शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात ‘मार्इंड लॉजिक’ प्रबंधकाच्या कानशिलात हाणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:04 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची ‘एंड टू एंड’ कामांची जबाबदारी असलेल्या बंगळुरु येथील माइंड लॉजिक या एजंसीच्या प्रबंधकांच्या कानशिलात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लगावली. हा प्रकार विद्यापीठात परीक्षा व मूल्यांकन विभागातील संचालकाच्या दालनात शुक्रवारी घडला. या घटनेमुळे विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपरीक्षा नियंत्रकांच्या दालनातील प्रकार : युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांचा तोल सुटला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची ‘एंड टू एंड’ कामांची जबाबदारी असलेल्या बंगळुरु येथील माइंड लॉजिक या एजंसीच्या प्रबंधकांच्या कानशिलात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लगावली. हा प्रकार विद्यापीठात परीक्षा व मूल्यांकन विभागातील संचालकाच्या दालनात शुक्रवारी घडला. या घटनेमुळे विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.आ. रवि राणा द्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेचे उपाध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वात काही विद्यार्थ्यांनी शुक्रवार, ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांचे दालनात प्रवेश केला. मात्र, यावेळी दालनात हेमंत देशमुख नव्हते. अभिजित देशमुख यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या आॅनलाइन निकालाची जबाबदारी असलेल्या माइंड लॉजिकचे प्रबंधक शैलेंद्र टंडन यांना बोलाविले. निकालात त्रुटी, विलंब आणि चुका होत असल्याबाबत त्यांना विचारणा केली. मात्र, माझे काम स्कॅनिंग करणे आहे. पुनर्मूल्यांकन करून विद्यार्थ्यांची यादी परीक्षा नियंत्रकांकडे सोपविल्याची माहिती टंडन यांनी दिली. कार्यकर्त्यांनी टंडन यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तरीही ते काहीही बोलत नव्हते. अखेर युवा स्वाभिमानचे उपाध्यक्ष अभिजित देशमुख यांचा तोल सुटला आणि त्यांनी टंडन यांच्या कानशिलात जोरदार लगावली. त्यानंतर परीक्षा नियंत्रकाच्या दालनात एकच गोंधळ उडाला. यानंतर काहींनी टंडन यांना दालनाबाहेर नेले, हे विशेष.यापूर्वी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी एमसीए निकालात चुका झाल्याबाबत २५ सप्टेंबर रोजी विद्यापीठात आंदोलन केले होते.अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ८६० विद्यार्थ्यांचे निकाल अद्यापही अपूर्ण आहे. गुरुवारी उशिरापर्यंत या विद्यार्थ्यांची यादी दिली नाही. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा विद्यापीठात गेलो. मात्र, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक उपस्थित नव्हते. दरम्यान, माइंड लॉजिक एजन्सीच्या प्रबंधकांना याविषयी विचारणा केली असता, त्यांनी व्यवस्थित उत्तर दिले नाही.- अभिजित देशमुख, उपाध्यक्ष, युवा स्वाभिमानमी दालनात नसताना हा प्रकार घडला. माइंड लॉजिकच्या प्रबंधकांनी याबाबत रितसर तक्रार दिली आहे. हे प्रकरण पोलिसांत दिले जाईल. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांची मागणी अवाजवी आहे. अभियांत्रिकी पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले असताना आता कॅरीआॅन देण्याची मागणी आहे. मात्र, ही मागणी तर्कसंगतच नाही.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग.