शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

स्वच्छ शाळेसाठी ‘हॅन्ड वॉश स्टेशन’ मस्ट !

By admin | Updated: July 19, 2016 00:07 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्काराची घोषणा झाली. त्यासाठी नामांकनाची धांदल उडाली आहे.

निकषांची चतु:सूत्री : राज्यभरात स्वच्छ विद्यालय पुरस्कार योजनाअमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्काराची घोषणा झाली. त्यासाठी नामांकनाची धांदल उडाली आहे. जिल्हास्तरावर ४८, राज्यस्तरावर ४० तर राष्ट्रीय पातळीवर एकूण शंभर शाळांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. आहारापूर्वी हात धुण्यासाठी शाळेत हॅन्डवॉश स्टेशन असणे आणि त्यातही सात पातळ्यांवर या हात धुण्याची प्रक्रिया, हा पुरस्कारासाठी प्रमुख निकष राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘हात धुवादिन’ ही संकल्पना राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. तथापि अनेक शाळांमध्ये केवळ औपचारिक अंमलबजावणी करण्यात आली. पुरस्कार पटकाविण्यासाठी मात्र ‘हॅन्ड वॉश स्टेशन’ असणे बंधनकारक आहे. शासकीय व अनुदानास पात्र शाळांनाच नामांकन नोंदवता येणार आहेत. आॅक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था आणि वर्तणूक व क्षमता विकास या पाच विभागात एकूण ३५ घटकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत नामांकन पाठवायची असून एमएचआरडीच्या संकेतस्थळावर दिलेल्या मोबाईल नंबरवर मिसकॉल दिल्यास त्या शाळांना प्रश्नावली उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर तीन समित्या स्थापन केल्या असून गुणांचे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना विविध रंगनिहाय श्रेणी दिली जाणार आहे. ३५ पेक्षा कमी गुण मिळणाऱ्या शाळांना लाल रंगाची तर ९० ते १०० गुण मिळवणाऱ्या शाळांना हिरव्या रंगाची श्रेणी असेल. ७५ ते ८९ गुण मिळणाऱ्या शाळांना निळ्या ५१ ते ७४ गुण मिळविणाऱ्या शाळांना पिवळा तर ३५ ते ५० गुण मिळणाऱ्या शाळांना नारंगी रंगाची श्रेणी असेल. ग्रामीण भागातील ७० टक्के शाळा आणि शहरी भागातील ३० टक्के शाळांचा पुरस्कारासाठी विचार होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत राज्यस्तरावरील तर ७ आॅक्टोबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण होणार आहे. (प्रतिनिधी)हात धुवा कशासाठी ?जगभरातील लहान मुलांना हात धुण्याची सवय लागावी, हात धुणे हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावा आणि त्यांनी स्वच्छता पाळून आजाराला प्रतिबंध घालावा, या उद्देशाने १५ आॅक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन (ग्लोबल हॅन्ड वॉशिंग डे) म्हणून साजरा होतो. जगात पहिल्यांदा १५ आॅक्टोबर २००८ ला हा दिवस साजरा झाला. विषाणू तसेच डायरियामुळे होणारे बालमृत्यू कमी करणे हा देखील या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.