शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

बहिरम यात्रेत आज जागेचा हर्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 01:14 IST

विदर्भातील सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरवर्षी १० ते ११ लाख रुपये महसूल मिळवून देणारी ही यात्रा जिल्हा परिषदेकरिता उत्पन्नाचे साधन बनली असली तरी नागरिकांकरिता मात्र जिल्हा परिषदेतर्फे कोणतीच सुविधा केली जात नाही.

ठळक मुद्देलाखोंचे उत्पन्न, सुविधा गायब : जिल्हा परिषदेकडून विकास शून्य

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : विदर्भातील सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरवर्षी १० ते ११ लाख रुपये महसूल मिळवून देणारी ही यात्रा जिल्हा परिषदेकरिता उत्पन्नाचे साधन बनली असली तरी नागरिकांकरिता मात्र जिल्हा परिषदेतर्फे कोणतीच सुविधा केली जात नाही. दरम्यान, ७ डिसेंबरला यात्रेतील जागांचा हर्रास होणार आहे.सातपुड्याच्या पायथ्याशी मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर ही यात्रा १२७ हेक्टर क्षेत्रात भरत असते. यामध्ये दरवर्षी ६५० ते ६७५ निरनिराळी दुकाने थाटली जातात. या दुकानदारांकडून दरवर्षी प्रशासनाला १० ते ११ लाख रुपये उत्पन्न होते, तर या यात्रेवर प्रशासनाकडून केवळ दोन ते तीन लाख रुपयेच खर्च केले जातात. या आलेल्या उत्पनामधून ५० टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा होते व उर्वरित ५० टक्के रक्कम कारंजा बहिरम ग्रामपंचायतीला जमा होतो. संपूर्ण यात्रेच्या देखरेखीची व सुविधा पुरविण्याची जबाबदारी चांदूर बाजार पंचायत समितीवर राहते. मात्र, यात्रेत सुविधा पुरविण्यावर आवश्यक खर्च केला जात नसल्याने यात्रेकरूंना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.जिल्ह्यातील सर्वात जास्त वेळ राहणारी आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत विविध समुदायांचा मिलाप होत असतो. त्यांच्या सुविधेला प्राधान्य दिल्यास महसूल वाढीस लागेल. त्यामुळे सर्व स्तरांतील लोकप्रतिनिधींनी आपसी मतभेद विसरून जिल्ह्याचे वैभव असणाऱ्या बहिरम यात्रेच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी रास्त मागणी बहिरामबाबा भक्तांनी केली आहे.नवसाला पावणारा बहिरमबाबाबहिराम यात्रा सातपुड्याच्या पायथ्याशी भरत असल्याने या भागात राहणारे आदिवासी बांधवांचे यात्रेत मोठ्या प्रमाणात आवागमन सुरू असते. बहिरमबाबा हे अनेक कुटुंबांचे आराध्य दैवत असून, आपल्या कुलदैवताचे नवस फेडण्याकरिता हजारो भाविक यात्रेत दर्शनाला येतात. त्यामुळे नवसाला पावणारा बहिरमबाबा अशी या दैवताची ओळख आहे.रोजगाराचे साधनयात्रेतील दुकानांकरिता जागेचा लिलाव स्थानिक पंचायत समितीतर्फे ७ डिसेंबरला केला जाणार आहे. यात्रेत ग्रामीण भागातील कलाकुसरीचे साहित्य विक्रीकरिता येत असतात. त्यामुळे ही यात्रा अनेकांच्या रोजगाराचे साधन बनली आहे. दरवर्षी पंचायत समितीतर्फे या यात्रेतील दुकानांच्या जागेचा लिलाव घेण्याकरिता नागरिकांची गर्दी होते.या सुविधांची मागणीराहुट्या टाकून यात्रेत अनेक दिवस मुक्काम केला जात असल्याने आवश्यक सुविधांची मागणी होते. भाविकांसाठी आवश्यक त्या प्रमाणात स्वछतागृह नसून, महिला वर्गाला कुचंबणा सहन करावी लागते. यात्रेकरूंना आवश्यक प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय या यात्रेदरम्यान दिसून येत नाही. 

टॅग्स :zpजिल्हा परिषद