शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

विद्यापीठात ‘मार्इंड लॉजिक’ प्रबंधकाच्या कानशिलात हाणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:04 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची ‘एंड टू एंड’ कामांची जबाबदारी असलेल्या बंगळुरु येथील माइंड लॉजिक या एजंसीच्या प्रबंधकांच्या कानशिलात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लगावली. हा प्रकार विद्यापीठात परीक्षा व मूल्यांकन विभागातील संचालकाच्या दालनात शुक्रवारी घडला. या घटनेमुळे विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपरीक्षा नियंत्रकांच्या दालनातील प्रकार : युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांचा तोल सुटला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची ‘एंड टू एंड’ कामांची जबाबदारी असलेल्या बंगळुरु येथील माइंड लॉजिक या एजंसीच्या प्रबंधकांच्या कानशिलात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लगावली. हा प्रकार विद्यापीठात परीक्षा व मूल्यांकन विभागातील संचालकाच्या दालनात शुक्रवारी घडला. या घटनेमुळे विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.आ. रवि राणा द्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेचे उपाध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वात काही विद्यार्थ्यांनी शुक्रवार, ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांचे दालनात प्रवेश केला. मात्र, यावेळी दालनात हेमंत देशमुख नव्हते. अभिजित देशमुख यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या आॅनलाइन निकालाची जबाबदारी असलेल्या माइंड लॉजिकचे प्रबंधक शैलेंद्र टंडन यांना बोलाविले. निकालात त्रुटी, विलंब आणि चुका होत असल्याबाबत त्यांना विचारणा केली. मात्र, माझे काम स्कॅनिंग करणे आहे. पुनर्मूल्यांकन करून विद्यार्थ्यांची यादी परीक्षा नियंत्रकांकडे सोपविल्याची माहिती टंडन यांनी दिली. कार्यकर्त्यांनी टंडन यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तरीही ते काहीही बोलत नव्हते. अखेर युवा स्वाभिमानचे उपाध्यक्ष अभिजित देशमुख यांचा तोल सुटला आणि त्यांनी टंडन यांच्या कानशिलात जोरदार लगावली. त्यानंतर परीक्षा नियंत्रकाच्या दालनात एकच गोंधळ उडाला. यानंतर काहींनी टंडन यांना दालनाबाहेर नेले, हे विशेष.यापूर्वी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी एमसीए निकालात चुका झाल्याबाबत २५ सप्टेंबर रोजी विद्यापीठात आंदोलन केले होते.अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ८६० विद्यार्थ्यांचे निकाल अद्यापही अपूर्ण आहे. गुरुवारी उशिरापर्यंत या विद्यार्थ्यांची यादी दिली नाही. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा विद्यापीठात गेलो. मात्र, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक उपस्थित नव्हते. दरम्यान, माइंड लॉजिक एजन्सीच्या प्रबंधकांना याविषयी विचारणा केली असता, त्यांनी व्यवस्थित उत्तर दिले नाही.- अभिजित देशमुख, उपाध्यक्ष, युवा स्वाभिमानमी दालनात नसताना हा प्रकार घडला. माइंड लॉजिकच्या प्रबंधकांनी याबाबत रितसर तक्रार दिली आहे. हे प्रकरण पोलिसांत दिले जाईल. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांची मागणी अवाजवी आहे. अभियांत्रिकी पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले असताना आता कॅरीआॅन देण्याची मागणी आहे. मात्र, ही मागणी तर्कसंगतच नाही.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग.