेणा

अमरावती : अमरावती तालुक्यातील रोहणखेडा पर्वतापूर हे इवलेसे गाव. २०११ साली या गावाची लोकसंख्या केवळ ५२७. ती आता वाढून दुपटीवर गेल्याचा अंदाज आहे. या गावावर दरवर्षी पेढी कोपते. पुराच्या पाण्याने या गावचा मुख्यालयाशी संपर्क तुटतो. लोकप्रतिनिधी भेटीदेखील देतात. पुलाची स्थिती, उंची मात्र वर्षानुवर्षे ‘जैसे थे’ आहे. यंदा तर तेथील जीवघेण्या पुलाने विद्यार्थिनींची परीक्षाच घेतली. तेथील नऊ विद्यार्थिनींना गाव सोडून दुसऱ्या गावात वर्गशिक्षिकेच्या माहेरी मुक्कामी राहावे लागले.

अमरावती-कठोरा मार्गाने पुसदा गावातून रोहणखेडला रस्ता जातो. या गावाशेजारून पेढी नदी वाहते. रोहणखेड गावानजीकच पुसदा या गावाला जोडणारा पूल आहे. पेढीला पूर आला की, पुलावरून दुथडी भरून पाणी वाहते. अगदी गावातदेखील तलाव साचतो. परिणामी रोहनखेडचा संपर्क तुटतो.

मोहरमच्या दिवशी आक्रित घडले. १९ ऑगस्ट रोजी पेढी नदीला पूर आला. रोहनखेडनजीकच्या पुुलावरून पाणी वाहिले. दुपारनंतर अगदी रात्रीपर्यंत पुलावर पाणी होते. त्यामुळे पुसदा येथे शाळेत गेलेल्या आठवी, नववी व दहावीच्या नऊ विद्यार्थिनी रोहणखेडला येऊ शकल्या नाहीत. त्यांना वर्गशिक्षिकेच्या घरी पुसदा येथे रात्र काढावी लागली. त्या दुसऱ्या दिवशी घरी पोहोचल्या. तेव्हा त्यांच्या पालकांचा जीव भांड्यात पडला. या पुुुलावर मोठी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे फुटभर पाण्यातून जातानाही अपघात होतात.

म्हणून रखडला पूल

रोहणखेड गावाजवळच्या या पुलाची उंची वाढवून तो नव्याने बनवावा, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीने अनेकदा दिला. मात्र, तो प्रस्ताव पेढी बॅरेजच्या उपसा सिंचन प्रकल्पामुळे रखडला आहे. पेढी बॅरेज उपसा सिंचन प्रकल्पाला २००८ मध्ये मान्यता मिळाली. या प्रकल्पात रोहणखेड येथील ४३७ आणि दोनद येथील १५० कुटुंबांचे पुनर्वसन करायचे आहे. मात्र, पुसदा येथील पुनर्वसनाकरिता प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. भूखंडाऐवजी एकमुस्त मोबदला देण्याची मागणी आहे. ती रखडल्याने व गाव प्रकल्पबाधित असल्याने पुलाचे बांधकामही रखडले आहे.

कोट

मोहरमच्या दिवशी पेढी नदीला पूर आल्याने पूल ओलांडणे धोकादायकच होते. परिणामी एक रात्र पुसदा येथे शिक्षिकेच्या माहेरी काढावी लागली. दरवर्षीच ही परिस्थिती उद्भवते.

- श्रावणी तायडे, विद्यार्थिनी, रोहणखेडा