शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात ‘मार्इंड लॉजिक’ प्रबंधकाच्या कानशिलात हाणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:04 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची ‘एंड टू एंड’ कामांची जबाबदारी असलेल्या बंगळुरु येथील माइंड लॉजिक या एजंसीच्या प्रबंधकांच्या कानशिलात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लगावली. हा प्रकार विद्यापीठात परीक्षा व मूल्यांकन विभागातील संचालकाच्या दालनात शुक्रवारी घडला. या घटनेमुळे विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपरीक्षा नियंत्रकांच्या दालनातील प्रकार : युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांचा तोल सुटला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची ‘एंड टू एंड’ कामांची जबाबदारी असलेल्या बंगळुरु येथील माइंड लॉजिक या एजंसीच्या प्रबंधकांच्या कानशिलात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लगावली. हा प्रकार विद्यापीठात परीक्षा व मूल्यांकन विभागातील संचालकाच्या दालनात शुक्रवारी घडला. या घटनेमुळे विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.आ. रवि राणा द्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेचे उपाध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वात काही विद्यार्थ्यांनी शुक्रवार, ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांचे दालनात प्रवेश केला. मात्र, यावेळी दालनात हेमंत देशमुख नव्हते. अभिजित देशमुख यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या आॅनलाइन निकालाची जबाबदारी असलेल्या माइंड लॉजिकचे प्रबंधक शैलेंद्र टंडन यांना बोलाविले. निकालात त्रुटी, विलंब आणि चुका होत असल्याबाबत त्यांना विचारणा केली. मात्र, माझे काम स्कॅनिंग करणे आहे. पुनर्मूल्यांकन करून विद्यार्थ्यांची यादी परीक्षा नियंत्रकांकडे सोपविल्याची माहिती टंडन यांनी दिली. कार्यकर्त्यांनी टंडन यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तरीही ते काहीही बोलत नव्हते. अखेर युवा स्वाभिमानचे उपाध्यक्ष अभिजित देशमुख यांचा तोल सुटला आणि त्यांनी टंडन यांच्या कानशिलात जोरदार लगावली. त्यानंतर परीक्षा नियंत्रकाच्या दालनात एकच गोंधळ उडाला. यानंतर काहींनी टंडन यांना दालनाबाहेर नेले, हे विशेष.यापूर्वी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी एमसीए निकालात चुका झाल्याबाबत २५ सप्टेंबर रोजी विद्यापीठात आंदोलन केले होते.अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ८६० विद्यार्थ्यांचे निकाल अद्यापही अपूर्ण आहे. गुरुवारी उशिरापर्यंत या विद्यार्थ्यांची यादी दिली नाही. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा विद्यापीठात गेलो. मात्र, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक उपस्थित नव्हते. दरम्यान, माइंड लॉजिक एजन्सीच्या प्रबंधकांना याविषयी विचारणा केली असता, त्यांनी व्यवस्थित उत्तर दिले नाही.- अभिजित देशमुख, उपाध्यक्ष, युवा स्वाभिमानमी दालनात नसताना हा प्रकार घडला. माइंड लॉजिकच्या प्रबंधकांनी याबाबत रितसर तक्रार दिली आहे. हे प्रकरण पोलिसांत दिले जाईल. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांची मागणी अवाजवी आहे. अभियांत्रिकी पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले असताना आता कॅरीआॅन देण्याची मागणी आहे. मात्र, ही मागणी तर्कसंगतच नाही.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग.