शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

त्याने वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी केले पाणवठे, नाले स्वच्छ

By admin | Updated: May 24, 2016 00:38 IST

जगंलातील वन्यप्राण्याना स्वच्छ पाणी उपलब्ध होऊन त्यांची तृष्णातृप्ती व्हावी,...

जलमित्र नीलेश कंचनपुरेचे कार्य : 'लोकमत' अभियानातून प्रेरणाअमरावती : जगंलातील वन्यप्राण्याना स्वच्छ पाणी उपलब्ध होऊन त्यांची तृष्णातृप्ती व्हावी, या उद्देशाने वन्यप्रेमी निलेश कंचनपुरे याने जंगलातील पाणवठे व शहरालगत असलेल्या नाल्यांची स्वच्छता केली. सोबतच अनेकांच्या घरोघरी मातीचे भांडे देऊन पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली. जेवड नगर नीलेश कंचनपुरेचे जन्मस्थान असून जंगलाच्या शेजारीच त्याचे लहानपण गेले. त्यामुळे त्याची वन्यप्राण्यांशी आत्मियता निर्माण झाली. लहानपणापासून जंगलातील पशुपक्ष्यांच्या सानिध्यात जीवन जगताना त्यांच्यासाठी काही करावे हा, उद्देश नीलेश कंचनपुरेचा होता. उन्हाळ्यात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कोरडे पडतात. अशाप्रसंगी वन्यप्राण्यांची तृष्णातृप्ती व्हावी, या उद्देशाने कंचनपुरेने तलावातील कोरड्या जागेवर खड्डे खोदून ठेवले. तसेच नैसर्गिक पाणवठ्यावरील काडी कचरा स्वच्छ करून वन्यप्राण्यासाठी शुध्द व स्वच्छ पाण्याची सोय केली. त्यातच नुकतेच छत्री तलाव मार्गावरील उद्यानाविषयी कंचनपुरेने आंदोलनसुध्दा केले. छत्री तलावात तहान भागविण्याकरिता येणाऱ्या वन्यप्राण्यांना उद्यानाचा अडथळा निर्माण होत असल्याचे कंचनपुरेने वनविभागाच्या लक्षात आणून दिले. वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता उद्यानाचे तारेचे कुंपण काढण्यात यावे, असा मुद्दा कंचनपुरेने प्रशासनाकडे रेटून धरला आहे. तसेच महापालिकेने शहरातील काही चौकांमध्ये सौंदर्यीकरणासाठी पाण्याचे फवारे लावले आहेत. पाणी बचतीसाठी उन्हाळ्याच्या दिवसांत ते फवारे बंद करण्यात यावे, अशी मागणी महापालिकेकडे याने केली आहे. 'लोकमत'ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानातून प्रेरणेतून पाणी बचतीचे कार्य करणारा व वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी झटणारा कंचनपुरे हा जलमित्र ठरला आहे. (प्रतिनिधी)