शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

अमरावतीत तीन तालुक्यांत गारपीट; यशोमती ठाकूरांकडून सर्वेक्षणाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 20:24 IST

धारणी वगळता अन्य तेराही तालुक्यांत बुधवारी उशिरा रात्री व गुरुवारी पहाटे अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला, तर तिवसा, वरूड व मोर्शी या तालुक्यांत बोराच्या आकाराची गार पडली.

अमरावती : जिल्ह्यातील धारणी वगळता अन्य तेराही तालुक्यांत बुधवारी उशिरा रात्री व गुरुवारी पहाटे अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला, तर तिवसा, वरूड व मोर्शी या तालुक्यांत बोराच्या आकाराची गार पडली. या गारपिटीमुळे या तीन तालुक्यांत खरीप-रबी पिके व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १२.४ मिमी पावसाची नोंद झाली. यात तिवसा २७.६, मोर्शी २३.८, चिखलदरा २६.९ तर वरूड तालुक्यात सर्वाधिक ३१ मिमी पावसाची नोंद झाली. या अवकाळी पावसाने कपाशी, तूर, संत्रा, केळी व रबीतील गव्हाचे मोठे नुकसान झाले. जिल्हाधिकारी कार्यालयानुसार, मोर्शी तालुक्यातील ५९ गावांमधील ४५१३ हेक्टरवरील संत्रा, वरुड तालुक्यातील १४० गावांमधील १० हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावरील संत्रा व कपाशी बाधित झाली.तिवसा तालुक्यातील १७ गावांमधील ३३२० हेक्टरवरील संत्रा, गहू, तूर, चना, कांदा पीक बाधित झाले. तर चांदूर बाजार तालुक्यातील दोन गावांमधील ४६५ हेक्टर क्षेत्रावरील तूर व हरभरा बाधित झाला. एकंदरीत परतीच्या पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना सलग दोन दिवसांतील अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतक-यांवर संकट कोसळले आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्याचे आदेश महसूल यंत्रणेस दिले आहेत.