शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुलींची परीक्षा घेणारा ‘तो’ एक पूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:16 IST

फोटो पी २४ रोहनखेड पुलावरील पाण्याने अन्यत्र मुक्काम : पेढी बॅरेज रखडल्याने नादुरुस्त पूल झाला जीवघेणा अमरावती : अमरावती ...

फोटो पी २४ रोहनखेड

पुलावरील पाण्याने अन्यत्र मुक्काम : पेढी बॅरेज रखडल्याने नादुरुस्त पूल झाला जीवघेणा

अमरावती : अमरावती तालुक्यातील रोहणखेडा पर्वतापूर हे इवलेसे गाव. २०११ साली या गावाची लोकसंख्या केवळ ५२७. ती आता वाढून दुपटीवर गेल्याचा अंदाज आहे. या गावावर दरवर्षी पेढी कोपते. पुराच्या पाण्याने या गावचा मुख्यालयाशी संपर्क तुटतो. लोकप्रतिनिधी भेटीदेखील देतात. पुलाची स्थिती, उंची मात्र वर्षानुवर्षे ‘जैसे थे’ आहे. यंदा तर तेथील जीवघेण्या पुलाने विद्यार्थिनींची परीक्षाच घेतली. तेथील नऊ विद्यार्थिनींना गाव सोडून दुसऱ्या गावात वर्गशिक्षिकेच्या माहेरी मुक्कामी राहावे लागले.

अमरावती-कठोरा मार्गाने पुसदा गावातून रोहणखेडला रस्ता जातो. या गावाशेजारून पेढी नदी वाहते. रोहणखेड गावानजीकच पुसदा या गावाला जोडणारा पूल आहे. पेढीला पूर आला की, पुलावरून दुथडी भरून पाणी वाहते. अगदी गावातदेखील तलाव साचतो. परिणामी रोहनखेडचा संपर्क तुटतो.

मोहरमच्या दिवशी आक्रित घडले. १९ ऑगस्ट रोजी पेढी नदीला पूर आला. रोहनखेडनजीकच्या पुुलावरून पाणी वाहिले. दुपारनंतर अगदी रात्रीपर्यंत पुलावर पाणी होते. त्यामुळे पुसदा येथे शाळेत गेलेल्या आठवी, नववी व दहावीच्या नऊ विद्यार्थिनी रोहणखेडला येऊ शकल्या नाहीत. त्यांना वर्गशिक्षिकेच्या घरी पुसदा येथे रात्र काढावी लागली. त्या दुसऱ्या दिवशी घरी पोहोचल्या. तेव्हा त्यांच्या पालकांचा जीव भांड्यात पडला. या पुुुलावर मोठी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे फुटभर पाण्यातून जातानाही अपघात होतात.

म्हणून रखडला पूल

रोहणखेड गावाजवळच्या या पुलाची उंची वाढवून तो नव्याने बनवावा, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीने अनेकदा दिला. मात्र, तो प्रस्ताव पेढी बॅरेजच्या उपसा सिंचन प्रकल्पामुळे रखडला आहे. पेढी बॅरेज उपसा सिंचन प्रकल्पाला २००८ मध्ये मान्यता मिळाली. या प्रकल्पात रोहणखेड येथील ४३७ आणि दोनद येथील १५० कुटुंबांचे पुनर्वसन करायचे आहे. मात्र, पुसदा येथील पुनर्वसनाकरिता प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. भूखंडाऐवजी एकमुस्त मोबदला देण्याची मागणी आहे. ती रखडल्याने व गाव प्रकल्पबाधित असल्याने पुलाचे बांधकामही रखडले आहे.

कोट

मोहरमच्या दिवशी पेढी नदीला पूर आल्याने पूल ओलांडणे धोकादायकच होते. परिणामी एक रात्र पुसदा येथे शिक्षिकेच्या माहेरी काढावी लागली. दरवर्षीच ही परिस्थिती उद्भवते.

- श्रावणी तायडे, विद्यार्थिनी, रोहणखेडा