शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

वारोळी बंधारा फुटला, शेकडो हेक्टर शेतीची हानी

By admin | Updated: August 2, 2016 00:08 IST

तालुक्यात रात्री १.३० वाजता पासून सुरु असलेल्या संततधार पावसाने तालुक्यातील नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत.

घरांमध्येही शिरले पाणी : तहसीलदारांनी केली पाहणी चांदूरबाजार : तालुक्यात रात्री १.३० वाजता पासून सुरु असलेल्या संततधार पावसाने तालुक्यातील नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. घाटलाडकी, शिरजगाव कसबा येथील नाले ओव्हरफ्लो झाल्याने अनेक गावांच्या वाहतुकीला फटका बसला आहे. वारोळी या गावात बांधण्यात आलेला बंधारा या पाण्याने वाहून गेला तसेच बेलमंडळी येथील अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.तालुक्यात ३१ जुलै रोजी सरासरी १२.८१ मिमी पाऊस झाला. यामध्ये ब्राह्मणवाडा थडी मंडळामध्ये सर्वाधिक २७ मिमी पाऊस झाला आहे. यामुळे घाटलाडकी, बेलमंडळी, शिरजगाव कसबा ही गावे सर्वाधिक प्रभावित झाली होती. तालुक्यात रात्री १.३० च्या सुमारे पावसाला सुरुवात झाली. त्यात वारोळी येथे बांधण्यात आलेल्या सीएनबी बंधारा पावसामुळे वाहून गेला तर याच भागातील शेती पाण्यामुळे पूर्णत: खरडून गेली. याच भागातील शेतकऱ्याचा बैल पावसात वाहून गेल्याची माहिती तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिली. यासोबत बेलमंडळी येथील नाल्याकाठच्या १० ते १२ घरांत पुराचे पाणी शिरल्याने हे कुटूंब उघड्यावर आले आहेत. वारोळी येथील परिस्थितीची पाहणी करण्यास तहसीलदार शिल्पा बोबडे गेल्या असता पुलावरुन पाणी वाहत असल्याने पाहणी करता आली नाही. शिरजगाव कसबा येथील पुलावरून मोठया प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे कार्तिकस्वामी मंदिर ते शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन परिसरात पाणी साचले होते. शिरजगाव कसबा येथील बाजार पेठेतील ओटे सुध्दा पुराच्या पाण्यात बुडाले होते. पर्जन्यतापक यंत्रातील आकडेवारी बघता मंडळनिहाय अतिवृष्टी झाली नसल्याचे दिसून येत असले तरीही मंडळाच्या केंद्रापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठया प्रमाणात शेतीची हानी झाली आहे. परंतु महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार ही अतिवृष्टी नसल्यामुळे या नुकसानग्रस्त गावांना अतिवृष्टीची मदत मिळेल की नाही, यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. गावाशी संपर्क न होवू शकल्यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेता आला नाही. (तालुका प्रतिनिधी)