शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

अर्धा पावसाला आटोपला, सहा तालुके माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:06 IST

पावसाळ्याचे जून ते सप्टेंबर हे चार महिने गृहीत धरण्यात जातात, या कालावधीत प्रत्येक तालुक्यासह जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा कक्ष ...

पावसाळ्याचे जून ते सप्टेंबर हे चार महिने गृहीत धरण्यात जातात, या कालावधीत प्रत्येक तालुक्यासह जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा कक्ष २४ तास सुरु असतो व त्यानंतर येणारा पाऊस हा परतीचा किंवा अवकाळी असे संबोधिल्या जाते. यंदा महावेध या संस्थेद्वारा मंडळनिहाय दर तीन तासांनी पावसाची नोंद घेतल्या जात आहे. यापूर्वी महसूल विभागाद्वारा रोज सकाळी आठ वाजता पावसाची नोंद घेतल्या जात असे,

जिल्ह्यात १ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत ३९४.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ४६०.७ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही टक्केवारी अपेक्षित सरासरीच्या ११६. ७ टक्के आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनूसार सर्वाधिक १६४ टक्के पावसाची नोंद अंजनगाव सुर्जी तालुक्यात झालेली आहे. या तालुक्यात ५०७.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. भातकुली ४३० मिमी, नांदगाव खंडेश्वर ४७२.६ मिमी, चांदूर रेल्वे ४८२ मिमी, तिवसा ३४१मिमी, वरुड ४२८ मिमी, दर्यापूर ४७२ मिमी, व चांदूर बाजार तालुक्यात ३७९ मिमी पावसाची नोंद झालेले आहे. या आठ तालुक्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे.

बॉक्स

हे तालुक्यात पावसाची सरासरी कमी

जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस चिखलदरा तालुक्यात झाला. या तालुक्यात ६५३.५ मिमीची सरासरी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ४६४.५ मिमी पावसाची नोंद झाली. धारणी तालुक्यात ४५३.३ मिमी, अमरावती ४३९.७ मिमी, मोर्शी ३५५.३ मिमी, अचलपूर ४०१.१ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. हे सहा तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहे.